Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१५ करोड द्या, नाहीतर टाटा गुडबाय

ग
गांधीवादी
Wed, 11/17/2010 - 13:44
🗣 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3079 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अवलिया Wed, 11/17/2010 - 13:50 नवीन
टाटांनी नुसतं बेंबीत बोट घालुन गार आहे असे न म्हणता स्पष्ट कोण मंत्री, कोण अधिकारी असे सांगितले असे तर जास्त योग्य झाले असते. हे असे मोघम सांगणे म्हणजे बघा मी किती प्रामाणिक आहे असे ढोल वाजवणे आहे. दहा वर्षांनंतर बोलायचेच होते तर व्यवस्थित माहिती देऊन बोलायला हवे होते असे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी आपल्याला जास्त कळत नाही हे जगजाहिर आहे. बाकी व्हीएसएनेल चे डिलींग कसे झाले याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 11/17/2010 - 13:56 नवीन
टाटा खोटे बोलत आहे म्हणायचे नाही पण तरीही नाना म्हणतो ते बरोबर आहे. उगाच मोघम बोलण्यापेक्षा वट्टात नाव घेऊन बोलले असते तर बरे झाले असते, तसाही तो मंत्री कुणीही असता तरी 'आज' टाटाचे काय वाकडे करु शकणार आहे ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ध
धमाल मुलगा Wed, 11/17/2010 - 13:58 नवीन
एकतर बैल गेला अन खोपा केला हे कशाला? तेव्हांच आवाज उठवला असता तर काय झालं असतं? सर्वसामान्य माणसाला पांढर्‍या दहशतवाद्यांनी गायब केला असता पण ते टाटांना काय करु शकले असते? शिवाय, 'पण सामाजिक नीती मुल्ये जपत ' हे अंमळ तपासून पहावं लागेल साहेब. :) टाटा टेलीसर्व्हिसेस चे कोणी ग्राहक आहेत का तुमच्या परिचयाचे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
व
विद्याधर३१ Wed, 11/17/2010 - 16:57 नवीन
ठोस पुरावा नसेल तर नाव घेणे अवघड आहे. त्यामुळेच मोघम उल्लेख केला असावा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
व
विजुभाऊ Mon, 11/22/2010 - 05:43 नवीन
सर्वसामान्य माणसाला पांढर्‍या दहशतवाद्यांनी गायब केला असता त्यावेळचे दहशतवादी नुसते पांढरेच नव्हते. ते आणखी वेगळ्या रंगाचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
C
chipatakhdumdum Wed, 11/17/2010 - 17:09 नवीन
Nano ला आता कुत्रा सुध्दा विचारत नाही. सरळ showroom ला विकत मिळते. वर loan ची सोय सुध्दा हे लोक करतात. आता मला सांगा, येवढे पैसे booking च्या वेळी गोळा केले , ते परत देताना रडतात का? Nano च्या विषयाला बगल म्हणून ही नाव न सांगता केलेली नाटक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
न
नितिन थत्ते Wed, 11/17/2010 - 17:22 नवीन
सहमत आहे. शिवाय गांधीवादी यांनी जुनी माहिती दिली आहे. आपल्याकडे पैसे मागितले असे टाटांनी म्हटले नाही असा खुलासा टाटा कंपनी तर्फे करण्यात आला आहे. कदाचित नव्याने कंपनी चालू करताना परवानग्या मिळण्यासाठीचे टॅक्टिक्स असू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शाहरुख Wed, 11/17/2010 - 13:58 नवीन
टाटाने आत्तापर्यंत कधीच पैसे खिलवले नसतील यावर आमचा विश्वास नाही !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 11/17/2010 - 17:22 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाहरुख
प
परिकथेतील राजकुमार Wed, 11/17/2010 - 14:07 नवीन
गांधीवादी ज्या सातत्याने अशा प्रश्नांना वाचा फोडतात आणि जनजागृती करतात त्याबद्दल त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. मिपावर आज देशाचा आणि देशवासीयांच्या भविष्याचा खरा विचार करणारे कोणी असेल तर ते गांधीवादी आहेत :) बाकी चार घटका टिवल्या बावल्या करायला येणार्‍या आणि स्वतःच्या खोट्या विश्वात मग्न असणार्‍या दांभिकांनी त्यांच्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे ह्यात नवल नाही.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Wed, 11/17/2010 - 14:42 नवीन
संरक्षण्,टेलिकॉम्,विमाने ह्यांच्या कंत्राटांमध्ये सरकारी उच्च अधिकारी,मंत्र्यांनी पैसे खाल्ले नाहीत असे सहसा होत नाही. मंत्रीमंडळ बनवायच्या सुमारास ह्या खात्यांमध्ये आपला माणूस असावा ह्यासाठी सर्वच पक्ष खूप मेहनत घेतात. टाटांनी जोउल्लेख केला आहे तो मंत्री म्हणजे बहुतेक सी.एम. इब्राहिमच आहेत. म्हणूनच मंत्र्याचे नाव जाहीर करा नाहीतर आत्महत्या करेन अशी धमकी इब्राहिम ह्यांनी दिली आहे!! टाटांनी नाव घेतले नाही कारण अशा डील्समध्ये कागदी व्यवहार कधीही होत नाहीत. त्यामुळे आरोप शाबित करणे अशक्य असते.म्हणूनच टाटांनी अप्रत्यक्ष उल्लेख(९०च्या दशकातला मंत्री) केला आहे. टाटाने आत्तापर्यंत कधीच पैसे खिलवले नसतील यावर आमचा विश्वास नाही ! हल्ली हे व्यवहार डायरेक होतात. म्हणजे १५ कोटी द्या,परवाना देतो. पूर्वीच्या काळी पैसे न खिलवता ही कामे व्हायची. म्हणजे माझ्या मतदार संघात/राज्यात कारखाना उघडा/थोडे फार पैसे पक्षाला दक्षिणा म्हणून द्या मग परवाना देतो. अवांतर- स्वातंत्र्यपूर्व काळातही बिर्ला,वालचंद हिराचंद वगैरे उद्योगपतींचे काँग्रेसनेत्यांबरोबर चांगले संबंध असायचे.
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 11/21/2010 - 14:19 नवीन
रतन टाटांना का दोष देता ? त्यांच्यासारखा सचोटीचा, जेआरडींचा प्रामाणिक वारसा चालवणारा दुसरा कोणी उद्योगपती नाही या देशात. ज्यांना फक्त या देशातली भौतिक प्रगतीच दिसत आहे ते बाकीच्या वास्तवाकडे डोळेझाक करणारच.
  • Log in or register to post comments
द
दिनेश५७ Mon, 11/22/2010 - 06:36 नवीन
Crisis of Character by Uday Dandavate वाचा - http://theradicalhumanist.com/index.php?option=com_radical&controller=article&cid=253&Itemid=56
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा