एक प्रश्न
💬 प्रतिसाद
(111)
स
सुनील
Wed, 11/17/2010 - 19:09
नवीन
अशीच एक मनोरंजक चर्चा पलीकडे सुरू आहे. तिचाही आस्वाद घ्यावा!
बाकी "गोडसे" म्हटल्यावर आम्हाला तरी हेच आठवते. तुम्हाला काय आठवते?
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Wed, 11/17/2010 - 19:26
नवीन
कुणाला काय तर कुणाला काय
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/17/2010 - 19:33
नवीन
आता यावर दुसरीकडून 'अल्लाऽऽ जीव गेला' ऐकावं लागणार का काय? ;-)
- Log in or register to post comments
स
सुनील
गुरुवार, 11/18/2010 - 05:29
नवीन
च्यायला, तुमारा फटू मेरी फटूसे चकाचक कैसा?
असो, वर थोर्थोर मंडळी गंभीर चर्चा करीत असताना तुम्हा लोकांना असे थिल्लर चाळे सुचतातच कसे? (आता, त्या थोर्थोर मंडळींच्या दळणाचा आमच्या रोजच्या रोटीशी काय संबंध म्हणून काय विचारता?)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 11/18/2010 - 06:13
नवीन
>>>अशीच एक मनोरंजक चर्चा पलीकडे सुरू आहे. तिचाही आस्वाद घ्यावा !
ओसाड संस्थळाच्या रंगमंचावर काहीतरी हालचाल व्हावी त्यासाठी
अशा चर्चा आवश्यक आहे असे वाटते. :)
-दिलीप बिरुटे
[ओसाड संस्थळावरील सदस्य]
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 11/18/2010 - 06:15
नवीन
यावरून मला एकदम चिं.वि. जोशींच्या "ओसाडवाडीचे देव" हे पुस्तक आठवले. असो.
- Log in or register to post comments
न
नरेश धाल
गुरुवार, 11/18/2010 - 07:20
नवीन
विकास शेठ
मेरे पास काम धंदा है! यातिल काम धंदा वेब सायिट कुठे आहे, निट पत्ता द्या. मी बी जॉइन करतो.
- Log in or register to post comments
य
यकु
Sun, 11/21/2010 - 19:18
नवीन
त्यांचा खून केला जाणार आहे याबद्दल गांधींना सरदार पटेलांनी स्वत: भेटून पूर्वकल्पना दिली होती आणि पोलीसफोर्स तैनात करू देण्याचा आग्रह केला होता. पण अहिंसेची स्तोत्रे गाणार्या त्या गांधीबाबाने त्यांच्या सभेच्या प्रार्थनेच्या परिसरात पोलीसांनाही रिव्हॉल्व्हर बाळगायला मनाई केली होती.
नथुराम गोडसेंनी त्यांची भडास काढली आणि सर्वसाक्षींना पडलेला अहिंसेच्या व्याखेचा प्रश्न तेव्हाच जागतिक पटलावर उभा झाला तो तेव्हापासून तसाच आहे; कुणीही या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही आणि दिलेली उत्तरं मान्य होणार नाहीत कारण वास्तवात चालणारी उत्तरं नेहरूंच्या शासनाकडून (अॅटनबरोंच्या गांधी या सिनेमामध्ये एक खूपच मार्मिक दृश्य आहे - दंगलींच्या जाळपोळीत, धामधुमीत भारताला स्वातंत्र्य मिळते आणि पहिले पंतप्रधान नेहरू अख्ख्या चित्रपटभरात पहिल्यांदाच हातात सिगारेट घेऊन धूर काढीत पंतप्रधानांच्या खुर्चीत दिसतात! ) केव्हाच देऊन झाली आहेत - नथुरामना फाशी!
कोणत्याही शासनासाठी अहिंसेचे तत्व वगैरे सब झूठ है! एवढे लोक सांभाळायचेत ना (भलेही मग ते सांभाळता येवोत की न येवोत). गांधींची अहिंसा वगैरे त्यांच्यापुरतीच मर्यादीत होती आणि सध्या ती राजघाटाच्या कंपाऊंडच्या आत असते म्हणे!
अहिंसेच्या पराभवाची तर बिलकुल चर्चाच नको - नथुरामची गोळी खाऊन गांधीनी राम म्हटला तेव्हाच अहिंसेची काय लागायची ती वासलात लागलीय.
गांधींची अहिंसा इंग्रजांना मान्य नव्हती आणि आपण स्वीकारलेल्या इंग्रजांच्याच कार्बन कॉपी कायद्यात तर खूनाला शक्यतोवर फाशीचीच शिक्षा दिली जाते - कायद्याचे यथायोग्य पालन झाले आहे.
आता तुम्ही कायदा गाढव आहे म्हणा, गांधींचे आणि नथुरामचेही टाळके सरकले होते म्हणा काहीही म्हणा. त्यानं काय फरक पडतो?
- Log in or register to post comments
D
daredevils99
Mon, 11/22/2010 - 12:44
नवीन
नथुराम प्रेम ही एक वि़कृती.
अनवधानाने तुमचा उल्लेख नथुराम प्रेमी असा केला गेला. त्याबद्दल जाहीर माफी.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Mon, 11/22/2010 - 20:29
नवीन
नथुराम प्रेम ही एक वि़कृती... असे असेल तर मिपावर असे अनेक विकृत दिसत आहेत.
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Mon, 11/22/2010 - 13:28
नवीन
माननीय संपादक मंडळाला विनाकारण कामाला लावणारा धागा पाहुन ड्वोले पाणावले!
(वर्तमानात जगणारा) ॠषिकेश.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3