असल्या जीवघेण्या अनुभवातून सातत्यानं जात तुम्ही लोक वर्षानुवर्षे कामं करत राहता ह्याचंसुद्धा आता आश्चर्य वाटेनासं झालंय! तुमच्या कामाला आमचा सलाम.
कधीतरी प्रकल्पाला भेट द्यायची मनोमन इच्छा आहे. कधी योग येईल हे माहीत नाही. तोवर तुम्ही लिहिलेल्या अनुभवातून तिथे मनाने जात राहू! असेच अस्सल अनुभव अजून लिहा.
चतुरंग
अनिकेतजी,
काय बोलणार, लेख वाचताना कितीवेळा अंगावर सर्र्कन् काटा आला हे सांगताच येत नाही.
आमची इवलीइवलीशी आयुष्य आठवली म्हणजे असलं आभाळभर आयुष्य जगणार्यांचे अनुभव आश्वासकही ठरतात, मार्गदर्शकही..
लेख वाचल्यानंतर खुप वेळ आमच्या आयुष्याची वैय्यर्थताच उफाळुन येत होती वारंवार..
तुमच्या आयुष्याचा एकतरी प्रकाशकण आमचे अंधाराचे दरवाजे ओलांडुन आमच्या कोत्या जगण्यात झिरपू दे हीच प्रार्थना..
शाळेत असताना (ईयत्ता ८-९) आनंदवनाला भेट देण्याचा योग आला होता. तिथे २ दिवस राहीलो होतो. श्रमदान केल होतं. तो शांत परिसर आणि तिथेल ते प्रसन्न वातावरण..... काही गोष्टी अश्या विस्मरणात गेलेल्या असतात तुमच्या या लेखा मुळे रे सार सार आठवल. :)
धन्यवाद.
दुर्गम भागातील, कठीण अशा कामात होणारे कष्ट काय असू शकतात याची ही एक झलक आहे!
अनिकेत, मला यापलीकडचे अनुभवही वाचायचे आहेत. प्रामुख्याने सामाजिक देवाणघेवाण, त्यात येणारा संघर्ष, त्यावर मात करताना योजावे लागलेले उपाय, त्यासाठी द्यावे लागणारी किंमत वगैरे. ते कळणं अशासाठी गरजेचं आहे की, अशा कामांचं खरं मूल्य ती किंमत कळल्यानंतरच आमच्यासारख्यांना कळू शकेल.
बापरे!
तुमचे रोजचे आयुष्य असेच खडतर असते का?
मागल्या वर्षी प्रकाशवाटा वाचले आणि सुन्न झाले होते.
तिकडे पाऊस जर असा प्रचंड प्रमाणात होत असेल तर चांगल्या प्रतीचे पूल बनवूनही टिकतील का?
आमटे कुटुंबातील समाजकार्यातील तिसर्या पीढीचा अनुभव वाचायला आवडला. आणखी येऊ दे.
२५ वर्षांपूर्वी मोठा पाऊस झाला, की वरोड्यातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते १०-१५ किमींवर दुथड्या भरलेल्या नाल्यांमुळे बंद असायचे.
दुर्गम भागांत अद्यापही तशीच परिस्थिती असावी.
अनिकेतराव.......वाढदिवसाच्या शुभेच्छा( उशिराने का होईना....तुम्ही साजरा करत नसले तरीही).
मला आनंदवन, सोमनाथ्,नागपल्ली आणी हेमलकसा येथे भेट देण्याची खुप ईच्छा आहे. तिथे बरीच शिबिरे भरतात.त्याची माहीती मिळाली तर बरे होईल.शिबीरच पाहीजे असेही काही नाही. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती.
आणखीही मिपाकारांना याचा उपयोग होईल अशी आशा आहे.
जीवघेणा प्रसंग खराच.
