समाज
कोणीतरी बाजूला सरकले असेल......
घरातील चार मुले चार दिशांना पांगतात. घरातील कर्ता पुरुष अंथरुणाला खिळतो. मग बागेत नको असणारे तण पुरुषभर उंच वाढू लागते. नको त्या कुठल्या कुठल्या जाडजूड वेली मोठमोठ्या झाडांना विळखा घालू लागतात. बाग गुदमरते. घर आकसू लागते. माईंचे वय झालेले, उमेद संपलेली. पण नवऱ्याची अहोरात्र सेवा, त्यात खंड नाही. अशात लाडली नावाची मांजरी घरात येते, जीव लागतो. ती गर्भार मांजरी एके दिवशी नाहीशी होते. तिला शोधशोधून माई थकतात. त्याच रात्री नवर्याचा जीव जातो. सभोवती कुट्ट काळोख. त्या काळी इतकी संपर्कसाधने नव्हती. जवळ दुसरे माणूस नाही.
(धागा काढण्याची तल्लफ)
स्वामी चरणी समर्पित
...
डोक्यातील उजेड कमीकमी होऊ लागला
वाचण्यातील साधेपणा संपू लागला
तेव्हा मी धागा काढण्याचा विचार करू लागतोच....
तर्कशुद्धीला ठेंगा, वायफळांचा मळा
आशयाची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला हेतूच दिसेनासा झाला !
धागा काढल्यावर चर्चा होईलच
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोक्यातील उजेड संपताना, संपू द्यावा
उगाचच हसे होताना, होउ द्यावे
मुळातच धागा बदबदा काढू नये
वाचकांना कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय स्वधाग्याचीही वाट लावू नये
आता, डोक्यातील जळमटांना तसेच ठेउ नये
जाउ पाहणाऱ्या शब्दकचर्याला थोपून ठेवू नये.....
धागा काढण्याची तल्लफ मात्र.....??
तल्लफ काही माझ्या आधी
विहीर खोदण्याचा विचार
विहीर खोदण्याचा विचार...
डोळ्यांतील उजेड कमीकमी होऊ लागला
हसण्यातील सच्चेपणा संपू लागला
तेव्हा मी विहीर खोदण्याचा विचार करू लागले....
जमिनीला भेगा, उन्हाच्या झळा
पाण्याची पातळी इतकी खोल
इतकी खोल....
कि आतला लाव्हाच दिसू लागला!
विहीर खोदल्यावर पाणीच लागेल
हे मी तरी कशाच्या आधारावर ठरवले?
डोळ्यांतील उजेड संपताना, संपू द्यावा
उन्हात हसू हरवताना, हरवू द्यावे
दुष्काळात विहीर खणू नये
जमिनीला कष्ट देऊ नयेत .....
इतकेच काय पावसाचीही वाट पाहू नये
आता, डोळ्यातील क्षीण उजेडाला फसवू नये
संपू पाहणाऱ्या हसण्याला धरून ठेवू नये.....
विहीर खोदण्याचा विचार मात्र.....??
विचार काही माझ्या आधीन नाह
दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर
आशाळभूत नजरेने.
किती बाहेर ?
मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर..
ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे...
समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे,
हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ...
देतील का ते मला सिंहासन मिळवून ???
पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे.
चुस्त, मस्त, व्यस्त ....
चतुर, धाडसी, जबरदस्त ...
नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत.
चौकीदाराला मिठी मारून झाले ...
(तू मतदार माझा)
प्रेर्ना - विळखा पाहू
तू मतदार माझा
भोट, भोंगळ अजीजी
तुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा
मस्तवाल नेता मी ....
घेऊन जमेस तुला
निव्वळ उगी तुंबडी भरावी
बोभाटा करावा मी एव्हढा
की लाभावी मज(समोरची) वाटणी
सर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.
वाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
(जळवे)
तमाम मिपाकरांच्या (माझ्या सहित) ,भोचक व वरकरणी मदतीआड त्रस्त पिडणार्या नातेवाईकांना समर्पित
**********
हेच ते पिडणारे पळवे जळवे
ज्यां(च्या)मुळे तुझे जगणं काळजीने पोखरून ठेवलेस!!
पाठिंबा वा संमती असती तर
हे जळवे शक्तिने तांडून
लगेच दृष्टी आड घालून
विस्मृतीत टाकले असते...
ना ही कुतरओढ कसोटी भाळी असती...
ना भोचक डोळे खुपसून (देत)
न संपणार्या टिकेलासुद्धा
सोसत राहिले असते....
ना टोमण्यातून तुझ्या भळजखमा टोकरत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या प्रिया, सगळ्यांना
आप्त ( नातलग) निवडायची संधी पसाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
रूपक कथा: भव्य देवालय आणि भक्त
भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.
आता अवतारी देवता म्हणाल तर, त्या देवतेची पत्नी, पोरे-पोरी, सासू- सुना इत्यादी मंडळी हि येतीलच. मुख्य देवते सोबत मंदिराच्या आवारात त्यांची हि स्थापना केलेली होती. मुख्य देवेतेप्रमाणे याही देवता शक्तिशाली होत्या. भारी-भरकम दक्षिणा मोजल्यावरच देवतेची अनुकंपा भक्तांवर व्हायची.
(बंद कळफलकामागचा वाचक)
एक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा
कसले मिपा ?
स्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार
जिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध....
करत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार?
वाचत असेल का तो ही
इतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे?
वाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही...
मग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो,
ते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन
लेखक निवांतपणे मख्ख राहतो....
मिपा हरवलेला वाचक
जुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो,
पुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...
वाचकांचीच पत्रेवाला नाखु
शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी
काल रद्दी घालण्यासाठी न्यूजपेपर पोत्यमध्ये भरत होतो. त्यावेळी गेल्या वर्षीचा एक पेपर हातात पडला. सहज नजर फिरवली तर काही हेडलाईन्स वाचल्यानंतर वाटलं या बातम्या जर क्रमाने लावल्या तर शेतकरी आत्महत्या, कारणे आणि उपाय सगळेस समजेल
पहिल्यांदा बातमी होती ती म्हणजे यंदा ९८% पाऊस!! म्हणजे सगळ्यात पाहिलं गेम निसर्गाने केला..!! लगेच दुसरा हल्ला तो म्हणजे मान्सून कमीपण आणि उशिरापण..!! निसर्गानं शेतकऱ्याच्या नशिबाला हा बेभरवशी पांडू जो पडला तर अगदी मुसळधार आणि नाही तर यंदा काही खरं नाही.
मान्सून पण काय त्याच्या मर्जीने चुकत नाहीच.
मिसळपाव