फिटे अंधाराचे जाळे ह्यात तिचा वावर गाण्याला एक उंची देतो .त्याच सिनेमात तिचा तोंडात काही तरी चघळत बेरक्या नजरेने श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई तोर्यात उभी राहिली आहे .
असाच रोल रंजनाने हीच खरी दौलत मध्ये केला होता... त्यातही ती एका श्रीमंत गर्विष्ठ सुनबाई च्या रोल मध्ये होती.. त्यातले तिचे आणि रवीन्द्र महाजनीचे "लाखामधली नवतरूणी तू देखणी" हे गाणे छान होते..कोणाकडे आहे का ते गाणे..?
१. नवविधा भक्ती (श्री सन्त बाबा महाराज आर्वीकर लिखीत) हे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचा.
२. सन्त गुलाबराव महाराज ज्ञानेशकन्या या भावाने कशी भक्ती करत असत याविषयी माहिती मिळवा. (कदाचित उपयुक्त ठरेल.)
कुणालाच काही बोलण्याची सोय राहिली नाही.
गप्पा आणि माफक थट्टामस्करी वगैरे जरी काही प्रमाणात चालत असले तरी कुठे, केव्हा आणि किती वेळा अवांतर आणि मुद्दा सोडुन इतर गप्पा माराव्यात, वाद घालावे किंवा विषय तिसरीकडेच वळवावा ह्याला आता काही लिमिट्स राहिली नाहीत.
वारंवार सांगुन, समजावुनही अजिबात उपयोग होतो आहे असे वाटत नाही.
जरा आवरा असे सांगतो.
कुठलीही गोष्ट अति होऊ नये, काही ठिकाणी जाणिवपुर्वक केले जाणारे दुर्लक्ष ( धाग्याचा विषय, हेतु आणि इतर पैलु पाहुन ) हे सर्वच ठिकाणी गोंधळ घालण्यासाठी दिलेला परवाना असु शकत नाही ह्याची नों घ्यावी.
बाकी इथले अनावश्यक प्रतिसाद उडवणेही शक्य होते, पण उगाच ह्या निमित्ताने वारंवार अशा वागण्याचा होणारा त्रास तुमच्याबरोबर शेअर करु वाटला म्हणुन हे अवांतर ४ शब्द.
ह्या प्रकाराला कंटाळुन इथे नवे लिखाण करायला भिती वाटेल अशी परिस्थीती निर्माण होणार नाही ह्याची सर्वांनी काळजी घ्यावी ही विनंती, असे काही प्रतिसाद आम्हाला आले आहेत, असो.
बाकी आम्ही सतर्क आहोतच :)
- ( वैतागलेला ) छोटा डॉन
एस्क्युज मीSSSSSSSSSSSSSS !!!!!!!
कणेकरी थाटातल भाषण बंद करा मालक !!
किती ठिकाणी अवांतर दाखवु आपल स्वताच ? चॅलेंज घेता का ? किती ठिकाणी आपण स्वता अवांतराला आमंत्रण दिले आहे ?
हे फक्त पहिले !!
चालेल ...
प्रेषक छोटा डॉन दि. मंगळ, 21/12/2010 - 14:51.
>>तिथे आमचा एक छोटासा बंगला आहे. ( ही आमची झैरात ) टेरेस वर जागा देवू. मटीरीयल ,स्टॉक वगैरे उत्तम दर्जाचा असेल तर फीमध्ये सवलत देण्याचा विचार करू.
बेश्ट, चालेल, अगदी १००% ओके.
बाकी फी मध्ये सवलत वगैरे नको, फक्त एकच करा, आम्ही तिथे असोस्तोवर तुम्ही तेवढे आमच्या पुण्यातल्या ३ बीएचके फ्लॅटमध्ये रहायला जा, अगदी फुक्कट बरं का
म्हणजे ' हम करे सो कायदा '
असो ..बोलुनच काय पण दाखवुन ही फायदा नाही. आपण केलीत तर ती गम्मत जम्मत आणि इतरांनी केली ती .
आणि हे 'अवांतर' आपण आपली 'संपादकीय शायनिंग' मारायला इथे लाबंलचक अवांतर घेवुन आलात ना त्या करिता
सहमत आहे .