आताच हा लेख वाचण्यापूर्वी मटातील कुमार कदमांचा कोकणातील घाटरस्त्यावरील लेख वाचत होतो. पावसाळ्यात नेहेमीच धोकादायक ठरणार्या ठिकाणी काही कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही? त्या त्या ठिकाण॑चे लोकप्र॑तिनिधी आवाज का उठवत नाहीत?
रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे... याबद्दल काय बोलणार
एकुणच तुमचे तिथे रोजचे य्रेणारे अनुभव सुद्धा वाचण्यास उत्सुक आहोत... वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती.
हेमलकसाला जायची ईच्छा प्रकाशवाटा वाचल्यापासुन मनात आहेच.
चि. अनिकेत,
वेळात वेळ काढून एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल.
आमटे कुटुंबियांचे खरोखर कौतुक वाटते. बाबा आमाट्यांनी घेतलेला वसा आज तिसर्या पिढीतही मोडला गेलेला नाही हे विशेषच. लिखाण तर उत्तम जमलेच आहे. पण त्याहुनही तुमच्या कार्याचे खुप कौतुक करावेसे वाटते.
श्री अनिकेत,
हा अनुभव अफाट आहे.
खूप ओघवतं लिहिलंय.
रोजच्या आयुष्यासाठी तुमचे झगडणे आणि तरीही कार्य कारत राहणे..... तुम्हा सर्वांना मनापासून सलाम.
वेळात वेळ कढुन लिहीत रहा ही विनंती.
तुमचा लेख पाहून खूप आनंद झाला.
बाबा आमटेंनी सुरु केलेल्या समाजकार्याचा वसा त्यांची तिसरी पिढीही तितक्याच ताकदीने वाहतेय हे वाचुन आनंदही झाला आणि अभिमानही वाटला.. बाबांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर
"श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..
दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..."
अभिनंदन आणि सलाम..!!
श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..
दु:ख उधळण्यास आता, आसवांना वेळ नाही..."
मी स्वतः ही कविता मुक्तांगणात डॉ. रूपा कुलकर्णींच्या आवाजात ऐकलेली आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद !
("उधळण्यास" नाही, "उधळायास".)
छान अनिकेतराव!! तुमचा हा अनुभव अर्थातच खुप रोमांचकारी आहे. अश्या प्रकारचे अनुभव येउन सुद्धा तुम्ही किंवा तुमच्या सोबतचे कार्यकर्ते आपल कार्य सतत चालूच ठेवतात हे मनाला जास्त भिडतं. तुमच्या आणि इतर कार्यकर्त्यांमुळे समाजकार्य हा शब्द अजूनही थोडं फार महत्त्व आणि सन्मान ठेउन आहे नाही तर या शब्दाला अपमानीत करून त्याचं अस्तित्व संपवण्याचं कार्य करण्यात तथाकथित लोकप्रतिनीधींनी काही कसुर ठेवला नाही.
तुम्हाला मिपावर बघून आनंद झाला. आतापर्यंत आमटे परिवारानी केलेल्या आणि करत असलेल्या कार्याची माहिती इतरांच्या लिखाणातूनच(प्रत्यक्ष ते कार्य करत नसलेल्या) व्हायची. आता ती माहिती प्रत्यक्ष हे कार्य करत असलेल्या आणि विशेष म्हणजे त्याच परिवारातील सदस्याच्या लिखाणातून मिळतेय ही एक पर्वणीच आहे :)
इतर मिपाकरांप्रमाणेच माझी सुद्धा विनंती आहे की, तुम्ही मिपावर लिखाण चालूच ठेवा आणि लोकबिरादरी या प्रकल्पाशी संबंधीत तसेच इतर कार्यांची, तुमच्या इतरही अनुभवांची माहिती देत रहा.
श्री.अनिकेत....
