मुक्ती
💬 प्रतिसाद
(2)
श
शुचि
Tue, 11/02/2010 - 14:55
नवीन
लिंडा गुडमनने तिच्या एका पुस्तकात एका विचित्र विरोधाभासाचे सुंदर वर्णन केले आहे. - चंद्रावरोहणानंतर संपूर्ण विज्ञानजगत हर्षोल्हासात बुडून गेलेले असताना, काही कवी मनाच्या लोकांना मात्र त्याच गर्दीत खूप एकटेपण जाणवत होतं. शब्दात पकडता येणार नाही अशी एकटेपणाची भावना त्यांना टोचत होती. निराशेच्या गर्तेमध्ये हे लोक हळूहळू बुडू पहात होते.
याचे एक कारण मला हे वाटते की चंद्राचे काव्यामध्ये असलेले अढळ स्थान आणि त्याला बसलेला धक्का.
तद्वतच मुक्ती, स्वर्ग, नरक या कल्पना देखील भ्रमाच्या भोपळ्याप्रमाणे रहाव्यात असे मला वाटते. त्यांची चीरफाड करून, वास्तव जाणून घ्यावेसे वाटत नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Tue, 11/02/2010 - 18:09
नवीन
स्वर्ग, नरक, मुक्ती वगैरे शब्दांमागे ज्या भावना, जे विचार आहेत ते कोणि डिक्टेट केलेले, लादलेले नसुन मानवी मनाने, बुद्धीने एका मर्यादेपर्यंत जाउन त्यापलिकडे काय असावे याचा तो तर्क आहे... काहि जणांचा तो अनुभव आहे (असा त्यांचा दावा आहे). याविषयी सत्य जाणुन घ्यावे कि नाहि हा चॉईस माणासापुढे अजीबात नाहि, फक्त ते कधी जाणुन घ्यायचे याचा चॉईस आहे. तुम्ही कितिही टाळा, कधी ना कधी, कुठल्या तरी रुपात हे प्रश्न माणसापुढे उभे ठाकतातच. आणि तेंव्हा त्या प्रश्नांना फेस करण्यापलिकडे काहि पर्याय नसतो. याचं कारण एकच... ते म्हणजे "अस्तीत्व" या कंसेप्ट ची परिभाषा प्रत्येक जण आपपल्या परिने ठरवत असतो, आणि त्या परिभाषेची अपूर्णता त्याला कधी ना कधी जाणवतेच.
(परिभाशीक)अर्धवटराव
- Log in or register to post comments