Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाकिस्तानात आलेला पुर व त्याला मदत करायची झालेली भारताला घाई

र
रणजित चितळे
Mon, 08/30/2010 - 08:29
🗣 19 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3932 वाचन

💬 प्रतिसाद (19)
क
क्लिंटन Mon, 08/30/2010 - 09:37 नवीन
अगदी असेच. त्या हलकटांना अजिबात मदत करायला नको होती.तिथल्या सामान्य जनतेला पुराचा त्रास सहन करावा लागत आहे आणि तिथले सगळे सामान्य लोक दहशतवादाला समर्थन देत नाहीत असे अनेक लोक म्हणतील. पण आपण अशा सामान्य लोकांपर्यंत पाकिस्तान सरकारला डावलून पोहोचू शकत नाही.त्यामुळे अशा निरपराध सामान्य लोकांचे काहीही झाले तरी त्याविषयी आपण काहीही करू शकत नाही. दुसरे म्हणजे २००५ मध्ये पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भूकंप होऊन हजारो लोक ठार झाले.त्यावेळी भारताने पाकिस्तानला मदत केली होती.पण त्यानंतरच २० दिवसात काय झाले? दिल्लीत ऐन दिवाळीच्या दिवशी बॉम्बस्फोट. त्यानंतर ७/११, २६/११ हे मोठे हल्ले झालेच.अशा सापांना कितीही मदत करा ते डंख करायचे थांबत नाहीत.आणि यावेळी तर त्यांना आपल्याकडून मदत घ्यायची नव्हती तरी आपणच घ्या घ्या करत मागे लागलो होतो.काय गरज होती असे करायची काय माहित.खरे म्हणजे त्यांनी मदतीची विनंती केली असती तर आपण मदत करायचा विचार करायला हवा होता.इथे उलटाच प्रकार चालू होता. क्लिंटन
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 08/30/2010 - 09:41 नवीन
सापाला दुध पाजल्याने तो गरळ ओकायचे थांबवत नाही.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Mon, 08/30/2010 - 09:42 नवीन
कृपया सापांची बदनामी करू नये. साप मुळीच दूध पीत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
वेताळ Mon, 08/30/2010 - 09:42 नवीन
मी भिकार्‍या मदत केल्यानंतर तो त्या पैश्याचे काय करतो हे बघत बसत नाही.
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Mon, 08/30/2010 - 10:07 नवीन
तो भिकारी जर मदत घेत नसेल तर... इथे प्रश्न हाच आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ऋ
ऋषिकेश Mon, 08/30/2010 - 10:12 नवीन
मानवीय दृष्टीकोनातून भारताने ही मदत देऊ केली ते बरेच झाले. आता घेणार्‍याला मदतही घेता येत नाही हे त्याचे दुर्दैव!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 08/30/2010 - 10:26 नवीन
मिपादस्य श्री. कुंदन ह्यांचे ह्या विषयावरील मत वाचण्यास उत्सुक आहे. हॅ हॅ हॅ...
  • Log in or register to post comments
क
कुंदन Mon, 08/30/2010 - 12:36 नवीन
पाकसारख्या हरामखोर देशाला अजिबात मदत करायला नको होती. च्यायला , इथे लोक कष्ट करुन - घाम गाळुन कर भरतात आणि आपले नाकर्ते सरकार हा कररुपी पैसा पाकला देत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
त
तिमा Mon, 08/30/2010 - 11:39 नवीन
देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घ्यावे वा न घ्यावे देणार्‍याने एक दिवस घेणार्‍याचे राज्यच घ्यावे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 08/30/2010 - 12:39 नवीन
मदत केली. योग्य निर्णय.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Mon, 08/30/2010 - 12:50 नवीन
आज वृत्तपत्रात अजुन वेगळीच बातमी वाचली आता पाकिस्तान म्हणे मदत घ्यायला तयार आहे. पण मदत भारताने स्वतः न देता युनो च्या माध्यमातुन द्यावी म्हणे. केवढा हा माज. च्यायला एकतर खायला पैसा नाही तुमच्याकडे आम्ही भीक देत आहोत तर माज करताहेत साले. ते वाचुन असे वाटले की जणु पैसे देण्यासाठी भारत लाचार झाला आहे. पाकड्यांना गरजच नाही जणु. आपण पैसे देताना पण लाचार होणार आणि ते भीक घेताना पण माज करणार. कोणी सांगितला आहे हे उरफाटा कारभार? आपण देउ केले त्यांनी माज केला आत गप बसावे ना आपण. अशी मारुन घेण्यात कसली आले आहे डिप्लोमसी? पाकडे राजकारणी आपल्या गाढवांना आंतरराष्ट्रीय राजकारणात भारी पडत आहेत हेच खरे.
  • Log in or register to post comments
च
चिंतातुर जंतू Mon, 08/30/2010 - 12:51 नवीन
२००४ च्या सुनामीप्रसंगी भारताने श्रीलंकेला देऊ केलेली मदत: २०० मिलिअन डॉलर्स. संयुक्त राष्ट्रांच्या आवाहनानुसार पाकिस्तानला आता एकूण मदतीची गरज आहे: ४५९ मिलिअन डॉलर्स. भारताने मदत देऊ केलेली आहे: ५ मिलिअन डॉलर्स. थोडक्यात, किरकोळ मदत देऊ करून (म्ह्णजे जवळजवळ फुकटातच) भारताने इतर देशांसमोर पाकिस्तानचा खरा चेहेरा उघड केलेला आहे. राजनैतिक पातळीवर याला भारताची चलाखीची खेळी मानता येईल. (आकड्यांचा संदर्भ इथून घेतलेला आहे).
