कलकात्याजवळ माओवाद्यांनी ट्रेन उडवली
💬 प्रतिसाद
(12)
स
सोम्यागोम्या
Fri, 05/28/2010 - 19:11
नवीन
याला जबाबदार कोण- केंद्र सरकार/माओ वादी/माओवादाला कारणीभूत लोक?
हे कधी थांबणार?- दंतेवाडात मोठा हल्ला होवूनही सरकार ने काय केले हे ठोसपणे जनतेला सांगितले नाही. त्यांची एकंदरित शक्ती किती, म्हणणे काय आहे, काय कारवाई केली जात आहे, कितपत यश आलं या गोष्टींवर प्रकाश का टाकला जात नाही?
कोणतेही केंद्र सरकार असते तर असेच झाले असते का? मोदींसारखे नेते केंद्रात सत्तेवर असते तर त्यांनी सुद्धा असेच धोरण स्वीकारले असते का?
(भाजप पक्षाचा इथे संबंध नसून निर्णय क्षमतेसाठी मोदींचे उदाहरण दिले आहे.)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
Fri, 05/28/2010 - 19:13
नवीन
अविकसित भागात हे माओवादी फोफावले आहेत...त्यांना चीनचे सहकार्य असणारच (अंदाज ) ...केंद्र सरकारने अविकसित भागांकडे लक्ष पुरवल्यास कदाचित काही फरक पडू शकेल...पण आता परिस्थिती फारच चिघळली आहे असे वाटते...राजकारणी आणि नोकरशहा यांना स्वतःच्या तुंबड्या भरण्यापासून वेळ नसल्याने मोठे शहरं सोडले तर प्रगती कुठे आहे? फक्त आय टी technology म्हणजेच प्रगती का?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
- Log in or register to post comments
आ
आवशीचो घोव्
Fri, 05/28/2010 - 19:49
नवीन
ब्रिगेडीयर महाजनांचे शब्द खरे होत आहेत
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 05/28/2010 - 19:38
नवीन
सरकार सध्या जनगणना करण्यात व्यस्त आहे असे दिसते,जितके लोक मरतील तितकीच संख्या कमी भरेल !!!
मदनबाण.....
Jealousy is nothing more than a fear of abandonment.
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
Fri, 05/28/2010 - 20:30
नवीन
.........असे काही झाले की, नित्याची सवय असल्याप्रमाने माननीय पंतप्रधान यांची "आम्ही नक्षलींची पाळेमुळे खणून काढू..." छापाची प्रेस नोट तयार असते आणि मग ती "मृतांच्या निकटच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांची पंतप्रधान निधीतून मदत..." ही घोषणा.... पुढे भले मोठे शून्य ! "रूट लेव्हल" ला जाऊन नक्षलींशी बोलणी करूनच त्यांच्यातील हा असंतोष संपविणे ही काळाची गरज आहे. ..... पोलिस घ्या, मिलिटरी घ्या..... या चळवळीचा गेल्या ५० वर्षात जर बिमोड होत नसेल तर येथून पुढील ५० वर्षात तो होईल असे मानने ही केवळ आत्मवंचना ठरेल.... मग दिल्लीत कोणत्याही पक्षाचे सरकार येवो.....दर पाच वर्षानी येत राहील, अन् इकडे दंतेवाडा, ज्ञानेश्वरी पध्दतीने निष्पाप मरत राहतील आणि वरीलप्रमाणे नक्राश्रू ढाळण्याचे दोन मिनिटाचे नाटक झाले की, पंतप्रधान आणि गृह खाते आपापल्या ए.सी. चेम्बर्समध्ये बसून सोनियाच्या तब्येतीची चिंता वाहत राहतील.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणांनो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Fri, 05/28/2010 - 21:12
नवीन
अरे आर्मी बोलवुन उडवुन टाका ना!!
प्रभाकरन कसा गेला तसाच ना...........पण मला त्यामागे 'त्या' powerful व्यक्तीचा सुड काढण्याच्या उद्देशाने हात असल्याचा संशय आहे................कारण तेव्हा प्रभाकरन तेवढा active नव्हता.............
आजुन काय पाहायच आहे ह्या सरकारला????? मला तर त्या सर्व नातेवाईकांचा राग येतो जे गप्प बसतात घरचा कोणी अशा हल्ल्यात मेला तरी............
अरे फुलनदेवीचा आदर्श ठेवा ना............आ* ब** एक केली ना त्या एकटीने सर्वांची!!!! मग तुम्ही सर्व मिळुन का नाही करु शकत??
आणि जे ह्या लेखाला seriously घेत नाहीत त्यांनी स्वःताला ठेवा त्या कुटुंबियांच्या जागी मग समजेल...........