आम्हाला अषोक सराफ मधे श्रिकृष्ण आणि रंजना मधे राधा दिसते . त्याच अनुशंगाणे आम्ही चर्चा केली होती. हटकुन किंवा टार्गेट करुन धागा खरडफळा केला असतात तर संपादक श्री डॉण यांचे आरोप मान्य होते.
बोला , प्रेमासाठी झुकले खाली धरती वर आकाश ...
प्रेमासाठी झुकले खाली धरतीवर आकाश .. तुका म्हणे
http://www.youtube.com/watch?v=nkwoJHcvNos
झुंज सिनेमातील हेच ते प्रसिध्द दंद्वागीत
तिचा संवाद अथवा गाण्याचे बोल नसले तरी नुसत्या देहबोलीतून तिचा आत्मविश्वास झळकतो .
कृष्णाचा उल्लेख प्रथम महाभारतात झाला परंतु महाभारतात राधेचा उल्लेख नाही (वल्लींनी वर हे म्हटलेच आहे). महाभारत हे काव्य आहे की इतिहास यावर संशोधकांत मतभेद आहेत. पण काहीही असले तरीही राधा हे पात्र त्यात नाही आणि कृष्णाचे म्हणून जे प्रसिद्ध किस्से आहेत, त्यातील बरेचसे किस्सेही त्यात नाहीत असे ऐकून आहे.
यानंतर भागवतात श्रीकृष्णावर बरेच लिहिले गेले, पण त्यातही राधेचा उल्लेख नाही. राधेचा उल्लेख प्रथम आढळतो तो पद्मपुराणात आणि तिला प्रसिद्ध केले ते जयदेवाच्या गीतगोविंद ने. नंतर अनेक पुराणिक आणि प्रवचनकारांनी आपापल्या परीने कथा रचल्या. आता गोंधळ इतका वाढला आहे की बरेचदा आपल्याला मूळ महाभारतात अमुक एक गोष्ट नाही हे माहीतच नसते. (ह्यातील संदर्भ नक्की कुठे वाचले ते लक्षात नाहीत :-( )
आणि महाभारताखेरीज बोलायचे झाले तर मग पात्र आणि प्रसंग रचना ही त्या त्या लेखक / कवीच्या मनावर असते. मग कृष्णाची राधा कोण होती, त्यांची वये किती होती, राधा किती होत्या या प्रश्नांना काय उत्तरे देणार?
मूळ महाभारत म्हणजे हा 'जय' नामक इतिहास आहे असे स्वतः व्यासांनीच लिहून ठेवले आहे. नंतर वैशंपायनांनी त्यात भर घालून त्याचे 'भारत' ग्रंथात रूपांतर केले व त्याहीनंतर सौती व इतर अर्वाचीन कथाकारांनी त्याचे 'महाभारत' केले.
या सगळ्या रूपांतरात राधेचा कुठेही उल्लेख नाही.
राधा खरी होती की खोटी हा विषय वेगळा आहेच. पण जे काही वर्णनात वाचले आहे त्यानुसार राधा ही कृष्णाची प्रेयसी होती असे म्हटले तर दचकायला काय झाले ? पौगंडावस्थेत कुणाबद्दलही आकर्षण वाटू शकते. काहींच्या कामभावना या लवकर जागृत होतात.त्यांत कृष्ण हा असामान्य होता. तेंव्हा जे वर्णन केले गेले आहे ते तसेच्या तसे स्वीकारण्यात काय हरकत आहे ?
अहो शिल्पाताई, मधे बरंच गाजलेलं प्रकरण आहे हे... जुनं आहे बर्यापैकी..
मानसिक संतुलन बिघडले आहे म्हणून या पोलीस अधिकार्याला सस्पेंड केलं होतं.
टी.व्ही.वर खूपदा राधा बनून नाचून बिचून दाखवलेलन..