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/30/2010 - 12:56 नवीन
सहमत. मी इथेच एका वेगळ्या धाग्यात लिहिले होते की ही मदत सर्व दृष्टीने फुटकळ असून चर्चा करण्याच्या विषय नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
क
क्लिंटन Mon, 08/30/2010 - 13:58 नवीन
अहो पाकिस्तानचा असा ’खरा चेहरा’ भारताने आजपर्यंत कमी वेळा उघड केला आहे का?कारगीलच्या वेळी तेच. नवाझ शरीफ तेव्हा रातोरात खऱ्या बिल क्लिंटन यांची भेट घ्यायला वॉशिंग्टनला पळाले होते. सौरभ कालिया आणि इतर ५ सैनिकांना संभाजीराजांप्रमाणे अमानुषपणे हालहाल करून मारले तेव्हा आपण प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क समितीपुढे नेऊ अशी डरकाळी फोडून झाली. त्याचे पुढे काय झाले?आज म्हणे सरकार सौरभ कालियाच्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रांना साधी पोच द्यायचे सौजन्य दाखवत नाही असे वाचले आहे. २००४ मध्ये सरकार बदलूनही त्यात काही फरक नाही. संसद हल्ला झाल्यावर काय आपण ’खरा चेहरा’ कमी उघडा पाडला होता का? पण दोन-तीन महिन्यांतच सुषमा स्वराजांना सार्क देशांच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या बैठकीसाठी इस्लामाबादलाही आपण पाठवले. पुढे मे २००२ मध्ये वाजपेयींनी कुपवाराला जाऊन "मेरा यहा आना आपनेआप मे एक प्रतिक है. इसे दुनियावाले समझे ना समझे हमारा पडौसी समझे ना समझे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" अशी डरकाळी फोडली.सध्याच्या परिस्थितीत काय आणि २००२ च्या परिस्थितीत काय पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असताना पाकिस्तानशी युध्द करू नये असेच मला वाटते. पण नुसत्या डरकाळ्या फोडून काहीही न करता आपले जगापुढे झालेच तर हसे होते ही गोष्ट मात्र पक्की. बास झाला आता खरा चेहरा उघडा पाडायचा उद्योग.आज जगाला भारताची गरज आहे आणि त्यामानाने पाकिस्तानची गरज तितक्या प्रमाणावर नाही.याचा आपण पुरेपूर फायदा कधी घेणार?एकीकडे पाकिस्तानविरूध्द डरकाळ्या फोडायच्या पण दुसरीकडे मधूनमधून वाटाघाटींचे पिलू सोडून द्यायचे, संसदभवनाइतक्या महाभयंकर हल्ल्यातील सूत्रधाराला बिर्याणी भरवत राहायचे, अनेक दहशतवादी हल्यांमधील एकाही हरामखोराला आपण कधी फासावर लटकवले आहे आजपर्यंत? अशा प्रकारांमुळे उलट जगाला असे वाटले की "पाकिस्तान हे रोग स्टेट आहे असे मुळात भारताला वाटतच नाही मग आम्ही तरी पाकिस्तानशी संबंध का बिघडवा" तर त्यात दोष कोणाचा? बास झाला हा उद्योग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
र
रणजित चितळे Mon, 08/30/2010 - 16:49 नवीन
खर आहे दोष आपलाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Tue, 08/31/2010 - 10:32 नवीन
आता अजून २० मिलियन डॉलर्सची मदत भारत सरकारने पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी जाहिर केली आहे. हे बघा: http://timesofindia.indiatimes.com/india/India-announces-additional-USD-20m-aid-to-flood-hit-Pak-/articleshow/6467271.cms याच बातमीत म्हटले आहे की पूर्वीची ५ मिलियन डॉलरची मदत पाकिस्तान UN करवीच स्विकारणार आहे. काय त्या ह***** मदत करायची हौस आली आहे कोणास ठाऊक! मागच्यावेळी उघडा पाडला तेवढा खरा चेहरा पुरेसा नव्हता का? ही आणखी वरची दक्षिणा कशाबद्दल दिली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतातुर जंतू
व
वेताळ Tue, 08/31/2010 - 06:46 नवीन
पाकिस्तान मध्ये झालेल्या पुराच्या नुकसानी मुळे तो देश आजकाल भिक मागु लागला आहे. चक्क रोज्याच्या महिन्यात पाकिस्तानी नेत्यांना कटोरा घेवुन गल्लोगल्ली भिक मागावी लागते हे किती दुर्दैवी आहे. आपण त्याचे शेजारी असल्या मुळे आपण त्याना जरुर मदत केली पाहिजे. त्याना जर पैशाच्या स्वरुपात मदत हवी असेल तर आपल्या नाशिक च्या प्रेस मधुन हवी तेवढी पाकिस्तान करन्सी छापुन तिथल्या लोकांमध्ये फुकट वाटली पाहिजे.जर तिथले लोक श्रीमंत बनले तर ते आपल्या का म्हणुन परत त्रास देतील? इतके तरी सौज्यन्य भारत सरकार दाखवत नाही ह्याचे दु:ख वाटते.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 08/31/2010 - 08:38 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
A
Arun Powar Wed, 09/08/2010 - 11:28 नवीन
पाकिस्तानला इतका पैसा देण्यापेक्षा, आपल्याच देशातल्या गोरगरिब जनतेला पैसा द्या म्हणा सरकारला..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा