एक विचार
💬 प्रतिसाद
(30)
ए
ए.चंद्रशेखर
Sat, 11/27/2010 - 07:43
नवीन
साहित्याला अवकळा फक्त एकाच कारणाने येऊ शकते असे मला वाटते. ते कारण म्हणजे वाचकांचा अभाव. लिहिलेले साहित्य जर कोणी वाचतच नसले तर त्या भाषेतील साहित्याला अवकळा येणारच. समीक्षक कशाची व काय समीक्षा करतात यावर साहित्य निर्मिती थोडीच अवलंबून असते?
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 11/27/2010 - 07:48
नवीन
सहमत आहे. परंतु अमुक एक साहित्य विवक्षित गुणवत्तेचे नाही किंवा त्यात अमुक गोष्टी असल्याने सदर लेखक हा दुय्यम दर्जाचा असुन त्याचे साहित्य सभ्य लोकांनी वाचण्याजोगे नाही असा अपप्रचार करुन सदर लेखकाच्या साहित्यावर समीक्षक गंडांतर आणु शकतात. सर्वसामान्य लोकांनी एखाद दुसर्या पुस्तक/ग्रंथाला असभ्य भाषा अथवा दिशाभुल करणारी वाक्ये म्हणुन केलेल्या विरोधापेक्षा अशा विचारवंत समीक्षक भुमिकेतुन जाहिर अथवा कुजबुज माध्यमातुन केलेली टीका किंवा वितरण माध्यमांवर दबाव आणुन अशा साहित्याची केलेली मुस्कटदाबी ही जास्त घातक असावी असे मला वाटते.
- Log in or register to post comments
ए
ए.चंद्रशेखर
Sat, 11/27/2010 - 07:56
नवीन
सिनेमा नाटकांची समीक्षणे लोक आवडीने वाचतात. साहित्य वाचताना काय समीक्षण आले आहे ते बघून त्यावरून कोणी काय वाचावे हे ठरवत असेल असे मला तरी वाटत नाही. Word by mouth प्रसिद्धी ही सर्वात महत्वाची वाटते.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 11/27/2010 - 07:58
नवीन
तुमच्या मताबद्दल आदर आहे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sat, 11/27/2010 - 07:44
नवीन
सहमत आहे हो नानबा.
सहित्यात काय असावे किंवा नसावे ह्यावर एकवेळ एखाद्या वाचकानी टिपणी केली अथवा त्या विशिष्ठ साहित्याची खिल्ली उडवली तरी एकवेळ योग्य आहे. कारण 'स्वांतसुखाय लेखन करतो' वगैरे म्हणणारे लेखक हे खरच ढोंगी असतात. आपण लिहिलेले चार जणांनी वाचावे, दोघांनी प्रतिक्रीया द्याव्यात, कोणा एकाला ते वाचुन आनंद वाटावा असेच सर्वसाधारण लेखकांचे मत असते. (किंवा हे मक्त माझे मत आहे असे म्हणले तरी हरकत नाही)
पण जेंव्हा स्वतः पांढर्यावर काळे करण्याचे कष्ट देखील न घेणारे स्वयंघोषीत साहित्यीक आणि समिक्षक अधिकारी पदावर बसतात तेंव्हा तर साहित्याला नुसती अवकळाच येत नाही तर साहित्याची बरबादी होते. कारण हे अधिकारी नुसती टिकाच करणारे नसतात तर साहित्याचे अस्तित्व सुद्धा त्यांच्या मर्जीवर ठरायला सुरुवात होते.
असो....
प्रदेश असो वा संस्थळे वरिल नियम सर्व ठिकाणी लागु आहे !
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sat, 11/27/2010 - 07:55
नवीन
पण जेंव्हा स्वतः पांढर्यावर काळे करण्याचे कष्ट देखील न घेणारे स्वयंघोषीत साहित्यीक आणि समिक्षक अधिकारी पदावर बसतात तेंव्हा तर साहित्याला नुसती अवकळाच येत नाही तर साहित्याची बरबादी होते. कारण हे अधिकारी नुसती टिकाच करणारे नसतात तर साहित्याचे अस्तित्व सुद्धा त्यांच्या मर्जीवर ठरायला सुरुवात होते.
सहमत आहे.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Sat, 11/27/2010 - 08:59
नवीन
>>सदर वाक्य वाचुन आपल्या मनात काय प्रतिक्रिया उमटते हे प्रतिसादातुन लिहावे अशी अपेक्षा आहे
"नानाजींचं लिखाण उडवलेलं दिसतंय" अशी प्रतिक्रिया मनपटलावर उमटली !
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 11/28/2010 - 10:44
नवीन
=)) =))
थँक्सगिव्हींगचा टर्की मानावला दिसतोय शारूखा!
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sat, 11/27/2010 - 10:48
नवीन
समीक्षकांचे लेखन कोणी वाचत का ?
आणि वाचल्यास त्यातील मतानूसार काय वाचायचे आणि काय नाही हे कोणी ठरवतं का?
