राजकिय ढोंगबाजी
💬 प्रतिसाद
(19)
व
विलासराव
गुरुवार, 11/18/2010 - 05:56
नवीन
तोड किंवा गोणी तरी उचलायची होती.
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
गुरुवार, 11/18/2010 - 06:10
नवीन
पण्णास वर्षापूर्वीचा जुणा झाला हा जॉक.
अवांतर : या फोटोत महात्मा गांधी असते तर ते पंचा नेसलेले आणि वहाणा घातलेले किंवा अनवाणीही दिसले असते. पण त्यालाही ढोंगच म्हटले गेले असते.
- Log in or register to post comments
ग
गांधीवादी
गुरुवार, 11/18/2010 - 06:26
नवीन
हा घ्या नवीन जॉक.
http://72.78.249.107/esakal/20101102/4945243854625081862.htm
>> गरीब आणि श्रीमंतांना एकत्र आणण्याचे काम कॉंग्रेसच करू शकते, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे केले. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या अधिवेशनात त्यांनी पक्ष सदस्यांना देशातील गरिबांसाठी काम करण्याची सूचना केली. गरिबांमध्येच देश पुढे नेण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जर खरेच, गरीबच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात तर व्हा ना बाजूला, निवडणुकीला तरी का उभे राहतात ? का राजपुत्र देखील गरीब कॅटेगरीत मोडतात ?
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 11/18/2010 - 06:43
नवीन
>>या फोटोत महात्मा गांधी असते तर ते पंचा नेसलेले आणि वहाणा घातलेले किंवा अनवाणीही दिसले असते. पण त्यालाही ढोंगच म्हटले गेले असते.
सहमत आहे.
आजकाल काँग्रेसची कुठलीही गोष्ट "ढोंग" म्हणुन घेणार्यांचा आम्हाला मनापासुन राग येतो. आमची देशाप्रती आणि देशातल्या गरिब, अडाणी, मागास ( जात नव्हे ) जनतेला आम्ही जे प्रेम देतो त्याला काही आमचे हितशत्रु 'ढोंग' म्हणतात हाच शुद्ध ढोंगीपणा आहे.
१. राहुल गांधीनी मुंबईत 'गर्दीतुन' केलेल्या लोकल प्रवासाला आणि परवाच बिहार का कुठे केलेल्या 'स्लिपर' क्लासमधुन केलेल्या प्रवासाला ढोंग म्हणणारे हलकट लोक गांधीजींच्या 'दांडी यात्रा' ह्या गोष्टीलाही ढोंगच म्हणत असतील.
२. जेव्हा राहुल विदर्भात एका गरिब मागासवर्गिय शेतकर्याच्या घरात आणि अजुन कुठे गरिब अल्पसंख्यांक्याच्या घरात 'जेवायला / रहायला' गेले तेव्हा हे ढोंगी लोक ह्या मनापासुन तळमळीने केलेल्या कार्याला ढोंग म्हणतात.
अरे उद्या जेव्हा गांधीजी खुद्द व्हॉईसरॉयला त्याच्या महालात भेटायला पंचा नेसुन गेले होते त्यालाही 'ढोंग' म्हणणार का ?
३. राहुल गांधींजींनी केलेल्या सर्वसामान्यांबरोबरच्या 'लोकल प्रवासा'ला हे लोक ढोंग म्हणतात.
अरे बाबांनो उद्या तुम्ही 'गांधीजी आपल्या शेळीला बरोबर घेऊन जो तृतीय श्रेणीतला रेल्वे प्रवास करत ( कोण म्हणाला रे तो की त्यासाठी आख्खा डब्बा बुक करावा लागे, हाकला त्याला ) त्याला तुम्ही 'ढोंग' म्हणणार का ?
असे आहे ते.
हे टिकाकारच मुळी ढोंगी आहेत. त्यांना सत्य, त्याग, निष्ठा, कळकळ आदी बाबी नाय समजायच्या.
राहुल गांधी आणि थत्तेजींनी ह्यांना डरु नये, आमचा पाठिंबा आहेच.
लढा बिनधास्त :)
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे
गुरुवार, 11/18/2010 - 07:37
नवीन
सहमत आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 11/18/2010 - 08:19
नवीन
सहमत आहे
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 11/22/2010 - 07:15
नवीन
थत्ते चाचा आणि चोता दोन ह्यांच्याशी तहेदिलसे सहमत आहे !
मिपाच्या व्यासपीठाचा वापर आजकाल केवळ महान काँग्रेस पक्ष आणि देवतुल्य महात्मा गांधी आणि नेहरु ह्यांच्यावर टिका करण्यासाठीच होत आहे असे दिसते.
काँग्रेस शिवाय इतर कुठलाही पक्ष हा देश चालवुच शकत नाही हे लोकांना कधी लक्षात येणार ?
