Skip to main content

प्रतिभा

(पहा वेळ झाली!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/08/2008 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ.श्रीकृष्ण राऊत यांची 'कशी वेळ आली?' ही छोटी गजल वाचून आमच्यावर आलेली एक बिकट वेळ अंगावर काटा उभी करुन गेली! :SS :T पहा 'वेळ' झाली! 'ठमा' क्रूर आली! पळे भीत 'रिंकू'; लपेटून शाली. करा बंद गाणी; कुठे ती पळाली? बिछान्यात माती बुटांची मिळाली. कशी ही विचारे; सदर्‍यास लाली? मिळे चोप 'रंग्या'; घरी कोतवाली! चतुरंग

नाव शोधून शोधून जोडू नको!

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 15/08/2008 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावावर सदस्यांची नावे अशी फिरताना बघून आमचे डोळे फिरले! 8| एकामागून एक सदस्य अशी नावे फिरवून फिरताना पाहून ना.घ. देशपांड्यांच्या डाव मांडून भांडून मोडू नको ह्या अप्रतिम गाण्याचे शब्द आम्ही फिरवले!

(कहर)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 15/08/2008 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
विक्षिप्त ह्यांच्या गजलेचा 'कहर' बघून आसपासच्या आफिसातील काही नमुने डोळ्यांसमोर चमकले! ;) टंच आहे टंकणारी बांधणीला ढेर-टकल्या सायबाच्या दावणीला आडलो नाही तसा मी बोलताना आडला येऊन हुद्दा ऐरणीला काय सांगू कहर हा झाला कशाने का पुढे बसवून गेली ढापणीला? ओठ मादक, केवढा अन् रंग त्यावर बोलवी साहेब कसल्या चाचणीला? ते भले मोठे नको रोखूस डोळे संभ्रमी बघ कंप सुटतो पैरणीला खोड 'रंग्याची' जुनी नाठाळ आहे मार खाण्याची अखेरी वळचणीला चतुरंग

आवाहन

लेखक राघव यांनी गुरुवार, 14/08/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
जयालागी ध्यास, नामाची आस, कोण श्रीमंत दास, तयावीण. भावाची प्रचीती, राम स्वयें सांगाती, प्रेमाची महती, वर्णावी किती!! रामाचे पायी, जया चारी धाम, विचारांचे काम, तयासी कैसे. मोजावे कशास उरलेले दिन, नामी समाधान, आनंदी असावे. राम ठेवी जोवर, त्याचे असावे तोवर, अन् निघावे सत्त्वर, हाक येता! नामी राहावे मन, नाम असावे प्राण, मुमुक्षूचे आवाहन, सगळ्यांसी. मुमुक्षू [टिप: ही कविता आधी दुसरीकडे याच नावाने प्रकाशीत केलेली आहे. येथेही आवडेल अशी आशा करतो.]

झुरणी - लेखणी

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 14/08/2008 11:07 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे....... कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
Taxonomy upgrade extras

तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 13/08/2008 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे. स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं? गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.

(वय साठावं लागलं की)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 13/08/2008 00:54 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची 'वय सोळावं सरलं की' ह्या तरल कवितेतल्या भावना साठीच्या 'हिरवट' चष्म्यातून पहायचा एक चाळा!

माझंही एक चित्रं..

लेखक स्मिता यांनी मंगळवार, 12/08/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळी..नमस्कार! ईथे बरीच चित्र बघितली, माझंही एक चित्रं टाकत आहे.. (नविन "कलादालन" काही सापडलं नाही बुवा) या चित्राचं एक मोठ्ठं पेंटिंग बघितलं आणि बसल्या जागी पेनने हे चित्र काढलेलं आहे. घरच्यांकडुन नेहामीच खरपुस समिक्षा व्ह्यायची चित्रांची, तेव्हा तुमच्याकडुन पण खरया आणि सुचक समिक्षेची अपेक्षा करते. :)

तुला खात्री आहे?

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 09/08/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
भोवती बघ.. थोडं तु खाली बघ इथे दिसणारे चेहरे बघ... तुला खात्री आहे?तुला इथेच पोचायचं होतं? हे तुझ्या भोवतीचे मित्र... पण हे आहेत का "खरे" मित्र? ते करतील का तुझ्यावर माझ्याइतकं प्रेम? तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? तु "हे" आयुष्य जगायच्या इतक्या घाईत आहेस त्यासाठी इतक्या वेदना दिल्यास.. दुखावलं आहेस भोवती बघ.. अगदी नीट बघ फक्त दोघे..तु आणि मी तुला खात्री आहे? तुला इथेच पोचायचं होतं? माझ्या अश्रुंमुळे मन वळवू नकोस, मी रडत नाहि... हे अश्रु हल्ली माझा भाग झाल्यासारखे वाटतात भोवती बघ.. अगदी नीट बघ सगळ्या भोवतालच्या सवयीच्या लोकांना बघ तुला खात्री आहे?