भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?
💬 प्रतिसाद
(63)
ब
बेसनलाडू
गुरुवार, 05/20/2010 - 02:26
नवीन
इतरांना प्रश्न करण्याआधी तुम्हांला इतरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, हे नम्र, कळकळीची विनंतीवजा आवाहन.
(आवाहक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
गुरुवार, 05/20/2010 - 05:04
नवीन
हा धागा मी प्रश्नोत्तराचा खेळ खेळण्यासाठी लिहिलेले नसून, मला खाली नमूद केलेल्या गोष्टींवर चर्चा अपेक्षित आहे.
१) आपण सर्व मिळून भारत समृद्ध करण्यासाठी काय करू शकतो (कोणती विश्वासार्ह योजना आहे काय ?)
२) भ्रष्टाचार, जातीयवाद, यांनी पोखरलेल्या भारताला नवीन संजीवनी कशी देऊ शकतो ?
३) आपला इतिहास सांगतो कि आपण आपापसातच बांधून बरंच काही गमावले आहे.
त्यातून शहाणपण घेऊ शकतो का ?
४) आज भारत चारही बाजूनी शत्रूंनी वेढला गेला आहे. त्याला प्रगतीचा , शांततेचा, समाधानाचा मार्ग शोधण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का ?
५) कालचा आपला शत्रू (इंग्रज) हा माहित होता. पण आज आपला खरा शत्रू आपल्यातच आहे. त्याच्यावर कशी मात करता येईल ?
६) जर खरच काही होणार नाही ह्याची खात्री झाली तर आपण सामान्य माणसाला पुढील भविष्यासाठी काय सल्ला देऊ शकतो ?
झाड कितीही प्रिय असले तरी ते जव्हा रानाच्या आगीत सापडते, तेव्हा पक्षी ते झाड (दुखाने का होईने) सोडून जातो.
भारताने प्रगती केली का अधोगती हा ह्या चर्चेचा विषयच नाही.
मला आपण कालपासून आज कुठे आलो आहोत यापेक्षा आज पासून उद्या कुठे जाऊन पोहोचू ह्या चर्चेत जास्त रस आहे.
विषय खरंच खूप गंभीर आहे. कृपया personally घेऊ नये.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 05/20/2010 - 05:10
नवीन
१. जेव्हा तुम्ही चर्चाप्रस्ताव लिहिला तेव्हाचा तुमच्या प्रस्तावाचा मसुदा
२. प्रस्तावावर आलेल्या प्रतिसादांमधील मुद्द्यांचा प्रतिवाद करतानाचे तुमचे प्रतिसाद आणि
३. तुमच्या वरील प्रतिसादातील सर्व प्रश्न
यांचा एकत्रित विचार करता तुम्ही ही चर्चा तुमच्या सोयीने वहावत नेत आहात/भरकटवत आहात, असे खेदाने म्हणावेसे वाटते. तुम्हांला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याजवळ नसल्यास तसे मान्य करा. ज्या मुद्द्यांच्या संदर्भात ते प्रश्न विचारले गेले आहेत, तो एकेक मुद्दा मुद्देसूदपणे हातावेगळा केल्याखेरीज तुमच्या इतर प्रश्नांकडे ढुंकूनही बघायची गरज नाही. तुमचा चर्चा भरकटवायचा खोडसाळपणा असाच चालू राहिला, तर दुर्दैवाने यापुढे तुमच्या मताला काडीचीही किंमत उरायची नाही.
(सावध)बेसनलाडू
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
गुरुवार, 05/20/2010 - 05:35
नवीन
चर्चा तुमच्या सोयीने वहावत नेत आहात/भरकटवत आहात, असे खेदाने म्हणावेसे वाटते
तुम्हाला भारत हे कुठे वाहत/भरकटत चालला आहे त्या बद्दला खेद दिसत नाही आणि माझ्या चर्चे बद्दला खेद दिसतो आहे हे ऐकून मला खरच वाईट वाटले.
माझ्याकडे हजारो प्रश्नांची उत्तरे नाही म्हणून तर हा धागा मी चर्चे साठी ठेवला.
चर्चाप्रस्ताव, मुद्द्यांचा प्रतिवाद हे सगळे एकदम as per process नेण्यासाठी हे काय इथे साहित्य संमेलन भरले आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे ?
अहो मी काय म्हणतोय आणि तुमचा काय चाल्लय
माझे मुद्दे खोडून काढण्यापेक्षा एकतरी प्रश्नांबाबत काहीतरी समाधान सुचवा.
आणि मी खोडसाळ पण करतो आहे हा साक्षात्कार कुठून झाला बुवा तुम्हाला का कि फक्त तुम्ही म्हणता ते खरे
बाकी इतरांना काय वाटते ते त्यांनी बोलू देखील नये कि काय ?
(मला आता इथे सकाळ सकाळी नळावर चाललेली बायकांची भांडणे वाटू लागली आहेत हि)
कृपया तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.
हा माझा आपणास असलेला शेवटचा प्रतिसाद आहे.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
गुरुवार, 05/20/2010 - 05:42
नवीन
कृपया तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.
हेच खरे तर मी तुम्हाला सांगणार होतो. तेव्हा - तुम्हाला काही खरच positive सुचत असेल तर बोला अन्यथा गप्प राहा.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 05/20/2010 - 06:26
नवीन
बेसनलाडूशी सहमत...
जिथे उत्तरे मिळाली आहेत तिथे दुर्लक्ष करायचे आणि नुसते इथून तिथे चर्चा हलवत रहायची..