असो..
ते म्हणतात ना 'झोपेचे सोंग घेतलेल्याला...'
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Mon, 11/22/2010 - 07:41
नवीन
>>काँग्रेस शिवाय इतर कुठलाही पक्ष हा देश चालवुच शकत नाही हे लोकांना कधी लक्षात येणार ?
ह्यात मी 'गांधी घराण्याच्या नेतृत्वातला कॉंग्रेस ' असा बदल सुचवु इच्छितो.
असो, मुद्दा असा आहे की २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे सध्या भयकंर गदारोळ उडाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पार पंतप्रधान कार्यालयाला जाब वगैरे विचारला म्हणे.
आता ह्या परिस्थीती 'आदरणीय राहुलजी गांधी' ह्यांनी सत्ता हातात घ्यावी असा प्रस्ताव मी मांडतो.
गरिब आणि मागास समाजाविषयी असणारी तळमळ, त्यांचे प्रश्न जाणुन घेण्याची आणि ते सोडवण्याची ताकद, प्रांतिक समस्यांचे अचुक विश्लेषण आणि निदान ( जसे की 'युपी-बिहार्यांनी मुंबई वाचवली, सबब त्यांनी इथे राहण्यातच मुंबईची भलाई आहे' वगैरे ), आपल्या सहकार्यांची अचुक निवड व त्यांना दिलेल्या जबाबदार्या ( जसे की 'अशोक चव्हाण, ओमर अब्दुल्ला ' वगैरे ), राजपुत्राची वलयांकित छबी अशा अनेक बाबी त्यांना सदर पद स्विकारण्यास 'लायक' ठरवतात.
पाठिंबा आणि बहुमताचा प्रश्नच नाही, 'राहुल गांधी' ह्यावर सहमती होणे अजिबात अशक्य नाही.
राहता राहिला सवाल त्यांच्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा, तर त्यांना विचारतो कोण ?
द्या त्यांना पाठवुन्राजकिय वनवासात ...
असो, आता 'बदल ( पक्षी : चेंज ( श्रेयअव्हेर : बराकजी ओबामासाहेब ) ) ' घडवण्याची वेळ आली आहे.
परवाच्या भारत दौर्यात ओबामांनी संसदेच्या भाषणानंतर खास थांबुन राहुलजींशी जो वार्तालाप केला त्यानंतर राहुलजी भारताचेच काय पण भविष्यातले 'जगाचे नेते' होऊ शकतात असा आमचा विश्वास आहे.
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 11/22/2010 - 07:58
नवीन
>>>राहुलजी भारताचेच काय पण भविष्यातले 'जगाचे नेते' होऊ शकतात असा आमचा विश्वास आहे.
पूर्णपणे सहमत आहे. मी तर म्हणतो जगाचेच काय अख्ख्या सूर्यमालेचेच.. नाही नाही... आकाशगंगेचे.. चूकलो चूकलो.. अखिल ब्रह्मांडाचेच नेते...
अखिल ब्रह्मांड नायक श्री श्री.. अनंतश्री राहुलजी यांचा विजय असो !
असो.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 11/22/2010 - 08:03
नवीन
डॉन्रावांशी सहमत आहे.
देशाचा कारभार लवकरात लवकर तरुणांचे आशास्थान, निगर्वी, निधर्मी, नम्र, काळा बरोबर चालणार्या आणि जनतेच्या मनाचा कोपरान कोपरा ज्यांच्या विषयीच्या श्रद्धेने भरुन वाहात आहे अशा माननिय श्री. राहुलजी गांधी ह्याच्या हातात जावा हिच सदगुरुंचरणी प्रार्थना.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Mon, 11/22/2010 - 05:32
नवीन
>>अवांतर : या फोटोत महात्मा गांधी असते तर ते पंचा नेसलेले आणि वहाणा घातलेले किंवा अनवाणीही दिसले असते. पण त्यालाही ढोंगच म्हटले गेले असते.
याला मळमळ असेच म्हणावे लागेल.
निदान डोळ्यासमोर जे आहे ते तरी मान्य करायला काय हरकत आहे? जी गोष्ट सरळ सरळ ढोंग आहे हे कळतेय त्याला सुद्धा ढोंग म्हणायचे नाही का?
- Log in or register to post comments
उ
उल्हास
Mon, 11/22/2010 - 20:26
नवीन
अरे राहुल गान्धी ८७ वर्षाचा झाला वाट्ते
एवढा जुना फोटो का बरे टाकला आहे
या ढोन्गी लोकान्चे काय करावे
- Log in or register to post comments
च
चिरोटा
गुरुवार, 11/18/2010 - 07:35
नवीन
भारतात मते मिळवायची असल्याने राजकारण्यांना ढोंगे करावीच लागतात्.कधी धर्माचे ढोंग, कधी जातीचे तर कधी भाषेचे तर कधी गरीबीचे!
