Skip to main content

अर्थव्यवहार

करभरणा, कराचे उगम, हक्क आणि मुंबई/महाराष्ट्र

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 09/05/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच येथील एका लेखात आणि प्रतिसादात आणि मित्रस्थळांवरील काही चर्चांमधून एक वाक्य पुनःपुन्हा वाचायला मिळाले. "मुंबई/महाराष्ट्रातून देशाला प्रचंड/हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळतो". वेगवेगळ्या लोकांनी हे वाक्य म्हणताना वेगवेगळ्या संदर्भात म्हटले असले तरी त्याचा गाभा जेथून हा महसूल मिळतो त्या प्रदेशांचा देशावर/किंवा संपत्तीच्या वाटपावर, सरकारी योजनांवर अधिक हक्क असायला हवा असा त्यातला अध्याहृत अर्थ होता. काहींनी तर हे मुंबई/ महाराष्ट्राचे देशावर उपकारच आहेत असा सूर लावला होता आणि महाराष्ट्र उभ्या देशाला "पोसत आहे" असा दावा केला होता. हे वाक्य प्रथमच ऐकायला मिळाले आहे असेही नाही.

"संधी दृष्टीकोन बदलण्याची....!!"

लेखक डावखुरा यांनी शनिवार, 08/05/2010 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
"लोकांची सत्ता येईल तेव्हाच लोकशाही मजबुत होईल. लोकांच्या हितासाठी कायदे येतील तेव्हाच लोकसत्ता येईल." कायदा कितीही उपयुक्त बनला तरीही तो अंमलात आणण्याची राजकीय ईच्छा शक्तीही तितकीच महत्त्वपुर्ण आहे. पण या नोकरशाही-भ्रष्टाचारयुक्त समजात योजनांचा लाभ गरजुंपर्यत पोहोचवणे ही स्वप्नवत भासणारी गोष्ट केवळ अशक्यप्राय आहे.

अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी मंगळवार, 09/02/2010 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
अमर्यादीत पैसे मिळविण्याची संधी प्रत्येक माणसाची एक सुप्त इच्छा असते कि आपल्याला इतके पैसे मिळावेत कि कोणताही खर्च करताना हात आखडता घ्यावा लागू नये. कोणी हे उघड बोलतो तर कोणी बोलत नाही. प्रबळ इच्छाशक्ती व त्याला सातत्य, नियमीत प्रयत्न यांची जोड दिली असता हे स्वप्न कोणत्याही व्यक्तीला पुर्ण करता येऊ शकते.

मार्केट १७००० च्यावर

लेखक दशानन यांनी बुधवार, 30/09/2009 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज मार्केट १७००० च्यावर गेले.... अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली ! आता काही प्रश्न ! ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ? जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ? भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे....

अर्ध्या गट्टूची किंमत!

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 12/08/2009 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो मॅडम, ते नेतायत ती गाडी तुमची आहे का?" माझ्यामागून हे विचारणार्‍याचा हात कुठल्याबाजूने निर्देश करतोय तिकडे बघत मी पाहिले तर माझीच अ‍ॅक्टीव्हा होती. मी धावतच त्या अवैध ठिकाणी पार्कींग केल्याबद्दल गाड्या उचलून नेणार्‍या गाडीकडे धावत गेले. "है मिस्टर, हाऊ यू डेअर्ड टू टच माय अ‍ॅक्टीव्हा?" "काय रे, हे कालेजातलं पाखरू काय फिसफिस करून र्‍हायलंय इंग्लिसमदी?" "थोबाड संभाळून बोल बे. जास्त फडफड करू नको. गपगुमान माझी गाडी खाली उतरव नाहीतर..." एव्हाना माझा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. योग्य ठिकाणी गाडी लावूनही ही दमदाटी ऐकून घ्यायला मी काही पोचट नाही. "न्हाईतर काय?" "नाहीतर काही खास नाही.

ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही. मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल. मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली.

पैशाने पैसा वाढतो.

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 05/07/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाने पैसा वाढतो. जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.

गोष्टी माणसांच्या

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
तो तसा ऊंचीने बेताचाच,पण अत्यंत कुशाग्र बुद्धीचा.त्याच्यापेक्षा वरच्या वर्गात शिकणारी मुलं त्याच्याकडे शंका घेऊन येत.भौतिकशास्त्र आणि गणित हे त्याचे आवडते विषय.... तो तसा गरीब घराण्यातला,पण घराणं सुशिक्षीतांच होतं,त्याचे वडील व्यवसायाने शिक्षक होते.. त्याच्या वर्गातील सर्वच मुले कुठल्या ना कुठल्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यास उत्सुक होती.त्यातल्या त्यात बुद्धीमान मुलं ही IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड करत.आपल्या मित्रांबरोबर हयानेही IIT च्या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरला.ह्या मुलांना मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं किंवा फ़ारशी पुस्तकही नव्हती त्यांच्या जवळ.म्हैसूर गावातल्या एका दगडी

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.