हा लेख मीच काल टाकला होता या साईट वर . जे काही रिप्लाय आलेले आहे ते वाचून मी थक्क झाले. आपल्या लोकांमध्ये उदासीनता आहे की विचार करण्याची शक्ती संपली आहे हे कळत नाही. ज्या लोकांच अस म्हणण आहे की जर गाण्यांमधून जे दाखवतात किंवा जे शब्द आहेत ते ८ वर्षांचा मुलगा कसा करू शकेल त्यांनी जरा तरी विचार करावा की श्रीकृष्ण आधी झाले आणी नंतर ही गाणी. त्यामुळे गाण्यांना बेस धरून श्रीकृष्ण यांच्यावर विचार करू नका. गाणी जी दाखवतात किंवा लिहिली जातात ती अत्यंत चूक आहेत आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि लहान मुलगा आणि मोठी स्त्री यांच्यात भक्तीयुक्त प्रेम दाखवता येत नसेल तर निदान ते प्रेम श्रीकृष्णाच्या रासाक्रीडेवरून घेऊच नका. जर सिनेमा वाल्यांना प्रेम दाखवायचं असेल तर जरुर दाखवाव पण ते श्रीकृष्णांच्या नावावर जे खर आणि योग्य नाही ते खपवू नये. मी लेखातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की श्रीकृष्ण यांच्या रासक्रीडेचा अर्थ लोक वेगळा घेतात. प्रेम ही खूप पवित्र आणि छान भावना आहे आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते त्यामुळे गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते हे मान्य पण त्याला 'बोय-फ्रेंड, गर्ल-फ्रेंड' किंवा 'लिव इन रिलेशनशिप' हे नाव देण्यात येणार असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. माझा आक्षेप या उपमांना नसून या उपमा श्रीकृष्णांना कारण नसताना दिल्या जात आहे यावर आहे
विरोधासाठी विरोध असं करण्याचा कोणाचा उद्देश नसावा. तसं अनवधानाने झालं असेल तर क्षमस्व. पण याच क्षमेसह असं म्हणावसं वाटतं की आत्ताच्या या स्पष्टीकरणातही नेमका मुद्दा अधोरेखित होत नाहीये.
आता लक्षात आलं की "लहान मुलगा आणि मोठी स्त्री यांच्यात भक्तीयुक्त प्रेम दाखवता येत नसेल तर निदान ते प्रेम श्रीकृष्णाच्या रासक्रीडेवरून घेऊच नका"
हे ठीक..
बादवे भक्तियुक्त प्रेम ही कन्सेप्ट आणि त्याचसोबत:
प्रेम ही खूप पवित्र आणि छान भावना आहे आणि प्रेमाला वयाची मर्यादा नसते त्यामुळे गोपी आणि श्रीकृष्ण यांच्यात प्रेम होते हे मान्य पण त्याला 'बोय-फ्रेंड, गर्ल-फ्रेंड' किंवा 'लिव इन रिलेशनशिप' हे नाव देण्यात येणार असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. माझा आक्षेप या उपमांना नसून या उपमा श्रीकृष्णांना कारण नसताना दिल्या जात आहे यावर आहे
याविषयी मतांचा गलबला होऊ शकतो.. पण प्रेम या कल्पनेविषयी इथे अनेक गोंधळ झाले आहेत असं वाटतंय.
राधा कृष्ण यांच्यातले भक्तीस्वरूप नसलेले प्रेम हे सिनेमा वाल्यांनी निर्माण करून रंगवले आहे असे मला वाटत नाही.
मी वर दुवे दिलेल्या दिलेल्या लेखातल्या गौळणीतही अशाच अर्थाने 'प्रेम' दाखवलेले आहे आणि ते सिनेमा यायच्या काही शतके आधीचे आहे.
इनफॅक्ट राधा कृष्णाचे परमेश्वर-भक्त असे नाते दाखवणारे काही जुने (१९व्या शतकापूर्वीचे) साहित्य आहे का हे जाणून घ्यायला आवडेल.
Hereunder is provided a short table dates of important Mahabharat events in years. (Dates and Tithis in years in Rama Samvat assuming Shri Rama Samvat 1st January. 1 equivalent to 1st Jan 7323 B.C. Rama's birth date has been conclusively proved to be 4th Dec. 7323 B.C.( "Vastav Ramayan").
EVENT DATE
Going to forest 4th Sept. 5574 BC
Kitmeet Killed 7th Sept. 5574 BC
Going underground 19th May 5562 BC
Keechak killed 1st April 5561 BC
Anukeechak-Massacre 2nd April 5561 BC
End of secret life 9th April 5561 BC
Cows stolen 15th April 5561 BC
Arjuna exposed 16th April 5561 BC
All pandavas exposed 19th April 5561 BC
Marriage of Uttara 4th May.
& Abhimanyu.
Krishna set out for a treaty. 27th Sept.
Stay at Upaplavya 27th Sept.
Stay at Vrukshthala 28th Sept.
Dinner to Brahmins 29th Sept.
