Skip to main content

जीवनमान

शौ(चौ) र्यनिखारे

लेखक मोगा यांनी बुधवार, 11/11/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला...

किल्ला

लेखक भीमराव यांनी मंगळवार, 10/11/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांन्न दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या मुहुर्तावर आमचा पहिलावहीला लेख.कृपया चुकलं माकलं सांगा. दिवाळीमधे किल्ला बनवन्याची प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहीत नाही, परंतु किल्ला हा प्रत्येक लहान मुलाची कल्पना शक्ती फुलवनारा नक्कीच आहे, दिवाळीची सुट्टी ही नवे कपडे, चिवडा, लाडु, फटाकडे या सर्वांपेक्षा या किल्ल्यामुळेच अधिक हवीहवी वाटायची. परीक्षा कधी संपतेय न कधी किल्ला बनवायला लागतोय असच होऊन जायचं. दिवाळीच्या आधीच बरेच दिवस साहित्याची जुळवाजुळव सुरु व्हायची.

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

मागे उभा मंगेश ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 08/11/2015 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा सांगायला हवीच आहे का? ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! ओढणी ती माथ्यावरी 'स्टोल' मुखा कव्हर करी मोबाइल रुळे उरी 'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा मी वासू इथे कधी तिथे बसू प्रेमी, म्हणावे की कामी? नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! इरसाल म्हमईकर
काव्यरस

असचं काहीतरी

लेखक बाजीगर यांनी मंगळवार, 03/11/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पप्पूने इन्फ़िल्ड ला किक मारली ,नारायण पेठेतली एवढीशी गल्ली,इफील्डचे इंजिन रोंरावू लागले  मग फिल्मी स्टाईल ने पाय फिरवून पप्पू गाडीवर बसला, नेहमीप्रमाणे आपली सर्व समावेशक नजर अवतीभवती टाकली  रजनीकांत सारखा गोगल डोळ्यासमोर धरून त्यातल्या प्रतीबिम्बातून पाठीमागे काय चाललाय ते पाहिले, मग सर्र कन फिरवून डोळ्यावर चढवला, दारातून आत नजर  फेकली तर आजी काहीतरी बडबड करत धडपडत येतांना दिसली .  आजी काय म्हणतेय ते गाडीच्या फायरिंग मध्ये काहीच कळेना.मग चावी फिरवून इंजीन बंद केले.  "काय म्हणतेस, आजी .

कोवळ्या वयातलं व्यसन

लेखक जातवेद यांनी रविवार, 01/11/2015 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती? माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे.

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 01/11/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती.

राष्ट्रीय पुरस्कार आणि आम्ही

लेखक nasatiuthathev यांनी शनिवार, 31/10/2015 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक पाहून धागा जरी राजकारणाशी संबधित वाटत असला तरी तो नाही --------------------------------------------------------------------------------------------------------- काल ख्वाडा पाहिला , प्रदर्शनापूर्वीच काही चित्रपटांना खूप पुरस्कार मिळतात त्या पैकीच हा १ चित्रपट. तसं पाहिलं तर गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्याचा सपाटाच लावलाय , माफ करा मी अजूनही राष्ट्रीय पुरस्काराचा विचार करतोय ..

काउंट डाउन...

लेखक आनंद कांबीकर यांनी बुधवार, 28/10/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
आपण क्षणा क्षणाला बदलत असतो. आपल्या गरजा बदलत असतात. आपण त्या वाढवत असतो. खाली यावं लागल याचा विचार हि न करता वरचढ़ होत असतो. वेळेसोबत आपली सहनशीलता कमी होते. वाढत असते ते परावलंबन आणि सीमा ओलांडून उपभोग घेण्याची सवय. सुरु असते उधळपट्टी, नासाड़ी. दहा जणांच्या गरजा भागवल असे एकटाच गिळु पाहतो. गिळतो. आणि मग निसर्ग ही थकतो, आपले लाड पुरवुन-पुरवून. त्याचा कल ढासळतो. तो बिथरतो. आपण ही बिथरतो पण आपण तुटतो. अगदी पार आतून बाहेरून तुटतो. आपल्या हाती काहीच नसते. त्याच्या बिथरण्यात सगळं चराचर नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्याच्या अशा बिथरण्याची सुरुवात म्हणजे अखिल मानव जातीचा 'काउंट डाउन' सुरु होतो.