अगदि .. अगदि...
सगळे म्हणुन तर अमेरीके कडे धाव घेत आहेत !!
आपल्या देशात स्वाभिमानाने काहि काळ जगण्या पेक्षा अनादि काला पर्यंत अमेरीकेत गुलामगीरी करणे हेच बरे ! कसे ?
तर तुमच्याशी भांडणार कोण ?
आरं तिच्या! आमची म्हणजे पेल्यातली (ग्लासातली?) वादळं! रात्री वाद घालणार आणि सकाळ झाल्यावर विसरून जाणार!!!
तेढ लक्षात ठेवण्याइतके आम्ही प्रगल्भ (विचारवंत?) नाही हो!!!
:)
पण अणुयुद्ध तर होणार आणि मग तुमची वाट आहे!!!
आम्हाला अणुयुद्धाची भीती नाही कारण आम्ही रहातो तिथे दोन-दोन अणुबॉम्ब सवे घेउन फिरणार्या क्षेपणास्त्रांचा सुळसुळाट आहे!!! त्यामुळे भीती मेलीय!!!
:)
तुमची सर्व क्षेत्रातील विद्वत्ता, ज्ञान, भविष्य वर्तवता येईल इतपत दूरदृष्टि, कुठल्याही विषयात लिलया संचार आणि अभ्यासू मते पाहता, मिपावर एक 'बाप'माणूस आला आहे ह्याची खात्री पटली.
_/\_ तुम्हाला (अगदी कोपरापासुन)
- सावत्र भाऊ
जरा नेमकी तारीख वगैरे कळेल का ? २०१२ हे फारच मोघम झालंय.
त्याचं म्हणजे असं आहे की ही पापड करायचे , पापड करायचे म्हणून मागं लागली आहे .
असं नको व्हायला की गच्चीवर पापड वाळत घातले आणि वरनं अणुबॉम्ब पडला त्यावर.
बहुधा २१ डिसेंबर २०१२ असावी. मायन कॅलेंडर तीच तारिख सांगत आहे
चैत्रात पापड होऊन जातील.. थोडे वडे आणि पापड्या पण करायला सांगा.. वड्याची आमटी लै झाक लागते... साबुदाण्याच्या पापड्या.. क्या कहने !
पण शेवटी कविच ना? ;) साला आपल्याला कवितेतले काय कळत नाही तर कविंमधले कधी कळणार ?
'मिपात मेले..' पण भारी आहे हान. जोडीला 'धाग्यात मेले...' असे एक विडंबन पण येउ द्या.
पण ' मिपात मेले ओल्या उंदीर ' हे कसं वाटतंय ?
त्या पेक्षा
" मिपात मेले प्याले उंदीर" हे कसे वाटतय
( इथे मेले हा शब्द क्रीयापद नसुन नाम विषेशण आहे. "मेले "हा शब्द "शिंचे" या शब्दाच्या जातीतील आहे )
प्रगत राष्ट्रे ह्या सर्व हालचालीं वर बारीक लक्ष ठेवुन आहेत. जर युध्द झाले तर त्याची झळ आपल्या प्रदेशा पर्यंत पोचु नये म्हणुन अमेरीका भरपुर गुंतवणुक करत आहे. शिवाय स्वत:च्या बाजार पेठा सुरक्षित ठेवण्या चा आटोकाट प्रयत्न करत आहे.
यात आपल्याला काहीच विसंगती वाटत नाही का?समजा अणुयुध्द झालेच तर भारताचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल आणि भारतात गरीबी प्रचंड प्रमाणावर वाढेल.आज भारतातील मध्यमवर्गीयांची संख्या पूर्ण अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.युरोपातील देश आणि अमेरिकेने जो अर्थव्यवस्थेत सावळा गोंधळ घातला आहे त्यांना त्यामुळे भारतातील ग्राहक हा एक मोठा त्राता आहे.तीच बाजारपेठ अणुयुध्दामुळे मुळात उखडली गेली तर त्यात आपल्याबरोबरच युरोप आणि अमेरिकेचेही नुकसान होणार आहे.मग आपल्या बाजारपेठा अमेरिका-युरोपातील देश सुरक्षित ठेवतात म्हणजे नक्की कुठल्या बाजारपेठा तुम्हाला अभिप्रेत आहेत?
यु हॅव अ पॉइन्ट मि क्लिन्टन..
अभिनंदन...
पण जर इस्लामिक मिलिटंट लोकांना अमेरीकेची बाजारपेठ नष्ट करायची असेल तर ते पहिला अणुबॉम्ब भारतावरच टाकतील. नाहि का ?
म्हणजे काहि झाल तरी भारतावर अणु बॉम्ब पडणारच !!
प्रतिक्रिया