अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे
अंहं, तस्स काय नाय...! :S
संकेतस्थळावरील बंद असलेल्या खरडवह्या, व्य.नी. चालू झाले की टिआरपी वाढेल. :)
-दिलीप बिरुटे
अश्या भावना मनी येतात अनेकदा अन ते साहजिकच आहे. मनुष्य बहुतेकदा स्थितीप्रिय असतो म्हणुन बदल होताना असे होते. पण असा माणुस देखिल बदल हळुहळू का होईना स्वीकारतो हे देखिल सत्यच आहे. बदल होत असताना ज्या भावना मनी उमटतात त्यांचे यथार्थ चित्रण या कवितेत केले आहे. त्याबद्दल आपले कौतुक आणि सभोवताली होणारे बदल समजण्यासाठी व स्वीकारण्यासाठी शुभेच्छा!
कवियत्रीला ह्या काव्यातून मनातील खोलवर रुतलेल्या व्यथा फार सामर्थ्याने शब्दरुपी वेलीवर चमेलीच्या फुलांप्रमाणे उमलवल्या आहेत.
त्यांनी चपखलतेने कळणारही नाही अशा लालित्यांने ज्या "चंपी-चंपी राम राम" सारख्या टपला मारल्या आहेत त्या खावुन गुदगुल्या झाल्या की वेदना हेच मुळात कळत नाही व काव्यरसिक टपला खात-खातच काव्यात दंग होऊन जातो.
काही प्रतिसादकांनी ह्या काव्यप्रकाराला "सुडंबन" असे उचित नाव दिलेच आहे; त्या विषेशणाची प्रचिती ह्याच नव्हे तर कवियित्रीच्या इतर काव्यातूनही ठायी-ठायी दिसून येते.
लवकरच त्यांनी एखादे काव्यपुष्पगुच्छ रसिकांच्या समोर ठेवावे अशी त्यांनी कळकळीची विनंती (किंमत मात्र रुपये ४० च्या वर असू नये).
मोडक रॉक्स... (ऑन द रॉक्स नव्हे! ;) )
वरच्या सगळ्यांशी कुठे सहमत तर कुठे असहमत!
अदिती-जी,
आपल्या कवितेच्या नादमयतेमुळे कविता आवडली. त्यातील अर्थपुर्ण रचनेला लाल सलाम!
बाकी, नंदनशेठ, एकदा तुम्ही उर्दु-अरबी-फारसी ह्यांच्या फरकावर अभ्यास कराच.
केफ हाल? खुल्लु तमाम? ;)
(अल् तमाम) धमाल खलिफा.
आमचि वैयक्तिक कुवत काढायचे ईथे काहिच कारण नव्हते.
खरे पाहता आणिबाणीत सुद्धा विडंबन आवडले का नाही हे जाहिररित्या सांगायचा अधिकार आम्हाला आहे.
आता हे विडंबन आम्हाला आवडले नाही हे आमचे व्यक्तिगत मत होते. त्यात आमची समज काढायचा तुमचा उद्देश नाही कळाला. केवळ वैयक्तिक आकसापोटी आपण आम्हाला वरचा प्रश्न विचारला आहे असे वाटते. चालायचेच असो
विडंबन नाही आवडले तद्दन गल्लाभरु वाटले हे आमचे मत आम्ही नाहि बदलणार
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
माननीय अदितीजी
आपण हल्ली केवळ शनिवारचा उतारा टाकायचा म्हणुन काहीतरी टंकुन टाकता असे वाटते. आपली प्रतिभा पुर्वीसारखी राहिली नाही असे वाटते. तरी आपण काही दिवस सुटी काढुन जगभर फिरुन यावे, कदाचित आपल्या प्रतिभेला नवघुमारे फुटतील असे वाटते. मात्र वेळोवेळी आपण कोठे आहात हे कळवत जावे जेणेकरुन आम्ही तो भाग टाळत जावु.
धन्यवाद.
--अवलिया
माननीय श्री. अवलिया-जी ह्यांच्याशी तहे-दिल सहमत आहे. उगाच बोटांना चाळा म्हणुन कळफलक बडवावा आणी त्यातुन कहितरी निष्पन्न झाले की त्यास विडंबन म्हणावे हे पटत नाही.
असो..
अबोल अबोल
टिआरपी घटेल
हे संकेतस्थळ
शांत आहे
कविता अप्रतिमच. ओशो महर्षींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा प्रवास सं*गाकडून समाधीकडे व्हायला हवा. माणसाचा होतो का नाही ते माहीत नाही पण पूर्वीचे आणि आताचे हे संकेतस्थळ पाहता संकेतस्थळांचा होतो असे वाटते. हेच या शेवटच्या कडव्यात प्रतित होत आहे असे वाटते.
(समाधिस्थ संस्थळ सदस्य)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी