लयं भारी !!!
उत्तम माहिती आणि झकास लेख... :)
क्लिंटनराव असाच वेळात वेळ काढुन तुम्ही लिहीत रहा...
(हिंदूस्थानी)
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
सुरूवात छान झाली आहे. 'इंडिया आफ्टर गांधी'मध्ये रामचंद्र गुहांनी म्हटल्याप्रमाणे जरी भाषेवर आधारित राज्यांमुळे काही तंटे निर्माण झाले असले तरी एकाच वेळी आपला भाषाभिमान आणि देशाभिमान जोपासण्याची सोय झाली आणि प्रादेशिक साहित्य आणि कलांना राजमान्यता (प्रतिष्ठा आणि अर्थसहाय्य) मिळाली, हे त्याचे मोठे फलित मान्य करायला हवे. पुढील भागांची वाट पाहतो आहे.
उत्तम आणि समयोचित विषय. माहिती पण अगदी नेमकी आणि व्यवस्थित संकलित केली आहे. वाचतोय.
माझे दोन पैसे :
जसे मुंबई हे एक मेल्टिंग पॉट शहर आहे तसेच मद्रासही. विशेषेकरून तेलगू (मद्रास प्रॉव्हिन्सचा तेलगू भाषिक भाग ज्याला आता 'आंध्रा' असे म्हणतात), तमिळ (पूर्ण तमिळनाडू), कन्नड (मैसूर संस्थान, मद्रास प्रॉव्हिन्सचा कन्नड भाषिक भाग) आणि मलयाळम (केरळ, त्रावणकोर, कोचिन, त्रिवेंद्रम वगैरे) या चार भाषिक जनतेने फुलवलेले असे या शहराचे ऐतिहासिक दृष्टीने वर्णन करता येईल. भौगोलिक दृष्ट्या हे शहर आंध्र भाषिक भागाला जवळही आहेच. पूर्वापार, इथे तेलुगू भाषिकांची खूप मोठी वस्ती होती आणि अजूनही आहे. (स्थानिक भाषेत त्यांना गुल्टी म्हणतात.) त्यांनी तमिळ ही संपर्क भाषा म्हणून स्वीकारली आहे तरीही तेलुगू भाषा अजूनही तिथे सुस्थितीत आहे. आंध्रप्रदेशच्या आंदोलनात मद्रासवरून खूपच तणातणी झाली पण तो अस्मितेचा प्रश्न बनला नाही त्यामुळे पुढे शांत झाला. सध्या कोणताही तेलुगू भाषिक मद्रास आमचेच असे म्हणताना आढळत नाही.
कर्नाटकातला उत्तर भाग, बीदर विजापूर वगैरे, त्याला निझाम कर्नाटक म्हणतात (आणि धारवाड वगैरे भागाला बॉम्बे कर्नाटक म्हणतात...) तिथेही अगदी थोड्याफार प्रमाणात कर्नाटकातून फुटायची भावना आहेच. पण भाषिक अभिमान वरचढ असल्याने अजून तरी तो प्रश्न म्हणावा तसा ऐरणीवर आल्यासारखा दिसत नाही.
थोडा अजून विचार करता, तेलंगण मराठवाडा उत्तर कर्नाटक वगैरे भाग हे पूर्वी निझाम स्टेट मधले भाग, एका मोठ्या आणि महत्वाच्या कालखंडामधे बाकी भागात झालेल्या आर्थिक / राजकिय आणि सामाजिक विकासापासून वंचित राहिल्याने मागे पडले आणि अजूनही मागेच राहिले. (दे कुड नॉट कॅच अप कंप्लिटली). त्यामुळे आम्हाला स्वतंत्र करा, आमचा विकास आम्हीच करून घेऊ असा काहीसा स्वप्नाळू आशावाद या सगळ्या वेगळ्या राज्यांच्या निर्मितीच्या मुळाशी आहे असे दिसते. (या प्रकाराचे अगदी चांगलेच साम्य आता जर्मनीतही दिसत आहे. पूर्वीचा पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी यांच्यातील असमतोल साक्षत जर्मनांसारख्या दुर्दम्य आशावादी, कामसू आणि जिद्दीच्या लोकांचीही दमछाक करत आहे.)
