Skip to main content

समाज

बाजारात तुरी.....

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 17/03/2017 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
१. महाराष्ट्रात तुरीची उत्पादकता एकरी ४०० किलोसुद्धा नाही. यंदाच्या शासकीय आकडेवारीचा संदर्भ घेतला तर 37,80,712 एकरांवर ११ लाख ७० हजार मेट्रिक टन तुरीचे उत्पादन झाले, म्हणजे साधारण एकरी ३०९ किलो. पण आकडेवारी अचूक नसते म्हणून आपण आपल्या सोयीसाठी वाढीव आकडा म्हणजे एकरी ४०० किलो उत्पादन धरूया. हमीभाव ५०५० रुपये प्रति क्विंटल आहे. पण आवक प्रचंड वाढल्याने आणि आधारभूत खरेदी केंद्रात नंबर येण्याची वाट पाहणे परवडत नसल्याने काहींनी खासगी व्यापाऱ्यांकडे जेमतेम ३००० रुपये प्रति क्विंटल दरानेसुद्धा विकली आहे. पण आपण मिळालेला सरासरी दर ४००० रु./क्वि गृहीत धरूया.

जाऊ शकते-तीच जात!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 16/03/2017 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. व्रुत्ता प्रमाणे एक नवीन कायदा येतोय.. 'अंतर्जातीय विवाहितांच्या संरक्षणाचा'. सदर कायदा हा आमच्या मते अतिशय कौतुकास्पद निर्णय आहे. https://scontent-lax3-2.xx.fbcdn.net/v/t31.0-8/fr/cp0/e15/q65/17310118_1814617218860381_2113214286324950828_o.jpg?efg=eyJpIjoiYiJ9&oh=dd09ddc726cae9ec913d2f3f4c972085&oe=59586BDB पण.....

ग म भ न ....

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/03/2017 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
सकालधरन॓ माय लय आटवत हुती उनात बसून बिडी वडताना तिची कूस याद आली बिडीच्या धुरानं बी आसल, डोल्यात पानी पानी आलं आन येकदम म्होरं हुबी दिसली गोरी-चिट्टी मास्तरीन सूध भाशेत म्हनली ,” बारा वर्षांचा ना रे तू? आजपास्न॓ बाराखड़ी शिकायला रोज दुपारी भंगार-डेपोच्या समोर येत जा. आणि बर॓ का, रोज तास झाल्यावर दूध-पाव मिळेल” मी सिकाया गेलो.

सामाजिक उपक्रम - २०१७

लेखक निशदे यांनी गुरुवार, 09/03/2017 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मित्रपरिवाराच्या साथीने गेली ७ वर्षे आम्ही स्वयंसेवक हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आलेलो आहोत. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. उपक्रमाविषयी थोडेसे: माझ्यासह सुमारे ७-८ स्वयंसेवक दरवर्षी एक सामाजिक उपक्रम चालवितात. महाराष्ट्रातील ज्या सामाजिक संस्थांना सरकारकडून कमी मदत मिळते(अथवा मिळतच नाही) किंवा ज्या संस्था मुख्यत्वे देणगीदारांवरच चालतात अशा गरजू संस्थांना मदत मिळवून देण्याचा हा उपक्रम आहे. यावर्षी या उपक्रमाचे आठवे वर्ष आहे.

मी बाई होते म्हणुनी - भाग १४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 07/03/2017 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वाड्यापासुन वनविहाराची नवीन जागा बरीच लांब होती, तिथे पोहोचेपर्यंत कुणीच काही बोललं नाही, असे ही त्या रथाच्या खडखडाटामध्ये काही ऐकु येणं शक्य ही नव्हतं. आम्ही वनाजवळ पोहोचलो आणि रथातुन उतरुन विश्रांतीस्थळाकडे चालत निघालो, दहा बारा योजने चाललो तेवढ्यातच राजा दशरथ आणि राजकुमार आल्याची सुचना घेउन एक सैनिक आला, आम्ही त्यांच्या स्वागतासाठी होतो तिथेच थांबलो. राजा दशरथ स्वत्ः सगळ्यांत पुढे होते, त्यांच्या डाव्या बाजुला राम आणि भरत तर उजव्या बाजुला लक्ष्मण आणि शत्रुघ्न होते.

