Skip to main content

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 21/03/2008 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! काही गिळू पहातो स्मरतो उपास तेव्हा मऊभात पचवणेही विपरीत होत आहे ! उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! मूळ, काटा, बाटा, आणि कविता सुचे यांवरून प्रेरित.

वाचने 6160
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

बाबारे ॐकारा, हात टेकले रे तुझ्यापुढे! खल्लास लिहिलं आहेस! लै भारी है भिडू...! :) काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! या ओळी तर खासच!:) लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) आपला, (बोंबिलप्रेमी) तात्या.

तुम्ही सुद्धा.. विडंबन एकदम झकास.. (प्राण्यांच्या/माश्यांच्या प्रेतातल न कळणारा)केशवसुमार..

>लेका, तू तर शांताबाई, रंगा आणि केश्या, सगळ्यांवरच कडी केली आहेस.. :) १००% सहमत!!

In reply to by सहज

हे चाखता बाकी सगळी भलतीच शिवराक-उपासाची वाटू लागलीत.

एकदम फर्मास विडंबन. (अवांतर - शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच!) चतुरंग

In reply to by चतुरंग

शांताबाईंच्या एका गीताने एकाच दिवसात तीन विडंबनांना जन्म दिला हे अनोखेच! हल्ली मि.पा. वर विडंबनकारांच्या प्रतिभेला बहर आलेला आहे असे दिसते. सर्व विडंबने बहारदार..

सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! जावे त्याच्या वंशा तेव्हा (बांगड्याच्या विरहाचे दु:ख) कळते.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...