बोरीवलीमधे जेव्हा bomb blast झाला तेव्हा मी सुद्धा होतो first class मधे पण मी उतरुन १५-२० min.s झाले नी मी पेपर हातात घेतला पेन त्यावर टेकवणार तोच धडाsssssssssssssssssssssssम..........वर्गातले सर्व हादरले...........supervisor म्हणाली(हसुन) "bomb,bomb काय !! आवाज मत करो....शादी होगा"
नंतर जेव्हा तिला बाहेर बोलवुन सत्य सांगतल तेव्हा ती आम्हाला खर सांगताना पण ती घाबरली होती........घरी आलो(अंदाजे ५ तासानंतर ज्याला train ने १५ min.s लागतात) तेव्हा घरी रडारड.........अर्थात कोण सर्वात जास्त रडत होत ते सांगण्याची गरज नाही......................तेव्हापासुन मला असल्या घटनांचे एका कुटुंबावर काय परीणाम होउ शकतात ते कळल.
(हो मी संध्याकाळे exam देत होतो,कॉलेजवरुन आल्यावर)
*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!
- Log in or register to post comments
ए
एक
Fri, 05/28/2010 - 22:50
नवीन
पुढे? कमीच गेले त्या मानाने या वेळी. आमच्या सारख्या भारतीयांना वारंवार
मारून या दहशतवाद्यांना कंटाळा कसा येत नाही.
अहो हे नेहमीचच आहे.
याच धाग्यावर...
१. आता काही जणं त्वेषाने अॅक्शन घेण्याची भाषा करतील.. (वर काही जणांनी केलीच आहे)
२. काही जण माओवाद्याम्ची बाजू मांडतील आणि इशान्येकडे होणार्या दुर्लक्षावर लिहि-लिही लिहितील.
३. गांधीवादाने प्रश्न सोडवण्याचे उपाय सांगतिल आणि त्याच्या वरून खडाजंगी होईल.
४. काही जण माझ्यावर सगळा राग काढतील.
हे सगळं लिहून झाल्यावर ऑफिस मधे असतील तर मिटींगला, लंच ला जातील किंवा घरी असतील तर झोपायला जातील. पुढे कृती शून्य! मी पण अमेरिकेत ए सी रूम मधे बसूनच हे लिहितो आहे आणि झाल्यावर लंच ला पळणार आहे कारण कॅफे बंद होतो आज लवकर.
ज्यांनी क्रुती करणं अपेक्षित आहे ते करत नाही आहेत. ज्यांना करायची ईचछा आहे त्यांना मार्ग माहित नाही.
अश्या घटना आता रोजच्याच झाल्या आहेत आणि त्या नंतर येणारे धागे पण रोजचेच झाले आहेत. काय उपयोग या धाग्यांचा, उगाच आमच्या निष्क्रियतेची आणि षंढपणाची आठवण करून देतात आणि चिडचिड वाढवतात.
आज ते मेले, सुटले. उद्या आपण असेच कुठेतरी बॉम्बस्फोटात मरू.
चला. जेवायला जातो.
-एक
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Sat, 05/29/2010 - 08:48
नवीन
ते कारायची गरज आहे................पण.......
अस कस बोलता येईल पुढे क्रुती झाल्या ना........झोपेत घोरणे..जेउन ढेकर देण...............
आता जरा अकलीच बोलतो..........आपण हे असच बोलत राहायच का??आपल्या अंगाशी आल्यावर आपण क्रुती करुया ह्या विचारात राहील्यानेच परीस्थीती हाताबाहेर गेलेय...........
तस तुमच म्हणन पटल...............खटकत असल तरी खरच आहे
no comments वाला
*************************************************
एखाद्या व्यक्तीशी जवळीक झाल्यानंतर ती दुर गेल्यावर दुखी होण्यापेक्षा एकटे राहणे,कोणाशी न बोललेले बरे हे तु मला शिकवलस!!!
- Log in or register to post comments
प
पाषाणभेद
Sat, 05/29/2010 - 09:19
नवीन
वरील सर्व प्रतिक्रियांत सर्व काही आले. त्यामूळे मी पुन्हा लिहीत नाही. पण चाललेय ते शेपूट घालू आहे हे नक्की.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
- Log in or register to post comments
उ
उमराणी सरकार
Sat, 05/29/2010 - 09:28
नवीन
नाट्याचा पूनःप्रयोग -
चिदू राजिनामा देणार आणि सरदार फेटाळणार.
उमराणी सरकार
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 05/29/2010 - 09:58
नवीन
भांडवल शाहि जेंव्हा चरम सीमेवर पोहोचते तेंव्हा कम्युनिझम पुन्हा जन्म घेतो..मुंबईला जमीन लिलाव पध्दतिने विकत घेतली..भाव रु.४०५००=०० प्रति चौरस फुट...एकिकडे संपत्तिचा पुर दुसरीकडे ८०% लोकांचे उत्पन्न रु २०/- प्रतिदिन...
- Log in or register to post comments
M
Manoj Katwe
Sat, 05/29/2010 - 14:10
नवीन
http://www.esakal.com/esakal/20100529/4880665926328501635.htm
हे वाचा आणि निश्चिंत राहा.
अमेरिका बाहेरची आणि आतली कीड, दोन्ही साफ करण्यास समर्थ आहे.
मला वाटते कि भारत देश हा अमेरिकेच्या ताब्यात दिला पाहिजे.
ह्या असल्या प्रकरणावर फक्त अमेरिकाच तोडगा काढू शकते.
बाकी भारतीय राजकारण्याच्या **त हा दम नाही.
- Log in or register to post comments