- Log in or register to post comments
त
तिमा
Sun, 11/21/2010 - 14:11
नवीन
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ?
- Log in or register to post comments
प
प्रशु
Sun, 11/21/2010 - 17:12
नवीन
असली नाटकं करण्यापेक्षा गांधी आणि त्यांचे बगलबच्चे हातात सत्ता असताना लोककल्याणकारी कामं का नाही करत? मागे कोण ती कलावती कि लिलावती राहुल ला भेटायला दिल्ली ला गेली तर ह्या युवराजाने त्यांना विचारले देखील नाही. बाकी सिनियर गांधीची सगळी नाटकं होती हे मात्र मान्य. ब्रिटीश त्यांना मस्तपणे आगाखान राजवाड्यात ठेवत...
हलकट प्रशु...
- Log in or register to post comments
क
कोकणप्रेमी
Mon, 11/22/2010 - 07:46
नवीन
असली नाटकं करण्यापेक्षा गांधी आणि त्यांचे सहकारी व अनेक राज्यान्मधे हातात सत्ता असताना लोककल्याणकारी कामं का नाही करत? स्वता नामानिराळे राहुन आपल्या सहकार्यान्च्या मार्फत भ्रष्टाचार करवुन पैसा स्विस्स बॅन्केत जमा करणे व वेळ प्रसन्गि त्याच सहकार्याना लाथा घालणे.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Mon, 11/22/2010 - 15:42
नवीन
असे किती राजकारणी आहेत जे तळागाळातल्या लोकांच्या जवळ जातात, त्यांच्याशी बोलतात (निवडणुक सोडुन)?
हा माणुस त्याला जमेल तसे समाजाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे तर काही कुपमंडुक लोक त्याला नाटकी, ढोंगी म्हणुन हिणवत आहेत. या पैकी किती लोकंनी पत्र्याच्या जाउद्या, प्लस्टीकच्या टबातुन दगड्/माती वाहीली आहे? किती लोकांनी दलितांच्या झोपडीत जाउन त्यांचे दुक्ख समजुन घेतले आहे (त्यांच्याबरोबर जेवणे दुरची गोष्ट)?
राहुलला ज्या देशावर राज्य करायचे आहे तो देश त्याच्या परीने समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे, ही दिलासादायक गोष्ट आहे. नाहीतर विलायतेतुन आला आणी सिंहासनावर बसला असे तो करु शकत होता. राजीव गांधींच्या बाबतीत असे (अपरीहार्यपणे?) झाले होते. एवढा पॉवरफुल माणुस असुन (अजुन तरी ) त्याचे चारित्र्य निष्कलंक आहे. अविवाहीत असुनही काही लफडी केली नाहीत. कोणत्याही घोटाळ्यात सामील नाही. पैशांसाठी किंवा सत्तेसाठी वखवखलेला नाही.
त्यामुळे त्याला पंतप्रधान होण्याला आपला फुल सपोर्ट. दुनीयावाले कुछ भी कहें, राहुलजी लगे रहो.
//// मी काँग्रेसचा कार्यकर्ता / सपोर्टर / मतदार नाही. फक्त सर्व पक्षांकडुन आणी नेत्यांकडुन अपेक्षाभंग झालेला सामान्य भारतीय माणुस आहे, जस्ट कॉमन मॅन
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Mon, 11/22/2010 - 16:09
नवीन
राहुल गांधींना अमेरिकेतील एका एअरपोर्टवर काही लाख डॉलर रोख घेऊन जाताना पकडलं होतं असा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी जाहीरपणे केला होता. अर्थातच पुराव्याअभावी तो निखालस खोटा आहे हे आपोआपच सिद्ध आहे. त्यामुळे ते वडीलांसारखेच मि. क्लीन आहेत ( कोण तो क्वात्रोची क्वात्रोची करून ओरडतोय रे?)
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 11/22/2010 - 21:52
नवीन
या राजकारण्यांनी आपली पत इतकी घालवलीय, कि जर कोणि खरच गरीबांचे जीणे, १० मि. का होईना, अनुभवायचा प्रयत्न केला तर सरळ सरळ ढोंग वाटतं.
आता हे ढोंग असो वा नसो... राहुलबाबा एक एक पायरी प्रधानमंत्री पदाकडे अग्रेसर होतोय हे नक्की. त्याला कोणाची काँपिटीशन पण नाहि... शिवाय नरेंद्र मोदींची. पण नरेन भाई अजुन फारच मागे आहेत.
(ढोंगी) अर्धवटराव
- Log in or register to post comments