देशातील गरिबी आणि गहजब
💬 प्रतिसाद
(10)
र
राजेश घासकडवी
Mon, 04/05/2010 - 08:21
नवीन
घाटपांडेसाहेब, अतिशय छान लेख. जगभर तुटपुंज्या आकडेवारीचे चुकीचे अर्थ काढून संख्याशास्त्राला लोकांनी अतिशय वाईट वागणूक दिलेली आहे... सरासरीला महत्तम म्हणणे, सेवनाला उत्पन्न म्हणणे... व आश्चर्य म्हणजे कुडमुड्या ज्योतिष्याच्या भविष्याप्रमाणे लोकं मुकाट्याने प्रश्न न विचारता हे आकडे गिळतात. भारतात गरीबी आहे यात वादच नाही, पण प्रगती होते आहे की नाही, कुठले मार्ग उपयोगी पडतात, व कुठले निरुपयोगी आहेत याची साधकबाधक चर्चा करण्यासाठी जरूर असलेली शिस्त बाळगली नाही, तर आकडेवारीचा उपयोग होण्याऐवजी दुरुपयोगच होतो...
राजेश
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Mon, 04/05/2010 - 09:28
नवीन
छान लेख. कुणीतरी म्हंटलेच आहे-तीन प्रकारची असत्ये असतात-
lies,damn lies and statistics.
भेंडी
P = NP
- Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा
गुरुवार, 04/08/2010 - 18:48
नवीन
खरं आहे. बेंजामिन डिझरायलीनं म्हटलं आहे ते.
आळश्यांचा राजा
- Log in or register to post comments
अ
अरुंधती
Tue, 04/06/2010 - 12:20
नवीन
खरं सांगू का? मला ही सर्व आकडेवारी पाहूनच घाम फुटतो, गरगरायला होतं.... अगदी वर्गात गणिताच्या तासाला मास्तरांनी किंवा चिडकुट्या बाईंनी वर्गात उभे करून अत्यंत अवघड गणिताचं उत्तर [जे मला माहीत नसतं!] विचारावं असं काहीतरी.... माझ्या आईला कळेल हे सारे.... स्टॅटिस्टिक्स म्हटलं की बाईसाहेब तरंगायला लागतात.... पण मग मलाच का बरे कळू नये? :P
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 04/06/2010 - 17:34
नवीन
प्रकाशराव, एकदम माहीतीपूर्ण लेख.
ह्याच संदर्भात मार्च २८ ला पी. चिदंबरम यांचे खालील विधान पहा:
मला सेनगुप्तांविषयी विशेष माहीती नाही. पण त्यांच्या बद्दलची माहीती जालावर वाचताना, ते जर डाव्या विचारसरणीला जवळचे असले तर आश्चर्य वाटायला नको. त्यांना संपुआ सरकारने जेंव्हा या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले तेंव्हा ते सरकार कम्युनिस्टांच्या पाठबळावर चालले होते हा देखील एक मुद्दा आहे. त्या मुळे आकडेवारी काय आहे या पेक्षा कशी दाखवली जाते हे त्यांनी अथवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचा वापर करणार्यांनी फायदा घेतला तर आश्चर्य वाटायला नको. आणि अर्थात हा फायदा करणारे साम्यवादी आहेत हे त्याहूनही आश्चर्यकारक नाही...
पण मला या आकडेवारी बरोबर अथवा चूक ठरवणे इतक्याने हे विश्लेषण मर्यादीत करावे असे वाटत नाही. आज भारतात (तुर्तास भारतापुरतेच मर्यादीत ठेवूया, पण इतरत्रही) आर्थिक दरी किती ह्याची स्पष्ट आकडेवारी माहीत नसली तरी जिथे जिथे गेलो आहे, तेथे जाणवली आहे. ती केवळ रस्त्यावरील असहाय्य व्यक्तींपुरतीच मर्यादीत नसून कनिष्ठ वर्ग, कनिष्ठ मध्यमवर्ग आणि काही अंशी मध्यमवर्गाशी पण निगडीत आहे. याचा अर्थ ज्यांना (प्रामाणिकपणे) पैसे मिळत आहेत त्यांना अपराधी वाटायचे कारण नाही, आणि इतरांना दारीद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी त्यांचे पैसे कमी करायचे असाही मुद्दा नाही/म्हणायचे नाही. पण दरीच नाही अथवा तितके गंभीर नाही असे म्हणणे मला अयोग्य वाटते. इतकेच म्हणायचे आहे.
आज आपण अगदी कौतुकाने सांगतो की कामाठ्यापासून कंत्राटदारापर्यंत आणि कामवाली पासून ते घरवालीपर्यंत सर्वांकडे मोबाईल फोन्स आहेत म्हणून. पण त्याच कामाठ्याला अथवा कामवालीला कुटूंबाचे आरोग्य, मुलभूत सुविधा (अन्न/वस्त्र/निवारा), शिक्षण आदी जमू शकते का? याचा देखील विचार करायला हवा.
तसेच जर उच्च वर्गात होणारे गुन्हे आणि तसे गुन्हे करणारे उच्च वर्गातील तरूण, आत्महत्या, घटस्फोट आदी मानसीक दबावातून घडणार्या घटना, ह्यांतून पण "नको तिथे/नको तसे" पैशाचे वाढलेले महत्व देखील चिंतनीय आहे.