जरी साहित्यसंमेलन नसले तरी चर्चा सुसंबद्ध रितीने झाली नाहि तर होतो तो गोंधळ काहि निष्कर्ष निघणारी चर्चा नव्हे.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
- Log in or register to post comments
ब
बाळकराम
गुरुवार, 05/20/2010 - 22:02
नवीन
श्री. मनोज साहेब,
काही लोकं इतकी निराश का आहेत अस म्हटलं त्याचा मतितार्थ एवढाच की तुम्ही सगळे प्रश्न जमेस धरून सुद्धा त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. (मी भारतात राहत नाही हा निष्कर्ष मात्र बरोबर आहे- पण माझ्या आयुष्यतील २८ वर्षे मी भारतातच काढली आहेत त्यामुळे भारतातील प्रश्नांची मला जाण नसावी हा कयास मात्र चुकीचा आहे.) ह्या लेखाला बालिश म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे नक्षलवादासारख्या ज्वलंत प्रश्नाचे जे सुलभीकरण तुम्ही करु पाहात आहात त्यासंदर्भाने आहे. प्रश्न कुठल्या देशात नाहीत- इस्रायल सारखा देश गेले कित्येक वर्षे अरबांशी लढतो आहे- त्यात कोण चूक/बरोबर हा प्रश्न नाही- पण त्याला संपवण्यची कसम खालेल्ल्या श्रीमंत अरबांना इस्रायलला संपवणे अजूनही शक्य झालेले नाही. महाबलाढ्य अमेरिकेविरुद्ध कयुबाची गोष्टही अशीच. त्यामुळे भारतासारख्या बलवान- लष्करी व आर्थिक दोन्ही द्रुष्टीनेही- देशाला संपवणे एवढे सोपे नाही हे भारताच्या शत्रूंनासुद्धा ठाऊक आहे. ( म्हणूनतर दहशतवाद्याच्या साहाय्य ते घेताहेत)
भारत मागील १८०० वर्षे श्रीमंत देश होता ते काही उगीच नाही आणि उद्या महासत्ता होइल ते ही आपोआप नाही. (http://www.time.com/time/specials/2007/article/0,28804,1649060_1649046_1649026,00.html)
प्रश्न गंभीर आहे हे तर खरेच, पण तो तुम्ही समजता त्यापेक्षाही गंभीर आहे आहे आणि त्यासाठी सनसनाटी व उथळ विचार न करता मूलगामी उपाययोजना करण्याची गरज आहे.
आतापुरते एवढेच.
बाळकराम
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Tue, 05/18/2010 - 22:59
नवीन
भारताची लोकशाही किती दिवस तग धरू शकेल ?
जर हा प्रकल्प यशस्वी ठरला तर हा प्रश्न निकालात निघु शकेल....
कारण ज्या व्यक्तीवर ह्या प्रकल्पाचा कार्यभार आहे ती व्यक्ती विश्वासार्ह आहे असे माझे आणि कित्येकांचे मत आहे...
----------------------------------------------------------------------
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

- Log in or register to post comments
Y
yogeshwar patil
Wed, 05/19/2010 - 13:45
नवीन
लै दिवस तग धरेल!
लोक तशीच तेथील प्रशासन व्यवस्था. प्रजा तथा राजा. यात नविन असे काही नसुन तुमचा आक्रोश कळत आहे. मुळात याने बिना टिकट फिरायला नको होते आणि त्याने असा विश्वास घात करायला नको होता. या सर्व गोष्टी बाजुच्या पर्यन्त असतात तो पर्यन्त आपण त्याला सुचवतो. अवेळी असाच प्रंसग आपल्यावर आल्याने आपण सर्व नियम धाब्यावर बसवुन गंगा स्नान केल्या सारखे करतो.
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 05/20/2010 - 07:55
नवीन
सा~या समस्यांचे मुळ वाढति लोकसंख्या आहे..१२५ कोटी झालो तरी वाढतच आहे...एक मुल जन्माला येणे म्हणजे एका मतात वाढ असे गणीत आहे राजकारण्यांचे....त्यात घुसखोरी...
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 05/20/2010 - 08:05
नवीन
१) आपण सर्व मिळून भारत समृद्ध करण्यासाठी काय करू शकतो (कोणती विश्वासार्ह योजना आहे काय ?)......... :)) .......वा दादा जय हो...ज्यांनी करायाला हवे ते लुट करतात..तुमचे सारे विचारवंत ,पत्र्कार .अन विरोधी पक्ष त्यांना सामील....अन आमचे दर डोई उत्पन्न २० रुपये..रहायाला घर नाहि...खायला अन्न नाहि....हाताला काम नाहि...अंगावर वस्त्र नाहि....सारी सत्ता तुमच्या कडे...जमीनी तुमच्या..संपत्ति तुमची..अन आम्हि काय करणार??? अडचण आली कि जनता काहि करत नाहि म्हणुन बोंब्लायचे..अन तुम्हि लुटमार करायची कायदेशीर व सनद्शिर मार्गाने..तुमची लोकशाहि तुम्हालाच मुबारक...
- Log in or register to post comments
म
मराठे
गुरुवार, 05/20/2010 - 18:36
नवीन
प्रगती वा अधोगतीचा विचार आपल्याला तीन दृष्टीकोनांतून करावा लागेल
१. आर्थिक
२. सामाजिक आणि
३. सांस्क्रुतिक
..
मला ह्यापैकि कुठलाच दृष्टीकोन नसल्याने इथेच थांबतो! ;-)
- Log in or register to post comments
ज
ज्ञानेश...
Fri, 05/21/2010 - 14:32
नवीन
हे मराठे 'त्या' मराठेचे कोणी नातलग तर नव्हेत? (पक्षी: ध्यान??)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2