बिपिन कार्यकर्ते
आंध्रप्रदेशच्या आंदोलनात मद्रासवरून खूपच तणातणी झाली पण तो अस्मितेचा प्रश्न बनला नाही त्यामुळे पुढे शांत झाला. सध्या कोणताही तेलुगू भाषिक मद्रास आमचेच असे म्हणताना आढळत नाही.
ह्याबाबत तेलुगुभाषिक मित्रांकडुन असेही ऐकले आहे कि आंध्रप्रदेशला तिरुपती अथवा मद्रास ह्या दोहोंपैकी एकाचीच निवड करायची अट घातली गेली होती.आंध्रप्रदेशने तिरुपती निवडले.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
आंध्रप्रदेशला तिरुपती अथवा मद्रास ह्या दोहोंपैकी एकाचीच निवड करायची अट घातली गेली होती.आंध्रप्रदेशने तिरुपती निवडले.
हे बहुधा खरे नसावे. अशी माहिती कुठे आढळली नाही. असल्यास दुवा द्यावा.
अर्थात, चेन्नईत (एकंदरीत तामिळनाडूच्या उत्तरेकडील भागात) तेलुगु भाषक बरेच आहेत. आपले माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हेही चेन्नईची तेलुगु भाषक. तंजावूरच्या महालात अनेक तेलुगु लिपीतील मराठी ग्रंथ आहेत. आणि त्याचबरोबर, तिरुपतीत अक्षरशः असंख्य तामिळ भाषक राहतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
राज ठाकरें सारख्या लोकांस थंड पाडण्याकरिता.
आमचे एक मित्र एका आंग्लभाषी वृत्तवाहिनीचे मालक आहेत. त्यांना ह्यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांचे म्हणणे असे पडले: मनमोहनसिंगांनी हा आततायी निर्णय घेण्याचे कारण एकच, ते म्हणजे राज ठाकरे आणि त्यांच्यासारख्या भाषिक अस्मितेच्या राजकारणाने शक्तिवर्धन करू शकणार्या छोट्या राजकारण्यांचे पंख कापणे.
तेलङ्गाणा काय किंवा इतर राज्ये काय, स्वतंत्र छोटी राज्ये मागण्यामागे बिल्डर लाबी असल्याचे माझे स्वत:चे मत आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात बिल्डर लाबी आजएवढी जोरावर नव्हती. असो. त्यावर विस्तारानेच लिहावे लागेल.
हैयो हैयैयो!
श्री.हयो हैयैयो,
आपले सदर मित्र ह्यांचे "भाषिक अस्मितेच्या आधारे राजकारण (होय, मी शक्तीवर्धनापेक्षा राजकारण हा शब्द वापरणे पसंत करेन.) करण्याला सुरुंग लावण्याच्या" मताबद्दल अधिक जाणुन घ्यावेसे वाटते. कदाचित हा उच्चपदस्थांचा एक दृष्टीकोन सर्वसामान्यांच्या नजरेस पडला तर उत्तमच, नाही का?
बाकी, बिल्डर लॉबीसंबंधी आपल्याशी सहमत. हैदराबादसारखे आय.टी.मध्ये पुढारलेले शहर आणि तिथली वाढ पदरात पाडुन घेण्यासाठी सवलती मिळवणे इत्यादींबाबत हे होऊ शकते असा माझा कयास.
ह्याशिवाय, स्वतंत्र मंत्रीमंडळ, त्यायोगे मिळणारा स्वतंत्र निधी आणि त्यापुढे त्या निधीची लावावयाची वासलात.... बरेच पैलु असावेत ह्या विषयाला.
तुर्त तरी काहीच कळत नाही.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी