Skip to main content

बातमी

1143 वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शनिवार, 07/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
1143 year old printed book- Diamond Sutra एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले.

पदमविभूषण ई.श्रीधरन यांस मानाचा मुजरा!

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 01/01/2012 20:28 या दिवशी प्रकाशित केले.


पदमविभूषण डॉ. ईलत्तुवलपीळ श्रीधरन व्यवस्थापकीय संचालक, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन.

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

दासबोध अभ्यास संकेतस्थळ उदघाटन आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

लेखक विटेकर यांनी बुधवार, 14/12/2011 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्रीराम समर्थ || नमस्कार, मागे मिपावर लिहल्याप्रमाणे दासबोध अभ्यास संकेतस्थळाच्या उद्घाटनाचा आणि प.पू. चैतन्य महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे दोन्ही दिवस भरत नाट्य मंदिर भरले होते.समर्थ आणि वारकरी संप्रदायातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. (येथे फोटो कसे लावतात याचे तांत्रिक माहीती नसल्याने चेपु चा दुवा देत आहे.

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 11/12/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते.

महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 01/12/2011 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या 'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

प्.पू.चैतन्य महाराज प्रवचने- समर्थ रामदासांची करुणाष्टके

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 25/11/2011 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्रीराम समर्थ ॥ " मासानां मार्गशीर्षो s हम... असे भगवंताने भगवदगीतेत आपली विभूती सांगताना म्हटले आहे. दि. २६ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु होत आहे. आपणा सर्वांच्या सदभाग्याने याच काळात वारकरी संप्रदायातील अधिकारी सत्पुरुष प. पू. चैतन्य महाराज देगलूरकर यांची अमृतवाणी ऐकायला मिळणार आहे, कृपया सर्वांनी या अपूर्व संधीचा लाभ घ्यावा. विषय - समर्थ रामदासांची करुणाष्टके स्थळ - भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे. वेळ - सकाळी ९ ते ११., शनिवार दि. २६ नोव्हे. आणि रविवार दि.

बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा!

लेखक चित्रा यांनी रविवार, 20/11/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) अधिवेशन म्हटले की अमेरिकेतील मराठी माणसांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. १९७३ पासून दर दोन वर्षांनी बीएमएमचे अधिवेशन ही आता एक परंपराच झाली आहे. यावेळचे हे २०१३ चे अधिवेशन बॉस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेतील विद्येच्या माहेरघरी भरणार आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ चार ते पाच हजार मराठी मंडळी अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांतून बॉस्टनला येणार असा अंदाज आहे.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.