--------अन----लग्न----------
भावाचं लग्न झालेलं आहे.
-त्याला एक मुलगी आहे.
माझं लग्न झालेलं नाही.
गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही.
(मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?)
म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये.
मिसळपाव