Skip to main content

संस्कृती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २५

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी मंगळवार, 27/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. गुरुजिंच्या या वागण्याचा पाठशाळेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांवर असा काहि जबरदस्त परिणाम घडलेला असायचा. कि तो विद्यार्थी कित्त्तीहि स्वच्छंदि वगैरे असला,तरीही...जर पड्लच काहि चुकिचं पाऊल,तर ते पडण्याआधी गुरुजिंचा चेहेरा त्याच्या डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नसे! पुढे चालू... ============================== दिवसामागुनी दिवस चालले... ह्या गाण्यातील ओळींप्रमाणे त्यातला पुढचा जो भाग , तो जीवलगा..कधी रे येशील तू??? हा ही वेदपाठशाळेच्या-हरएक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातला समान धागा..

सरस्वती पूजन

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 26/01/2015 20:07 या दिवशी प्रकाशित केले.

उत्तर भारतात वसंतपंचमी साजरी केली जाते. आपण शाळांतून तोच सण सरस्वती पूजन म्हणून साजरा करतो. यंदा २४ जानेवारीस वसंतपंचमी होती. खरे तर हा सुगीचा सण सर्वच भारतात आनंदाने साजरा केला जातो. विवेक पटाईत ह्यांच्या लेखात केवळ वसंतपंचमीचाच उल्लेख आहे. मात्र सुगी साजरी करण्याचे मार्ग अनेक आहेत! चला तर ह्या सुगीच्या बहारीचे आपणही स्वागत करू या!

पोपटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/01/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/01/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे.. पुढे चालू... ======================================= पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय???

पालखी :: आजोळच्या गोष्टी - ४

लेखक गुळाचा गणपती यांनी सोमवार, 19/01/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आजोळच्या गोष्टी - ८ सकाळची सी. एस. टी. फास्ट लोकल पकडून डोंबिवलीतून निघालो. तोच रोजच्या प्रवासी मंडळींचा भजनांचा आवाज सुरु झाला. मन लावून मी भजन ऐकले. खरा सांगायचं तर मला भजनाचे बोल ऐकूच येत नव्हते किंवा गाणारे, वाजवणारे लोकही दिसत नव्हते. ऐकू येत होता तो फक्त आवाज, जाणवत होता फक्त उत्साह, सभोतालचे पळणारे जग विसरून, ईश्वर स्मरणात हरवून थोडा वेळ का होईना स्वतःसाठी जगण्याचा एक मनापासून केलेला प्रयत्न. मृदुंगाच्या थापा ऐकून सैरभैर व्हायला झालं. टाळांच्या आवाजाने मन वेडं झालं, बावरं झालं आणि पोचलं थेट कृष्णेच्या काठाशी, उंबराच्या झाडाखाली आणि दत्तमाउलींच्या पायाशी.

क्रिसमसची रोषणाई

लेखक जुइ यांनी सोमवार, 19/01/2015 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, जसे आपल्याकडे गौरी गणपतीची दुकानांमध्ये आणि घरोघरी धामधुम असते तशीच ईथे (म्हणजे अमेरिकेत) क्रिसमसची धामधुम असते. थॅकंसगिव्हिग डे झाला की क्रिसमच्या विविध सजावटीच्या वस्तू मॉल व दुकानांमध्ये दिसू लागतात. यामध्ये असतात क्रिसमस ट्रीज, कँडीज, रोषणाईच्या दिव्यांच्या माळा व लहान मुलांसाठी क्रिसमस व्हिलेज इत्यादी.

आरती

लेखक सतिश गावडे यांनी शनिवार, 17/01/2015 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी कळव्यावरुन फोन आला. "मला गुरुजींसाठी आरती लिहायची आहे." मी म्हटलं चांगलं आहे; लिहा की. फोनवरचा आवाज अडखळला. मी काय झाले असे विचारताच "मी आता तांब्या पंथाची दीक्षा घेतली आहे. मला आरती लिहिणे जमणार नाही. तुम्ही लिहून दया ना." मी प्रयत्न केला. -------–------------------ अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी तुझा तांब्या मी वाहीन तुझाच दास मी होईन गायछापाचा नैवैद्य तुजला जिलबीचा प्रसाद दे मजला जरी थांबेन मी दाबून नीट आतल्या आत पडेल पीठ येऊ दे माझी तुला करुणा लल्लल्लल्लल्ललू दयाघना अत्रुप्त आत्मा माझे आई स्थाण दयावे तुझे पायी

निथ साँग - निंदानालस्तीस मुक्त आणि शिवराळ एस्कीमोंची एक जुगलबंदी गायन-न्याय परंपरा

लेखक माहितगार यांनी शनिवार, 17/01/2015 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
कशावरून कुणाच्या भावना दुखावल्या जातील याचा नेम नसतो म्हणून तर आपण मकर संक्रांतीला तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणतो पण अवघ्या दिड - दोन महिन्यात धूलीवंदन आणि होळी येते आणि मग दिल्या घेतल्या शिव्यांची... मनमोकळी उधळण अधिकृतपणे करता येते. गोडगोड बोला हे कृत्रिम संस्कृतीकरण तर शिव्या देऊन मनमोकळे करणे हे अकृत्रिम आणि नैसर्गीक. हि होळीची शिवराळ परंपरा आपण होळीच्या निमीत्ताने जपतो तशीच एक वेगळी परंपरा एस्कीमो लोक जपतात त्या परंपरेला निथ साँग म्हणतात. एस्कीमोंच्या निथ साँगचे वेगळेपण ?