भिल्ल भारत: शेवटचा भाग

लेखक मिडास यांनी सोमवार, 06/03/2017 04:42 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग पूर्वरंग:- अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे.

मी बाई होते म्हणुनी - भाग १३

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 28/02/2017 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिथुन निघाले, मनांत काही विचार चालु होतेच, समोरुन काही दासी येताना दिसल्या त्यांना एका कामाला लावलं अन् माझ्या दालनात येउन माझी तयारी सुरु केली, काही मोठया पेटयात ठेवलेले सामान काढायला लावलं, तेवढ्यात मगाशी गेलेली दासी परत आली, तिनं येउन सांगितलं की त्या दोघी सुवर्णलंकाराच्या सहित निळ्या रंगांच्या वस्त्रांची तयारी करत आहेत, मी देखील माझी तयारी करायला सुरुवात केली, काही वेळानं आई दालनात आली, आणि त्याचवेळी मी मागवलेल्या वस्तु घेउन दासी सुद्धा येत होत्या, त्यांच्याकडं पाहुन आईनं विचारलं, हे काय आहे, उर्मिले, हे सर्व का मागवलं आहे आज,.... ...

असेही आहेत शिक्षक !

लेखक माहितगार यांनी सोमवार, 27/02/2017 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
जिल्हा परीषद प्राथमीक शाळा, लमाण तांडा, बेळंब मराठी भाषा दिवसाच्या निमीत्ताने मराठी विकिपीडियावर बरेच काही लेखन होत असते. सगळेच ज्ञानकोशीय परिघात बसणारे नसते. असाच एक अनुभव उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील लमाण तांडा, बेळंब येथील जिल्हा परिषद प्राथमीक शाळेच्या श्री.खोसे उमेश रघुनाथ ( सहशिक्षक ) यांनी शेअर केला आहे. खरेतर तो त्यांच्याच शब्दात वाचणे उत्तम राहीले असते, पण विकिपीडियावरील माहिती स्थानांतराबाबत झालेल्या नाराजीमुळे माझ्या स्वतःच्या शब्दात अंशतः तरी रुपांतरीत करण्या शिवाय पर्याय नाही. शिक्षक उमेश खोसे यांना 15 जून २००७ रोजी जि.पं.प्रा.शाळा लमाण तांडा बेळब ता.

मराठी; समस्येची पाळंमुळं

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 26/02/2017 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
जुना, बराच चर्चिलेला विषय आहे, त्यामुळे संपादकांना वाटल्यास धागा अप्रकाशित करू शकता. मराठीदिनानिमित्त टाकावा वाटलं, म्हणून. सदर लेख लोकमत वृत्तपत्राच्या हॅलो ठाणे पुरवणीत २५-०२-२०१७ रोजी प्रकाशित झाला असून त्याची विस्तारित आवृत्ती या ब्लॉग पोस्ट मधे देत आहे. प्रकाशनाबद्दल #लोकमत चे आभार. लोकमत मधील लेख चेहरा, नाव यानंतर एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून जर कुठली तिसरी गोष्ट गणली जाऊ शकत असेल तर ती त्या व्यक्तीची भाषा असते.

जिभाऊ

लेखक चंद्रकांत यांनी शुक्रवार, 24/02/2017 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
जिभाऊ डोक्यावर अस्ताव्यस्त विखुरलेले केस वाऱ्याच्या संगतीने नाचत राहायचे. बहरात आलेल्या पिकात वारा शिरून सळसळ होतांना हालचाल व्हावी, तसे डौलात डोलत राहायचे. त्यांच्या स्वैर विहाराला मर्यादांचे बांध क्वचितच घातले जात. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने डोक्यावर टोपी विसावलेली असायची, तेव्हाच हे घडायचे. अन्यथा स्वतःला बंदिस्त करून वावरण्याचे प्रसंग त्यांच्या वाट्याला फार कमीच. कारण टोपी प्रासंगिक निमित्तालाच परिधान करायची, हा जिभाऊचा स्वतःपुरता अलिखित नियम. टोपी नसायची तेव्हा डोक्यावर बागायतदार रुमालाचे मुंडासे गुंडाळलेले.