लाज वाटते स्वतःची खरोखरी, ज्यावेळी असे अस्सल अनुभवाचे लिखाण समोर आल्यानंतर. आणखीन अशासाठी की, भाजीत थोडेसे मीठ कमी पडले म्हणून मेसवाल्याच्या नावाने ठणाणा करण्याचे दिवस आठवतात, अन् इथे तुम्ही (आणि त्या ड्रायव्हरदादालाही सलाम, जरूर कळवा आमचा रामराम!) जवळपास मृत्युच्या खेळात ४८ तास अडकून पडलात, तरीही ना निसर्गाबद्दल तक्रार, ना नशीबाबद्दल ! व्वा. विशेषतः जुरूला आणि त्याच्या घरातील लोकांना तुम्ही (तिथे दोन घास खावून) जो अवर्णनीय आनंद दिला त्यापुढे तुम्हाला झालेल्या त्रासाची पत्रास वाटली नसेल.
श्री.विकास आमटे यांचे एक मित्र जळगांवचे श्री.जयंत पाटील (जे काही वर्षे हेमलकसा येथे बाबांच्यासमवेत कार्यरत होते ~ चित्रकारही आहेत) हे कोल्हापुरला कधी आमच्याकडे आले की येथील मित्रपरिवारात "आनंदवन, हेमलकसा" हे विषय प्रकर्षाने असतातच, त्यामुळे तेथील कार्याचा, वातावरणाचे उल्लेख त्यांच्याकडून ऐकणे फार उत्साहवर्धक वाटते. त्यांना थोड्याशा दृष्टीदोषामुळे संगणकावरील मजकूर वाचता येत नाही. पण पुढील खेपेस ते इकडे आले की, मी जरूर तुमचा हा लेख त्यांच्याशी चर्चेसाठी घेईन.
या मंचावर आपले स्वागत आणि खूप आवडेल आपले लिखाण इथे सर्वांना !
"एक जिवंत अनुभव लिहिल्याबद्दल धन्यवाद. तुमचे अनुभव जरुर लिहित जा, त्यातूनच अनेकांना तुमच्यासारखे काम करण्याची प्रेरणा मिळेल."
+१ असेच म्हणतो.
७ / ८ वर्षांपुर्वी आलो होतो.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत मित्रमंडळींबरोबर पुन्हा येणार आहोत.
भेटु.
हे वाचायचं राहुन गेलं होतं. खरचं शब्दच नाहीत काय काय अडचणीतुन तुम्ही लोक जात आहात, आणि तरीही हे कार्य वर्षानुवर्षे चालु आहे. तुमच्या सवडीतुन अजुन अनुभव लिहावेत, यातुनच खरोखर आमच्यासारख्या सामान्यांना प्रेरणा मिळेल. सलाम आहे तुम्हाला, आमटे परिवाराला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना!
अर्धवट: तुमचीही आभारी आहे, या लेखाचा दुवा दुस-या लेखात दिल्यामुळे या लेखाबद्दल कळले.
तुम्ही अक्षरशः बाबांच्या "श्रुंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई..दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही..."
या शब्दामध्ये जगता आहात. अडचणींवर मात करून समाजासाठी विधायक कार्य करण्याचं व्रत बाबांच्या तिसऱ्या पिढीनंही अखंडितपणे जपलं आहे याचं नवल वाटत नाही कारण समाजकारणाचे बाळकडू आपणास आपल्या कुटुंबातूनच मिळाले आहे. तुमचे आणखीही अनुभव मीपावर वाचायचे आहेत. मला आपल्या पकल्पांना भेट देण्याची खुप ईच्छा आहे. कधी येता येईल त्याबद्दल काही मार्गदर्शन करावे ही विनंती.
येथे कर माझे जुळती !!!
अनिकेत साहेब, केवळ तुमच्यासारख्या "खर्या" समाजसेवकांमुळे माणूसकीवरचा आणि भारताच्या भविष्याबद्दलचा आशावाद कायम आहे !
@ आनन्दिता : धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !
येथे कर माझे जुळती !!!अनिकेत साहेब, केवळ तुमच्यासारख्या "खर्या" समाजसेवकांमुळे माणूसकीवरचा आणि भारताच्या भविष्याबद्दलचा आशावाद कायम आहे ! @ आनन्दिता : धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद !