Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बुद्ध व बौद्ध धर्म ..एक टिपणी

श
शरद
Sun, 09/05/2010 - 09:13
🗣 12 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
6716 वाचन

💬 प्रतिसाद (12)
प
प्रकाश घाटपांडे Sun, 09/05/2010 - 09:18 नवीन
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम !
प्रतिसादात जरुर लिहा!
  • Log in or register to post comments
श
शेलार मामा मालुसरे Sun, 09/05/2010 - 10:11 नवीन
>>>>>महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. असो. झाले तेवढेही कमी नाही.<<<<< आज जे लोक किंवा अनुयायी किंवा रिपब्लिकन कार्यकर्ते आम्ही बुध्दिस्ट आहोत असा शंखनाद करत असतात त्या सर्वांनी (एखादा अपवाद वगळून) कधीही बुध्दाच्या पंचशील तत्वांचे पालन केल्याचे तसुभरही आढळून येत नाही. चांगल्या विषयावरील धागा टाकला आहे. अवांतर - http://www.youtube.com/watch?v=s1QM0F4crr8
  • Log in or register to post comments
श
शेलार मामा मालुसरे Sun, 09/05/2010 - 10:07 नवीन
सध्याच्या (तथाकथित) बुध्दांच्या अनुयायांच्या विचारांचे मुल्यमापनही करायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Sun, 09/05/2010 - 15:19 नवीन
महत्वाचे हे कीं बुद्ध धर्म जा करुणेला, अहिंसेला, प्रेमाला मह्त्व देतो ते नवबुद्धांना समजवून सांगण्यात आले नाही. इथे त्यांना कोणी समजावून सांगावे हे अपेक्षीत आहे ? - कारण इतर ज्ञात धर्मात जे धर्मप्रमुख असतात. उदा. ख्रिश्चन धर्मात पोप, हिंदू धर्मात शंकराचार्य, मुस्लिम धर्मात शाही इमाम तसे बौध्द धर्मात आदेश / आज्ञा देणारे , फतवे काढणारे धर्मप्रमुख खूप अभावानेच दिसतात. त्यामुळेच मग डॉक्टरांना एका भिख्खुने दीक्षा दिली व समोरच्या लाखो लोकांनी हात वर केला व त्यांना बौद्ध घोषित करण्यात आले ! चूकीची पद्धत पध्दत ठरविणार कोण ? जी ठरवली गेली ती चुकीची कशी ? दुसरे म्हणजे बर्‍याच अंशी बौध्द धर्म हा - धर्म म्हणून मानण्यापेक्षा ती विचारप्रणाली म्हणूनच विचार केला जातो. त्या विचारसरणीमध्ये माणसाचे दैनंदिन आचरण , व्यक्ती-व्यक्तीमधले नाते आणि जगण्या मरण्याचा दृष्टीकोन ह्यावर मूलतः भर दिलेला दिसतो. त्यामध्ये काटेकोर आग्रह नाही. कारण धर्माची कठोर चौकट नाही. उदा. झेन विचारप्रणाली. अनेक झेनगुरु होऊन गेले त्यांच्या विचारात 'बुध्दासारखेच सर्वांनी वागावे' असे दिसणार नाही, परंतु जे वागणे योग्य वाटत नाही ते वागणे बुध्दासारखे नाही असे ते म्हणतात. ह्याचाच अर्थ कसे वागावे ह्या बाबत चौकट ठरलेली नाही, पण माणसाकडे काय आचरण असावे - मग त्यात अहिंसा, करुणा, प्रेम, त्याग, आत्मज्ञान- ह्याची समज दिलेली आहे. एकूण हिंसेला स्थान नाही त्यामुळे शत्रू ही संकल्पनाच नाही. फक्त आत्मसंरक्षणासाठी उपयोगी पडेल अशी विद्या शिकून घेण्यावर भर आहे पण त्याचा आक्रमतेने, हव्यासापोटी वापर करण्यावर बंधन आहे. शत्रू नसल्यामुळे युध्द / क्रुसेडस / जिहाद नाहीत. आता प्रश्न उरतो कि त्यांच्या अनुयायांनी केवळ प्रेम, करुणा अहिंसा ह्याचाच विचार करायचा कां ?