कदाचित पुरस्कार (विशेषतः सरकारी ) मिळणे , न मिळणे या बाबत काही फरक पडू शकतो .
- Log in or register to post comments
श
शुचि
Sat, 11/27/2010 - 19:42
नवीन
>> समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणा-या मंडळीनी >>
गवताच्या दवणीवर बसलेले कुत्रे. स्वतः खात नाहीत आणि दुसर्याला सुखाने खाऊ देत नाहीत .
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 11/27/2010 - 14:15
नवीन
बरेच वेळा असे घडते...काहि व्याक्ये..व विचार तर तुमच्या जीवनाची व विचारांची दिशाच बदलून टाकतात..इतके प्रभावि असतात.......
- Log in or register to post comments
न
नंदू
Sat, 11/27/2010 - 16:39
नवीन
धागाप्रवर्तक हे आंतरजालीय विचारवंत आहेत ;-)
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sat, 11/27/2010 - 17:48
नवीन
उपरोक्त वर्णनातला एक शब्द चुकला असावा काय अशी शंका आली. पण असो असो.
- Log in or register to post comments
आ
आमोद शिंदे
Sat, 11/27/2010 - 18:57
नवीन
अर्धाच शब्द चुकला आहे.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 11/28/2010 - 06:40
नवीन
वरील तीनही प्रतिसाद धाग्याच्या विषयाशी सुसंगत नसल्याने अवांतर आहेत. पण उडणार नाहीत याची खात्री आहे.
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 11/28/2010 - 10:43
नवीन
माफ करा, फक्त एकच अक्षर चुकले आहे. :-)
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
Sat, 11/27/2010 - 19:47
नवीन
मजेशीर धागा आणि 'रोचक' प्रतिसाद.
सध्या गडबडीत आहे, सोमवारी व्यवस्थित उहापोह करु ...
- छोटा डॉन
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Sun, 11/28/2010 - 03:48
नवीन
इतका गंभीर विचार मजेशीर कसा असू शकतो? ह्यात मजेशीर काय आहे हे डॉनरावांनी कृपया समजावून सांगावे!
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 11/28/2010 - 06:41
नवीन
हेच विचारतो. धाग्यातील विषयातील मजेशीरपणा समजेल अशा भाषेत विस्तृतपणे समजावुन सांगावा अशी डान्रावांना कळकळीची विनंती !
- Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत
Sun, 11/28/2010 - 15:50
नवीन
हेच म्हणतो !
;-)
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Mon, 11/29/2010 - 17:12
नवीन
सोमवार संपत आला राव! डॉन राव कुठ पोहं कराया आलं नाहीती?
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Wed, 12/01/2010 - 06:02
नवीन
डॉन रावासनी Gentle Reminder ;)
- Log in or register to post comments
स
सद्दाम हुसैन
Sat, 11/27/2010 - 21:25
नवीन
सुंदर विचार.
- Log in or register to post comments
च
चिगो
Sun, 11/28/2010 - 06:18
नवीन
अमुक गोष्ट उच्च अभिरुचीची आणि तमुक कनिष्ठ दर्जाची हे वर्गिकरणच चुकीचे आहे असे मला वाटतं.. काहीतरी शाब्दिक जंजाळ लिहुन क्लिष्टतेचा आणि अनुशंगाने विद्वत्तेचा भाव आणि आव आणणारे लेखन हे समिक्षकांना बरेचदा आवडतं, पण म्हणुन वाचकांनाही ते आवडेलच असे नाही.. शेवटी काय, ज्याला जे आवडतं, ते त्यानी वाचावं.. समिक्षकांना वारंवार वाचकांनी योग्य त्या जागी मारलेच आहे..
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sun, 11/28/2010 - 07:56
नवीन
हा देखिल एक साहित्यप्रकारच नाही का? काव्य, कथा, वैचारिक, ललित असे आपापल्या आवडी नुसार लिहिले जाते. मग समिक्षा हे देखिल एक प्रकारचे लेखनच आहे. किंबहुना उत्कृष्ठ समिक्षण हे फार अवघड असते असे माझे वैयक्तिक मत आहे. एखाद्या लेखनाचे समिक्षण करण्यासाठी मुळात ते लेखन सखोलपणे वाचावे लागते, त्यामागची लेखकाची भूमिका जाणुन घ्यावी लागते, त्या लेखनातुन लेखकाला अभिप्रेत असलेल्या व्यतिरिक्त अन्य काही अर्थ प्रतित होतो का याचा अभ्यास करावा लागतो. मुळात समिक्षा ही अत्यंत निरपेक्ष असणे अत्यंतिक महत्वाचे आहे.