Entry into Hastinapur 30th Sept.
Krishna meets Kunti etc. 1st Oct.
Invited for meeting 2nd Oct.
First meeting 3rd Oct.
Second meeting and an attempt 4th Oct.
to arrest Krishna.
Third meeting Vishvaroopa 7th Oct.
Stay at Kunti 8th Oct.
Krishna meets Karna. War 9th Oct.
fixed.
Krishna returns 9th Oct.
Pandavas preparation 11th Oct.
Balaram's visit.
Mahabharat war started 16th Oct.
Abhimanyu killed 28th Oct. 5561 BC.
End of War 2nd November 5561 B.C.
Yudhishthira crowned 16th Nov. 5551 BC.
Bhishma expired 22nd Dec. 5561 BC
Pandava campaign 15th Jan. 5560 BC
for wealth
Parikshita born 28th Jan. 5560 BC
Pandavas return 25th Feb. 5560 BC
Ashvamedh Deeksha. 1st March 5560 BC
Return of Arjuna Horse 15th Jan. 5560 BC
Ashvamedh yajna 22nd Feb. 5559 BC
Dhrutarashtra went to forest 18th Aug. 5545 BC
Pandavas visited Kunti 18th Aug. 5543 BC
Vidura expired
Death of Kunti, Dhrutarashtra, Sept./Oct. 5541 BC
and Gandhari
Yadava Massacre 5525 B.C.
Parikshit Dead 5499 B.C.
तसे आणखी बरेच आक्षेप श्रीकृष्णांवर घेतले जातात.
जर राधा, रासलीला आणि अनेक बायकांवर आक्षेप आहे तर याचा अर्थ तुम्ही भागवत, महाभारत अथवा हे सगळे मानता ना....???
मग याच भागवतात लिहिलेले श्रीकृष्णांनी बालपणात मारलेले राक्षस, करंगळीवर उचललेला गोवर्धन, मुखातून आईला विश्वदर्शन, अर्जुनाला दाखवलेले विश्वरुप, इ.इ. सगळे मान्य का नाही करत? होती त्याची क्षमता १६१०८ बायका करायची आणि त्यांना 'सांभाळायची' पण.आहे कोणाला ऑब्जेक्शन....??? स्वतःची एक सांभाळताना ****. कशाला गप्पा मारायच्या राव?
इथे आम्ही विचारजंत,' नाही पण मला असे वाटते की', 'असे नसेल हो', 'हे कसे शक्य आहे' असे म्हणणार. उगाच विंडो शॉपिंग सारखे.... अथवा उगाच आज काही उद्योग नाहीय तर चला थोडी 'मज्जा' करु असे असते.....
एक तर १००% स्वीकारा नाही तर डिस्कार्ड करा.
मधेच लटकत नेहमी. सातत्याने बुद्धीभेद करणे हेच का यांचे काम?
सामान्य श्रद्धा अथवा रुढी या पायात नी पंखात बळ आलेल्या नसतात ( जस्ट घरात पूर्वीपासून आहे म्हणून करतोय स्वरुपाच्या) त्यामुळे असे आक्षेप हे त्यांना मुळातून हादरवतात. श्रद्धांना नुसते पांगळे, लुळे करण्याचे काम करत नाहीत तर त्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ उडवतात. मानसिक ताकद नसते देव बिव झुगारण्याची आणि स्विकारावं तर कस स्विकारावं हे कळत नाही. असले व्यभिचारी देव??? उत्तरं नसतात.
जंतांची वळवळ सुरुच राहतेआणि मजा ही.....
"जर राधा, रासलीला आणि अनेक बायकांवर आक्षेप आहे तर याचा अर्थ तुम्ही भागवत, महाभारत अथवा हे सगळे मानता ना....???" असे वर वाचनात आले. बहुदा मी कय लिहायचा प्रयत्न केला आहे तेच समजलेले दिसत नाही. लेख काळजीपुर्वक वाचल असेल तर लक्षात येइल की मी 'भागवत' ग्रन्थचाच अधार घेउन तो लिहिला आहे. तुम्ही स्वत:हा भागवत ग्रन्थ वाचावा म्हणजे तुम्हाला समजेल की श्रीक्रुष्ण यान्च नात इतर गोपीन्बरोबर जे आज्काल्चे लोक समजतात ते किती अयोग्य आहे. पूर्वी शिल्पान्मधून किन्वा गण्यान्मधून जे दाखवल अहे तेच खर अस क्रुपया मनू नका. पूर्वीच्या लोकन्नी चूक केलि म्हणून आपण केली तरी हरकत नही असा द्रुस्टीकोन ठेऊ नका.
राधा ह्या शब्दाचा सुंदर अर्थ शिवाजी सावंतांच्या 'युगंधर' मधे सापडतो. राधा म्हणजे मोक्षा साठी आतुरलेला जीव म्हणजेच भक्त. आणि भक्त नसेल तर भगवंताच्या अस्तित्वाचा का अर्थ? उत्तरेत राधा श्रीकृष्णांच्या बाजुला देवळाराऊळात उभी असली तरी महाराष्ट्रात मात्र रुक्मीणीच आहे अपवाद पंढरपुरचा, तिथे तो द्वारकेचा राणा राहि (राधा) आणि रखमाबाई च्या सोबत उभा आहे.
बाकि राधेचा उल्लेख महाभारतात नाही हे सर्वमान्य आहे. परंतु श्रीकृष्णांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह पाहुन अंमळ हसु आले. हेच सगळे आक्षेप बाकी सर्वच प्रेषितांवर घेता येतील पण वळवळणारे जंत त्या बाजुला कधी जात नाहित.
नानाने पक्ष बदललेला पाहुन वाईट वाटले. आणि हुप्या नेहमी मिपा वर महाभारताचे पुरावे मागतो पण त्या आधि स्वतः गुगल का नाहि करत हे श्रीकृष्णा जाणे..
बाकि ते नेहमीचचं.
'कुणी कसे वागावे हे सांगण्याचा मला अधिकार नाहि मी फक्त एक मत नोंदवले'
जर भागवत ग्रन्थ आणि इतर यान्मधे एकवाक्यता नसेल तर 'हो' भागवत ग्रन्थालाच मानावे कारण एक तर तो ग्रन्थ महर्षी व्यासांनी लिहिला आहे अणि दुसरं म्हणजे श्रीक्रुष्ण यांच अयुष्य पूर्णपणे मांडणारा तोच पहिला आणि मूळ ग्रन्थ आहे.
नमस्कार.
राधा आणि कृष्णाबद्दल 'विजूभाऊ'नी निष्काम भक्तीचा दृष्टीकोन मांडला आहे, त्याशी सहमत आहे.
या विषयावर वर बरीच चर्चा झालेली आहे. या विषयाचा विचार करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर योग्य उत्तर मिळायला मदत होइल असं वाटतं.
१. आपल्या प्राचीन इतिहासामध्ये काही इतिहास उपलब्ध नाहीये. काही इतिहास पुराण स्वरूपामध्ये आहे. खूप थोडा इतिहास 'इतिहास' स्वरूपात आहे; जसं की महाभारत. (जिथे व्यासांनी लिहिलं आहे की हा 'इतिहास' आहे आणि म्हणून महाभारत ती जाणीव ठेऊन लिहिलं गेलं आहे असं आपण म्हणू शकतो.) या इतिहासातसुध्दा हजारो वर्षांमध्ये अनेक पुराणिकांनी, संतानी आपल्या कल्पना त्यात घुसवल्या आहेत. (वाईट उद्देशाने नव्हे, तर हा 'इतिहास' आहे ही जाणीव नसल्याने). आणि त्या कल्पना असल्यामुळे त्यात काही अतिशयोक्ती, निरूपयोगी / नैतिकदृष्ट्या चूकीचा भाग समाविष्ट झालेला आहे. पुराणांमध्ये असा भाग बराच आहे, आणि शुध्द इतिहास कमी (सामान्यपणे).
२. दुसरी गोष्ट की, प्राचीन संस्कृती अध्यात्मावर घट्ट आधारलेली असल्यामुळे त्यावेळच्या इतिहासपुरूषांमध्ये आध्यात्मिक सामर्थ्याचा भाग आहे, त्यामुळे चमत्कारही आलेच. त्यामुळे अशा इतिहासामधला अतिशयोक्त चमत्कारी भाग या पुराणिक, भक्तगण, प्रवचनकार यांच्या 'अरे तो अमका परमेश्वराचा अंश, त्याला काय अशक्य आहे?' अशा प्रभावयुक्त भक्तीभावातून आलेला आहे.
अर्थात, त्यात चमत्कार अजिबात नाहीत असं नाही, पण आध्यात्मिक चमत्कार करण्याच्या सामर्थ्याबरोबर वागण्याच्या अनेक मर्यादाही येतात. उदा. कृष्ण गोपींबरोबर 'लिव्ह इन' रहात असता, किंवा टीकाकारांच्या म्हणण्याप्रमाणे अयोग्य चाळे करत असता, तर नंदाचा मुलगा म्हणून त्याची हाइप केली गेली असती ही गोष्ट खरी; पण त्याला इतर उत्तम पण मानवी गुणसुध्दा आचरणात आणता आले नसते, जसं की, कृष्णशिष्टाई: कृष्णाचे मूळ भाषण वाचा किंवा इतर चतुराईचे, शहाणपणाचे प्रसंग जे महाभारतात अनेक ठिकाणी दिसतात. आध्यात्मिक चमत्कार तर याच्या पुढे त्याने गरजेप्रमाणे दाखवले आहेत, उदा. कर्णवधाच्यावेळी सूर्य झाकोळून टाकणे.
३. एक भाग राजकीय आहे, पण त्याचाही इथे परिणाम होतो की; आपल्या सरकारचं धोरण आपला इतिहास 'प्रोअॅक्टिव्हली' शोधून काढण्याचं नाहीये (विशेषतः काँग्रेस.). त्यामुळे अनेक गोष्टींवर अजून योग्य ते संशोधनच झालं नाहीये; ज्यामुळे रामायण, महाभारत, पुराणं यातला इतिहास आपण प्रत्यक्ष उत्खननांमधल्या पुराव्यांबरोबर पडताळून बघू शकू. (काही महिन्यांपूर्वी टाईम्स ऑफ इंडिया च्या क्रेस्ट आवृत्तीमध्ये 'भारतातील प्राचीन अवशेषांचे उत्खनन' यावर कव्हर स्टोरी आली होती. पुरातत्व विभागाच्या लोकांना साधं लॅन्ड अक्विझिशन (जमीन अंदाजे ४-५ एकर) करता येत नाही, त्यानी जमीन विकत घ्यायची तयारी दाखवूनसुध्दा).
या गोष्टी लक्षात घेतल्या की वरच्या विषयाबाबतीत असं दिसेल की;
१. प्राचीन ग्रंथ पूर्ण खोटे नाहीत, पण त्यात काही नंतर समाविष्ट केलेला भाग आहे, जो खरा नाही (मग तो बरा असेल वा वाईट.) तो काढून टाकणं गरजेचं आहे. म्हणून ते ग्रंथ वर लिहिलेलं तारतम्य पाळून खरे मानायला हरकत नाही.
२. पुराणं, काव्यं, सिनेमे यात राधा, कृष्ण व इतर ऐतिहासिक पुरुषांबद्दल जो अर्थहीन अंदाज बांधला जातो, त्यावरून कृष्ण व तशा इतर लोकांचं चूकीचं मूल्यमापन होण्याची शक्यता जास्त आहे. पुराणांच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार आणि पुराव्यांचा शोध गरजेचा आहे.
३. जरी ग्रंथ आपल्याकडे पुरावे म्हणून असले तरी आपल्या लोकांनी शक्यतो प्रत्यक्ष पुरावे मिळवून प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाची तर्कशुद्ध रीतीने मांडणी / अर्थ लावणे, या गोष्टी 'प्रोअॅक्टिव्हली' करायला हव्यात. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्यासाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी इतिहास 'सिध्द होणं' गरजेचं आहे.
नमस्कार,
अमित देवधर यांची प्रतिक्रिया आवडली. प्रत्यक्ष पुरावे शोधण्याची कल्पना छान आहे पण त्यात वेळ खूप जाईल म्हणून जो मूळ ग्रंथ आहे ते सत्य मानायला काहिच हरकत नाही म्हणजेच या बाबतीत 'भागवत'. नंतर अनेकांनी त्यांच्या कल्पना घुसडल्या आणि म्हणूनच आज श्रीक्रुष्ण यांबद्दल्च्या कल्पना चुकीच्या झाल्या.
राधा ही व्यक्ती अस्तित्वात होती की नव्हती या वर दुमत असु शकेल ..
पण मला माहित असलेला (आणि पटलेला ) अर्थ असा आहे ..
कृष्ण - राधा ही प्रतिके आहेत. (माझ्या सारख्या सर्वसामान्य आणि बिगर अध्यात्मिक ) लोकांना अमूर्त अशा गुण , अवगुणांची चर्चा कळत नाही त्यांच्यासाठी ही मूर्त रूपे असावीत .
कृष्ण ही व्यक्तिरेखा ही दैवी गुणांनी युक्त असुनही मानवी भावभावनांना वृथा समजत नाही तर त्यांनाच जीवनाधार मानते.
उदा. गोकुळा मधील त्याच्या क्रीडा ... लोणी चोरणे, गोप गोपींना सतावणे इ. यातही गहन अर्थ आहे असे जाणकार सांगतात.. उदा. गोपीकांची वसने पळवली म्हणजे त्यांच्या आत्म्यावर जी बाह्य आवरणे होती ती लपवली आणि त्या आवरणांखेरीज ( म्हणजे सामान्य शब्दात मुखवट्यांखेरीज ) या जगात वावरणे अशक्य आहे .
पण या सर्व बाललीला करताना तोच कॄष्ण गोवर्धन पर्वत आपल्या करांगुलीवर पेलून वरूणाच्या कोपा पासून गोकुळाचे रक्षण करतो , कालियाचा वध करून यमुना नदीचे पाणी निर्विष करतो, आणि पुतना मावशीचा वध .... इ. म्हणजे थोडक्यात आदर्श आहे आणि म्हणून अनुकरणीय ..
यांत परमार्थ साधन म्हणजे स्वार्थ ( स्वहीत/ स्व जीवन इ.) त्याग नाही असाच संदेश यात असावा .
आणि राधा ही प्रेम आणि भक्ती , समर्पण यांच प्रतिक .. ती विवाहीत (संसारी ) आहे आणि तरीही कॄष्ण प्रेमाने वेडी झाली आहे . ( मीरे प्रमाणेच). आणि कॄष्ण म्हणजेच जे दैवी गुणांचे प्रतिक आहे, जीवनाने युक्त आहे आणि तरीही मानवधर्म स्विकारणारे आहे, 'अशा' कॄष्णाला राधेने दिलेली ती शरणागती आहे.
तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला मिळालेल्या प्रतिमेमधे राधा कॄष्णाच्या खांद्यावर मस्तक विसावलेली आहे .. याचा अर्थ ती सर्वार्थाने त्याच्यावर ( म्हणजे आध्यात्मात सांगतात तसे परमात्म्यावर / सद् गुरूवर ) विश्वास ठेवून नि: शंक, निर्भय आहे . असा असावा. त्यात कॄष्ण राधे पेक्षा उंच कसा वगैरे चर्चा करण्यात काय अर्थ आहे?
**** आणि तुम्ही म्हणता रासक्रीडा करताना कॄष्ण लहान (८ वर्षांचा) मुलगा आहे असे दाखवावे .. मग ते पाहणार्या लहान मुलांवर काय संस्कार होतील ?
त्यामुळे जे ईतिहासात/ पुराणात सांगीतले आहे ते निवडून, पाखडून ( त्यातले हीण काढून ) योग्य तो अर्थ घ्यावा. आहो साध्या कानगोष्टीच्या खेळात पहिल्याने सांगितलेल्या गोष्टीचे आठव्या पर्यंत जाताना काय होते हे तुम्ही अनुभवले असेलच .. मग या तर हजारो वर्षांपासून चालत आलेल्या कथा .
राधा आणि कृष्ण प्रेमीच होते (आहेत). कृष्णाच्या सर्व लीला, म्हणजे रासक्रीडा, गोवर्धन पर्वत उचलणे, यशोदेला ब्रह्मांड दाखवणे वगैरे... सर्व सत्य आहेत. खरच कोणाला हे सगळं समजुन घ्यायचं असेल सरळ कृष्णाला काँटॅक्ट करावा. ज्ञानबा-तुकाराम सारख्यांकडे कृष्णाची काँटॅक्ट इन्फोर्मेशन आहे. गरज पडल्यास त्यांना साकडे घालावे. जाणुन घ्यायची खरच गरज असेल तर फार अवघड काम नाहि ते... पण खरच गरज आहे का तशी??
लुफ्त पे तुझसे मै क्या कहु हमदम, हाय कंबख्त तुने पी ही नही
(नशेमे) अर्धवटराव
प्रतिक्रिया