कधी काळी डॉमिनिक लॅपियरेने "सिटी ऑफ जॉय" पुस्तकाच्या सुरवातीस लिहीले होते, की "असे नक्की या (कलकत्यातील त्याने पाहीलेल्या दरीद्री जनतेत) काय आहे ज्यांनी ते आनंदी राहू शकतात आणि आम्ही (पाश्चिमात्य) सर्व सुखसोयी पायाशी लोळण घेत असूनही दु:खी असतो?".
माझ्या मते त्या दरीद्री जनतेचे दु:खातील सुख आणि पाश्चिमात्यांचे सुख दुखणे, हे दोन्ही कमी अधिक प्रमाणात अज्ञानातूनच (ignorance) आले आहे. म्हणून वरील लेख हा सेनगुप्तांच्या अहवालातील आणि त्याच्या वापरातील तृटी दाखवण्यासंदर्भात जरी नेमके बोट ठेवत असला तरी त्याच मर्यादेमुळे, त्यातून एका मूळ मुद्याचे उत्तर मिळू शकत नाही, "आपण आनंदी आहोत का?"
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
- Log in or register to post comments
अ
अक्षय पुर्णपात्रे
Sat, 04/10/2010 - 05:27
नवीन
योग्य विश्लेषण.
सेनगुप्ता अहवालाचा उल्लेख डाव्या राजकीय विचारसरणीच्या लोकांनी केला असावा असे वाटते. श्री साने यांनी उजव्या बाजूच्या अशाच विपर्यासाचे उदाहरण दिले असते तर लेख संतुलित झाला असता.
आपटे सरांचे सहकार्य असल्याने लेखातील मुद्दे बिनतोड आहेत.
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 04/10/2010 - 05:13
नवीन
http://www.mimarathi.net/node/1191
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 04/10/2010 - 05:21
नवीन
अगदी पटले.
नजरेतुन सुटले होता हा परिचय. राजीव सान्यांना पाठवत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 04/10/2010 - 05:45
नवीन
निवड्णुकीच्या आधी हे राजकारणी त्यांची संपत्ती जाहीर करतात तेव्हा मला नेहमी हसायला येत...
http://bit.ly/bTolre
हिंदुस्थानात गरीब राह्यच नसेल तर राजकारणात प्रवेश करावा,तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल.... ;)
अवांतर :--- वरती भरपुर आकडेवारी दिसली-वाचली पण अजुन मला मुंबईत मराठी माणुस किती याची आकडेवारी (नवी) काही मिळालेली नाही.
आता काही दिवसांनी १ मे येईल...आपले नेते मंडळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालतील...महाराष्ट्र दिनावर अन् जमल्यास माय मराठी,मराठी माणुस्,मराठी संस्कृती यावर भाषण ठोकतील... शेवटी एकदाचा दिवस संपेल...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 04/10/2010 - 08:28
नवीन
लेखाचा एकूण टोन मात्र आकडेवारीच्या अतिशयोक्तीने गरीबीचे चित्र उगाचच विदारक असल्याचे दिसत आहे असा वाटतो. (उदा: अहो स्फोटात ४० लोक मेले म्हणून उगाच गहजब करीत आहात. केवढी ही अतिशयोक्ती !!! बातमी नीट वाचलीत तर ३९ च मेले आहेत असे दिसेल).
लेखाच्या शेवटी आहे ती गरीबी पुरेशी विदारक आहे असे म्हटल्याने हा टोन पुसला जात नाही.
सेनगुप्तांनी किंवा डाव्यांनी किंवा माध्यमांनी चुकीची आकडेवारी उधृत केली असेल तर नक्की आकडेवारी काय आहे हे दाखवायला हवे होते. (जालावर सेनगुप्ता समितीचा अहवाल मिळाला नाही. साने यांनी तो वाचला असावा. एका साईटवर त्या अहवालाचे पुस्तक रु. ~३५०० ला उपलब्ध दिसले. :( )
उदाहरणार्थ १६ रु सेवनखर्च ३६% च लोकांचा असेल आणि सरासरी अखिल भारतीय* सरासरी सेवनखर्च २५च असेल तर ७७% लोकांचा सेवनखर्च २० रु असूही शकेल.
आज मुंबईसारख्या (जास्त मजुरी मिळणार्या) शहरात प्लंबर/सुतार/रंगारी वगैरे थोड्याशा स्किल्ड कामगारांना सुमारे १५० ते २०० रु दर दिवसाला मिळतात. महिन्यातील २० दिवस काम मिळाले तर त्याची कमाई सरासरी १११ रु दिवसाला होते. ५ माणसांचे कुटुंब धरले तर दरडोई उत्पन्न २५ रु च्या आत आहे. तेव्हा सरासरी देशभरातील ७७ टक्क्याम्चा सर्वाधिक सेवनखर्च २० रु असे म्हतले तरी ते सत्यापासून फार लांब नाही.
*अखिल भारतीय सेवन खर्च श्रीमंतांचा धरून असे लेखात लिहिले आहे. माझ्या मते अहवाल असंघटित क्षेत्रातील कामगारांविषयी आहे. त्यामुळे हा सेवन कर्च श्रीमंतांचा धरून नसून असंघटित कामगारांतील अधिक उत्पन्न मिळवणार्यांचा असू शकेल.
नितिन थत्ते
(शु सुधारक संपादकांना सूचना : माझ्या लेखनात शुद्धलेखनाच्या चुका आढळल्यास ते दुरुस्त केले जावे. माझी हरकत नाही. मात्र ते दुरुस्त केल्या जाऊ नये)
- Log in or register to post comments