Skip to main content

प्रकटन

पहिला पाऊस...

लेखक nasatiuthathev यांनी मंगळवार, 20/05/2014 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस !!!!
पहिला पाऊस खूप जणांना वेड लावतो म्हणे ????? वेड ???? पण कुठले वेड ???? आनंदाचे , उत्साहाचे ,प्रेमाचे चैतन्याचे कि काही आठवणींनी आपल्याला वेड करतो ???कि विरहाने ??? पण मला तर नेहमी एक नवचैतन्य ,नव आशा दाखवत असतो . पहिला पाऊस म्हणजे प्रेम कवींचा हक्काचा विषय !!!! आणि त्या विषयावर प्रत्येक नव्या -जुन्या , उमलणाऱ्या ,विझाणाऱ्या कवीची एक तरी कविता !!!!!!!! पहिला पाऊस आणि विरह यांचे एक अतूट नात आहे.

गमभन.ऑर्ग - ऐकू आनंदे

लेखक ॐकार यांनी सोमवार, 19/05/2014 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! लोकांना पैसे खर्च न करता युनिकोड मध्ये टाईप करता यायलाच हवे ह्या निकषावर मी गमभन चकटफु केले त्याला आता जवळपास नऊ वर्षं होत आली. आज हॅन्डहेल्ड डिव्हाइसेस आलेली असताना - गमभन चे तंत्र कालबाह्य होईल हे नक्की आहे. Physical किबोर्ड नसल्याने त्याला येणार्‍या मर्यादाच नाहीत त्यामुळे हे बदल स्वाभाविक आहेत. पण ह्या सर्वाचा विचार करता एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे मोबाईल किंवा तत्सम डिव्हाइसेसच्या लहान स्क्रीन आणि सारखे scroll करावे लागताना होणारा त्रास.

लिखाण

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 15/05/2014 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.” पुलंची ही वाक्ये वाचनात आली आणि मी भारावून गेलो. ठरवले आपण सुद्धा कुठल्या तरी कलेशी मैत्री जोडावी. कुठलीतरी कला आत्मसात करावी पण कुठली कला हा फार मोठा प्रश्न होता. गाणे शिकावे म्हटले तर मला माझ्या गाण्याची पट्टी चांगली ठाउक होती.

सिनेमा आणि प्रेम

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 14/05/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.

ठाणे-मुंबई-कल्याण मधील मिपाकर आणि टवाळ कार्टा यांचा मिपा कट्टा....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 11/05/2014 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
(फार घाईत टाइप करत असल्याने शुद्ध लेखन बघू नये.) श्री. टवाळ कार्टा, १० मे ते २५मे दरम्यान ठाण्यात येत आहेत. इथल्या आसपासच्या मिपाकरांना भेटण्याची त्यांना ओढ आहे.तसा त्यांचा मला व्य.नि. आला. तरी आता इथेच काय ते ठरवा. म्हणजे ठिकाण आणि वेळ, इ. इ. दुर्दैवाने, मी नेमका यानबुवलीत अडकल्याने, माझा हा पण कट्टा हुकणार. कळावे, आपल्या मिपाकरांचा एकमेकांवर लोभ आहेच, हे असे कट्टे करत आपण तो अज्जुन व्रुध्धींगत करू या.

एका पुतळ्याची व्यथा कथा

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 11/05/2014 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
एका महान नेत्याची आठवण म्हणून, शहरातल्या चौकात पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याला हार-तुरे घालण्यात आले. भाषणे झाली, अमर रहेच्या घोषणा इत्यादी झाल्या. असे पुतळ्याला वाटले, आता मस्त पैकी इथे उभे राहून, जगाला बघू. रोज सांयकाळी खाली बसलेल्या प्रेमिकांच्या गुलगुल कधी न संपणाऱ्या कथा ऐकतात, मस्त टाईम पास करू. पण झाले भलतेच, उद्घाटनाच्या, दुसऱ्याच दिवसांपासून, पुतळ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कुणीही साफ-सफाई, स्वछता करायला फिरकत नव्हते. त्याचा अंगावर धूळ-माती घाण जमा होऊ लागली. कर्कश ओरडणाऱ्या कावळ्यांनी प्रत:विधी साठी उपयुक्त जागा म्हणून पुतळ्याचा वापर सुरु केला.

परवशता

लेखक मीराताई यांनी गुरुवार, 08/05/2014 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीत टांगलेल्या पिंजऱ्यात तो पोपट सुखेनैव राहात होता. कधीपासून तो तिथे असा राहात होता ते त्यालाही सांगता आलं नसतं. पण तो निवांत, निश्चिंत होता, मजेत होता, सुखात होता एवढं नक्की! पिंजऱ्यात बसून ओली डाळ खात असताना एकदा त्याने पाहिलं, रानातून आलेल्या राव्यांचा एक थवा मुक्त कंठाने चित्कार करत या झाडावरून त्या झाडावर, विजेच्या तारांवरून मंदिराच्या उंच घुमटावर सुरकांडया मारत होता. त्या रानपाखरांचे ते चित्कार, त्या मुक्त लकेरी ऐकून तो चकित झाला. त्याला तर फक्त 'मिठू मिठू' म्हणायचंच माहिती होतं. त्यांच्या त्या भराऱ्या आणि त्या भरारीचा वेग पाहूनही तो चक्रावला.

माझी आजी

लेखक rakhee यांनी बुधवार, 07/05/2014 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख . गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे. ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली .