नदीवर धुणे धुणार्या बायका !!
💬 प्रतिसाद
(11)
अ
अवलिया
Wed, 12/08/2010 - 06:44
नवीन
मस्त !
मला आधी वाटले ती मागे एक बहुचर्चित जाहिरात आली होती दूरचित्रवाणीवर त्यासंबंधी काही आहे की काय !
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 12/08/2010 - 07:00
नवीन
अमुल माचो .. आय मीन अमुल वाह्यात इन्सान ;)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
Wed, 12/08/2010 - 07:00
नवीन
करेक्ट !
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 12/08/2010 - 07:22
नवीन
'वाह्यात इन्सान' चुक आहे
'वाहीय्यात इन्सान' असे पाहिजे.
--------------------------------------------------------
वाह्यात कसं ते लाह्यात बोल्ल्या वानि वाटत.
- Log in or register to post comments
व
वेताळ
Wed, 12/08/2010 - 06:54
नवीन
त्या जाहिरातीबद्दल लिहा जरा.
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 07:09
नवीन
माझा मित्र नाशिकला होता त्याच्या लहानपणीच्या काही घटना तो खूप रंगवून सांगतो नाशिकचा गोदावरी घाटावर अशा बायका खूप म्हणजे दररोज धुणे धुवाव्यास यायच्या.
मित्र एकदा असाच गणिताचा पेपर देऊन आला .मोठा कठीण पेपर होता . नि ह्या बायका काही सोयर न सुतक .आपल्या मस्त धुणे धुतात .त्यचे त्याला वाईट वाटले. त्यावरून ही कल्पना .
आवडली खूप आभार .माझ्या मित्राचेपण !!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Wed, 12/08/2010 - 07:16
नवीन
छान, लिहिताय!
पु.ले.शु.
- Log in or register to post comments
य
योगप्रभू
Wed, 12/08/2010 - 08:53
नवीन
माफ करा मित्रांनो,
नदीवर धुणे धुणार्या बायका, हे चित्र माझ्याही मनात रुतून बसलेले असले तरी आज विचार करताना जाणवते, की पुढील काळात अशी चित्रे न दिसलेलीच बरी. नदीवर कपडे, जनावरे, वाहने धुणे, नदीच्या पाण्यात सांडपाणी व रासायनिक प्रदूषक घटक सोडणे, कुंभमेळे, मूर्ती विसर्जन हे जितक्या लवकर बंद होईल तेवढा भविष्यकाळ पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित होईल. कारण यापुढच्या काळात आपले गोड्या पाण्याचे साठे कसोशीने जतन करणे हा अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे.
आम्ही बनारसला गेलो होतो. तेव्हा होडीतून जाताना शहारे येणारे दृश्य बघितले. मनकर्णिका घाटावर चितेत अर्धवट जळालेले मुडदे ओढून काढून सरळ गंगेच्या पाण्यात टाकून द्यायचे. हे वाहात आलेले मुडदे आमच्या होडीला धडकत असत. भाजलेल्या वांग्यासारखे दिसणारे ते देह बघून उमासे यायला लागायचे. नावाडी सांगे, की मोक्ष मिळावा म्हणून हे मुडदे गंगेत सोडले जातात, पण बारकाईने चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समजले. काशीतील डोंब आणि पंडे दोघेही लोभी आहेत. श्रीमंत आणि भरपूर पैसे देतील त्यांच्याच नातलगांच्या मुडद्यांचे चितेत पूर्ण दहन करतात. गरीबांचे मुडदे अर्धवट जाळतात आणि सरळ गंगेत फेकून देतात. गंगा नदी केवळ ह्रषिकेशजवळच स्वच्छ आहे. हरीद्वारपासून ती प्रदूषित व्हायला सुरवात होते ती अगदी गंगासागरपर्यंत. कानपूरला तर चामड्याच्या कारखान्यांतील कातडी कमावून झाल्यावर वापरलेले प्रदूषित पाणी थेट गंगेत सोडले आहे. ज्या महानदीवर उत्तर भारतातील ४० कोटी लोक अवलंबून आहेत तिची ही दशा.
महाराष्ट्रातील नद्यांबाबत तर काय बोलणार? स्थिती समोरच दिसते आहे.
- Log in or register to post comments
प
प्रकाश१११
Wed, 12/08/2010 - 09:10
नवीन
योग प्रभुजी -
आपले विचार अगदी खूप बरोबर आहेत. अगदी मननीय आहेत एकदम मान्य .
मित्रा हे जे लिहिले आहे तो काळ तसा खूप जुना आहे . आत्ता कोणी नदीवर धुणे धुण्यास जातपण नाहीत.
आत्ता आपण म्हणता तसे मी ज्या किंवा माझ्या मनात जी नदी होती ती आत्ता बघवत नाही
अशी घाण घाण झालेली आहे .पूर्वीचे माझ्या मित्राने हे वर्णन केले ती नदी खूप सुंदर सुंदर होती .
नाशिकची गोदावरी नदी .ते चित्र डोळ्यासमोर होते .त्याचे हे वर्णन .आपल्याला जुने आठवले .बरे वाटले असे कसे म्हणू ?तरीही आभार.मनापासून !!
- Log in or register to post comments
द
दिपक
Wed, 12/08/2010 - 09:23
नवीन
शिर्षक वाचुन रारंगढांग मधला हा पॅरा आठवला..
:-)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
Wed, 12/08/2010 - 09:37
नवीन
छान वर्णन ..
आणि आपला गणिताच्या पेपर्चे दु:ख मोठे की या सासुरवासीन बायकांचे जे गप्पाटपा टाकत मस्त धुणे धुत आहेत .. हा पडलेला प्रश्न ही खुप आवडला ..
असे अनेक प्रश्न मला ही बर्याचदा पडायचे ..
- Log in or register to post comments