समिक्षकाला समिक्षा करताना 'मला रुचले का? मला उमगले का? आशय मला पटला वा आवडला का? ' इत्यादिचा विचार करुन चालत नाही तसेच प्रथम वाचनात ते लेखन लेखकाचे नाव न पाहता वाचले जाणे आवश्यक आहे. समिक्षा ही पूर्वग्रहदूषीत नसावी, वैयक्तिक पसंती-नापसंती वर आधारित नसावी आणि निरपेक्ष असावी; किंबहुना व्यक्तिसापेक्ष असू नये. कुठलेही समिक्षण एखादा लेखक आपला आवडता/ चाहता आहे किंवा या लेखकाचे लेखन उत्तम असते/ सुमार असते यावर आधारित नसावे तर ते समिक्षण हे सर्वार्थाने निरपेक्ष असावे. अर्थात समिक्षणोत्तर समरोपात ज्याची समिक्षा केली अहे ते लेखन त्या लेखकाच्या अन्य साहित्यकृतींच्या मानाने कसे आहे यावर समिक्षकाचे मत अवश्य असावे.
निरपेक्ष समिक्षणातुन समिक्षक सदर लेखनात 'काय आहे ' ते सांगायचा प्रयत्न करु शकतो, त्यावर आपले साधक बाधक विचार मांडु शकतो. मात्र साहित्यात काय असावे वा नसावे हे समिक्षकाने वाचकांना ठरवु द्यावे. जर समिक्षण हे निरपेक्ष आणि सखोल असेल तर त्याचा प्रभाव वाचकांवर अवश्य पडेल, मग असावे/नसावे हे सांगण्याचा प्रपंच करायची गरज भासणार नाही. जर एखादे लेखन समिक्षकाला आवडले नाही परंतु वाचकांना आवडले (आणि ते लेखन लेखनस्थळाच्या मर्यादेत बसत असले) तर त्या आवडण्यावर समिक्षकाने टिका करु नये कारण समिक्षणाचा अधिकार जसा समिक्षकाला आहे तसाच काय वाचावे आणि काय आवडावे हा अधिकार वाचकाचा आहे.
यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Sun, 11/28/2010 - 07:58
नवीन
अतिशय सुरेख प्रतिसाद. :)
>>>>यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
क्या बात है ! मस्त ! बेस्ट !!
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Sun, 11/28/2010 - 13:06
नवीन
अगदी पटण्यासारखा असा हा प्रतिसाद आहे. समीक्षा हादेखील एक साहित्यप्रकारच मानला पाहिजे. पण सध्या पेड पत्रकारितेचा सर्वत्र सुळसुळाट झाला असल्याने कोणते समीक्षण निरपेक्ष आहे आणि कोणते विशिष्ट हेतूने प्रेरित झालेले आहे (जसे - पैसा,एखाद्याची बदनामी करणे इत्यादी) हेच कळत नाही. म्हणजे अशा पेड समीक्षेचे उदाहरणच घ्यायचे झाले तर लोकसत्ता मधील अग्रलेखांचे घेता येईल.
काही समीक्षक समीक्षा करताना आम्ही अमुक एका दॄष्टीकोनातूनच परीक्षण करत आहोत असे स्पष्टपणे सांगतात. जसे - श्री. सावरकर यांच्या 'सहा सोनेरी पाने' या ग्रंथामध्ये 'सदर ग्रंथ हा इतिहासाची हिंदुराष्ट्रीय दॄष्टीकोनातून समीक्षा करणारा ग्रंथ आहे' असा स्पष्ट उल्लेख आहे. समीक्षकाने स्वच्छपणे अशा गोष्टी मान्य करणे हे केंव्हाही चांगले म्हणजे वाचकांचा गोंधळ होत नाही. आणि वाचक उगाचच निरपेक्ष लिखाणाची अपेक्षाही ठेवत नाही.
- Log in or register to post comments
र
रन्गराव
Sun, 11/28/2010 - 16:53
नवीन
>>यापलिकडे जाउन सांगायचे तर कुठलीही कला रुजते, जगते आणि बहरते ती कलाकृतीवर प्रेम करणार्या असंख्य रसिकांमुळे; मूठभर समिक्षकांमुळे नाही.
एका वाक्यात सगळा हिशोब संपला! :)
- Log in or register to post comments
च
चित्रा
Sun, 11/28/2010 - 15:47
नवीन
समीक्षकी वृत्तीच्या कधीही लेखन न करणार्या लोकांच्या जागा रिकाम्या होण्याच्या मार्गाला लागल्या आहेत असा माझा अंदाज आहे. तेव्हा या जागा लवकरच बहुलेखनप्रसवी लोकांनी भरून काढाव्यात असे आवाहन करते म्हणजे स. वृ. ले. न. क. लोकांना समीक्षा न करायला लागल्याने लिहायला वेळ मिळून ते लेख लिहीतील आणि ब.ले.प्र. लोक या नव्याने लिहू लागलेल्या लेखकुंच्या थातुरमातुर लेखनाची समीक्षा कशी करतात याचे प्रात्यक्षिक सर्वांनाच बघायला मिळेल.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Mon, 11/29/2010 - 08:36
नवीन
चुकीच्या धाग्यावर प्रतिसाद दिलात काय? काही म्हणता काही कळलं नाही. धाग्याच्या विषयाशी दुरुन सुद्धा काही संबंध लागला नाही.
असो असो.
- Log in or register to post comments