(कारण त्यांनी बौध्द धर्माचे अनुकरण केले म्हणून ) ह्याचे उत्तर सध्याच्या काळात सुचणे अवघड आहे. असे गमतीने म्हणता येईल कि त्यांनी हे विचार सोडावेत आणि इतर कुठल्याही धर्मात प्रवेश करावा. तिथे हे शत्रू ठरलेलेच असतात ( अगदी धर्माच्या सुरवातीच्या काळापासूनच ) आणि त्याचा नि:पात करणे हे देखील धर्माच्या विचारसरणीला अनुसरून असते.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Wed, 09/08/2010 - 15:43 नवीन
पध्दत ठरविणार कोण ? जी ठरवली गेली ती चुकीची कशी ? स्वतः बुद्धाने ठरवली आहे.. संदर्भ. पैस आणी दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दत्ता काळे
य
युयुत्सु Sun, 09/05/2010 - 17:57 नवीन
हे अर्धसत्य आहे. बुद्धाने आत्म्याचे अस्तित्व नाकारले, वेद प्रामाण्य नाकारले, कारणा शिवाय कार्य घडते ही कल्पना, हे फरक हिन्दू आणि बौद्ध धर्मात आहेत. आत्म्याचे अस्तित्व नाकरण्यासाठी बौद्धानी केलेला युक्तिवाद हा भारतीय तर्कशास्त्राच्या इतिहासातला अजोड नमूना आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 09/05/2010 - 18:00 नवीन
आज जे लोक किंवा अनुयायी किंवा रिपब्लिकन कार्यकर्ते आम्ही बुध्दिस्ट आहोत असा शंखनाद करत असतात त्या सर्वांनी (एखादा अपवाद वगळून) कधीही बुध्दाच्या पंचशील तत्वांचे पालन केल्याचे तसुभरही आढळून येत नाही.
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sun, 09/05/2010 - 18:07 नवीन
वेदांतात व बौद्ध धर्मात मोक्षाकरिता वैराग्य, समाधी, तपश्चर्या, ज्ञानमार्गाने जाता येते व त्याकरिता निरनिराळ्या जन्मात आपली प्रगती करता येते असेच म्हटले आहे.
बौद्ध धर्मात मोक्ष ही कल्पना नाही. तर निर्वाण ही कल्पना आहे. निर्वाण हे याच जन्मात साधता येते मात्र मोक्ष याच जन्मात मिळत नाही. कोणतीही दरी पार करणे म्हणजे निर्वाण असा या संकल्पनेचा अर्थ एका बौद्ध पंडीताने सांगितल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Wed, 09/08/2010 - 15:40 नवीन
युयुत्सु साहेब, माफ करा पण हे सगळे संदर्भ मला दुर्गा भागवत यांच्या पैस आणी प्रतिभा रानडे ह्यांच्या 'दुर्गाबाईंशी ऐसपैस गप्पा ह्या पुस्तकात वाचलेले आठवतात....
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 09/11/2010 - 17:45 नवीन
ते पुस्तक माझ्याकडे आहे आणी मला दूर्गाबाईंविषयी नितांत आदर आहे. तरी पण त्यांच्या काही निरीक्षणांविषयी माझ्या मनात शंका आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु
व
विश्नापा गुरुवार, 09/09/2010 - 15:58 नवीन
गौतम बुद्धावरील विवेचन 'ओशो" यांनी केलेले आहे ते जरूर वाचावे..
  • Log in or register to post comments
स
सुहास.. गुरुवार, 09/09/2010 - 17:05 नवीन
आणखी भरपूर लिहण्यासारखे आहे पण इति अलम ! >>> गम्मत वाटतेय लेख आणी प्रतिसाद वाचुन ........ (पाली भाषेत 'मिलींदवख्ख,त्रिपिटीका,आणी कालींदिग्रम वाचणारा )
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा