'किल्ले जंजिरा': तिथले तथाकथित गाइड आणि त्यांचं ज्ञान!
💬 प्रतिसाद
(7)
न
निकित
Mon, 11/01/2010 - 09:42
नवीन
इतिहासाबद्दल जागरूक रहायलाच हवं ! पण मला आठवणऱ्या माहितीप्रमाणे चिमजीअप्पाने वसई चा किल्ला जिंकला होता ना ?
- Log in or register to post comments
ब
बाबय
Mon, 11/01/2010 - 09:51
नवीन
जंजिरा की वसई?
(माझा च गोंधळ झाला की काय? )
- Log in or register to post comments
स
स्पा
Mon, 11/01/2010 - 09:48
नवीन
हेच ते चिमाजी आप्पा.......................

- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 11/01/2010 - 09:49
नवीन
अहो बाबय महाराज,
जंजिरा हा शेवटपर्यंत अजिंक्यच होता. चिमाजीअप्पांनी जंजिरा नव्हे तर वसईचा अजेय किल्ला जिंकला होता. आणि माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही पुस्तकात जंजिरा पेशव्यांनी घेतल्याचा उल्लेख नाहीये.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशव्यांनी जंजिरा घेण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण अपयशच आले. अर्थात सिद्दींनी पण प्रथम आदिलशाही, मग मोंगल व त्यानंतर इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करून त्यांच्याशी वैर पत्करले नाही व किल्ला शेवट्पर्यंत म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत अजिंक्यच ठेवला. शेवटी शेवटचा सिद्दी मुहंमद खान याच्या कारकिर्दीत जंजिरा संस्थान ३ एप्रिल १९४८ रोजी भारतात विलीन झाले.
अवांतरः मिपावर जंजिर्याच्या तुमच्या भेटीविषयी फोटोसहित वर्णन येउ द्यात.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Tue, 11/02/2010 - 04:25
नवीन
जंजिर्याचा किला मूळचा कोळी लोकांचा. तिथे आधी छोटाच किल्ला होता पण भौगोलिक परिस्थितीमुळे तो ही अजिंक्य होता. राम पाटील हा तिथल्या कोळ्यांचा पुढारी होता. शिद्द्यांनी समेट करायला म्हणून त्या किल्ल्यात येऊन त्या आनंदाप्रीत्यर्थ त्या कोळ्यांना भरपूर दारू पाजली व सगळे नशेत तर्र झाल्यावर त्यांच्यावर हल्ला करून बेटाचा ताबा घेतला.
संभाजी महाराजांनी त्या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी समुद्रात भराव टाकून सेतू बांधायला सुरुवात केली खरी पण नंतर औरंगजेब दक्षिणेत उतरल्यामुळे ही मोहीम अर्धी सोडून जावे लागले होते.
असो.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 11/01/2010 - 10:02
नवीन
हॅ हॅ हॅ . इतिहासाबद्दलचे ज्ञान खरोखर सगळ्यांनाच वाढवले पाहिजे.
जंजिरा जिंकण्याचे मराठ्यांनी शेकडो प्रयत्न केले. शिवाजी महाराजांनी स्वतः कित्येक स्वार्या केल्या. संभाजी महाराजांनी अनेको मोहिमा काढल्या. सर्वात यशस्वी प्रयत्न बाजीरावाने केला. त्याने युद्ध जिंकत आणले होते. जंजिर्याची सर्व बाजुंनी कोंडी केली होती. परंतु त्याच वेळेस निजामाने स्वराज्यावर स्वारी केली त्यामुळे त्याला मोहीम अर्धवट ठेवुन परत फिरायला लागले.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Tue, 11/02/2010 - 03:50
नवीन
होय जंजिरा शेवट पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होइपर्यंत कोणालाहि जिंकता आला नाही. आणि चिमाजि अप्पांनी जिंकला तो किल्ला वसईचा होता.
- Log in or register to post comments