Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एक ऐतिहासिक घटना: भाग ४: (राजकीय) प्रशासक

ऋ
ऋषिकेश
Sat, 01/29/2011 - 11:02
💬 17 प्रतिसाद

Book traversal links for एक ऐतिहासिक घटना: भाग ४: (राजकीय) प्रशासक

  • ‹ एक ऐतिहासिक घटना: भाग ३: निवडणुका आणि प्रतिनिधित्त्व
  • Up
  • एक ऐतिहासिक घटना: भाग ५: (नागरी) प्रशासक ›

प्रतिक्रिया द्या
7957 वाचन

💬 प्रतिसाद (17)
र
रणजित चितळे Sat, 01/29/2011 - 11:28 नवीन
वाचत आहे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sat, 01/29/2011 - 11:45 नवीन
आधीचे भागही तुम्ही दिलेले दुवे उघडून वाचायची इच्छा आहे. तसेच सारे लेख कॉपी-पेस्ट करत आहे. म्हणजे सारे लिखाण सलग वाचता येतील.... धागा खूपच औचित्यपूर्ण असून त्याबद्दल धन्यवाद!.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Sat, 01/29/2011 - 15:17 नवीन
बऱ्याच दिवसांनी ही लेखमाला पुनरुज्जीवित झाली ते पाहून बरं वाटलं. या अधिकारांची चर्चा करताना जर गेल्या साठ वर्षांतली काही उदाहरणं दिली तर ते कळायला अधिक मदत होईल असं वाटतं. राजेश
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 01/29/2011 - 18:30 नवीन
अरे वा!! खूप दिवसांनी ही मालिका सुरू होते आहे.. अभिनंदन ऋषी! आणि धन्यवाद सुद्धा. :)
  • Log in or register to post comments
श
शुचि Sun, 01/30/2011 - 00:33 नवीन
अतिशय माहीतीपूर्ण आहे ही मालीका.
  • Log in or register to post comments
आ
आळश्यांचा राजा Sun, 01/30/2011 - 18:33 नवीन
या मालिकेची आवश्यकता होतीच. (अनायासे 'देशाचं वाटोळं, आणि त्याला जबाबदार कोण' या लोकप्रिय विषयावर चर्चा करणार्‍या वादपटूंना मदतही होईल!)
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 01/30/2011 - 20:08 नवीन
सर्व प्रथम लेखमाला पुन्हा सुरू केल्याबद्दल ऋषिकेश यांचे आभार! भारताने राष्ट्रपती हे पद इंग्लंडच्या राजघराण्यावर बेतून केले आहे. मात्र ते वंशपरंपरागत न ठेवता अप्रत्यक्ष निवडणूकीने भरण्याची व्यवस्था केली आहे. भारतात राष्ट्रपती हे शासन व्यवस्थेचे (स्टेट) चे प्रमुख तर असतातच पण तीनही सैन्य दलाचेही प्रमुख असतात. परक्या देशाविरुद्ध युद्ध पुकारण्याचे अधिकार राष्ट्रपतीकडेच असतात. लेखात दिलेल्या तीन अधिकारांखेरीज अजून एक अधिकार राष्ट्रपतींकडे आहे तो म्हणजे शिक्षेच्या माफीचा. अर्थातच हा अधिकार क्वचितच वापरला गेला आहे. लेखमाला अशीच सुरू ठेवावी, ही विनंती!
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Sun, 01/30/2011 - 21:10 नवीन
लेख आवडला हे वेगळे सांगायलाच नको. काही प्रश्न मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपती पुनर्विचारांसाठी परत पाठवू शकतात. मात्र जर मंत्रीमंडळाने तोच निर्णय पुन्हा घेतला तर राष्ट्रपतींना मान्यता देणे बंधनकारक आहे. मंत्रीमंडळाने पाठवलेला एखाद्या निर्णयावर सही करण्यासाठी राष्ट्रपतींवर वेळेचे बंधन आहे का?म्हणजे राष्ट्रपतींनी सही करण्यासाठी चालढकल केली तर मंत्रीमंडळ त्याबाबतीत काही करू शकेल का?मंत्रीमंडळाला या परिस्थित काही करायचा अधिकार नसेल तर तांत्रिकदृष्या राष्ट्रपती स्वत:चा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत कोणतेही बिल अडवू शकतात असा अर्थ होईल. पंतप्रधानाची नेमणूक. घटना पंतप्रधानाची नेमणूक करण्याचा संपूर्ण प्रशासकीय अधिकार राष्ट्रपतींना देते. राष्ट्रपती भारताच्या कोणात्याही नागरीकाची नेमणूक करतात तसेच पंतप्रधानांना बहुमत सिद्ध करायला सांगणे राष्ट्रपतींवर बंधनकारक नाहि. बरोबर पण समजा पंतप्रधानांनी शिफारस केलेल्या व्यक्तीस मंत्रीपदाची शपथ देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का?समजा पंतप्रधानांना मंत्रीमंडळाचा विस्तार करायचा असेल आणि तो मनुष्य मंत्री व्हायला योग्य नाही असे राष्ट्रपतींना वाटले आणि त्यांनी त्याला शपथ द्यायला नकार दिला तर तांत्रिकदृष्या तो मनुष्य मंत्री बनू शकणार नाही.तसे राष्ट्रपतींनी केल्यास सरकारची मोठी अडचण व्हायची शक्यता आहे.हा अगदी हवेतला प्रश्न आहे असे वाटायची शक्यता आहे.पण समजा २००२ मध्ये कॅप्टन लक्ष्मी राष्ट्रपती झाल्या असत्या तर त्यांची आणि पंतप्रधान वाजपेयींची खडाजंगी उडाली असती कारण आपण ज्या पदासाठी निवडणुक लढवत आहोत त्या पदाच्या मर्यादा लक्षात न घेता कॅप्टन लक्ष्मींनी एकामागोमाग एक वक्तव्ये केली होती.आणि मग त्यातूनच अशी खडाजंगी पंतप्रधानांबरोबर उडायची शक्यता होतीच. माझ्या मते राष्ट्रपतींचा आणखी एक विशेषाधिकार म्हणजे नव्या राज्याची निर्मिती करायचे विधेयक संसदेत मांडले जाते त्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते.कारण झारखंड-छत्तिसगड आणि उत्तराखंड ही नवी राज्ये निर्माण करण्यासाठीचे विधेयक मांडण्यापूर्वी त्यासाठी राष्ट्रपती नारायणन यांची शिफारस होती असे वाचल्याचे आठवते. असो.लेखमालेचे अजून भाग येऊ देत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/01/2011 - 09:59 नवीन
मंत्रीमंडळाने पाठवलेला एखाद्या निर्णयावर सही करण्यासाठी राष्ट्रपतींवर वेळेचे बंधन आहे का?म्हणजे राष्ट्रपतींनी सही करण्यासाठी चालढकल केली तर मंत्रीमंडळ त्याबाबतीत काही करू शकेल का
फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या निमित्ताने राष्ट्रपतींना असलेला 'पॉकेट व्हेटो' समोर येतो. कोणतेही बिल (अपवादः मनी बिल) संसदेने मंजूर केल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे त्यांच्या मंजूरीसाठी पाठवले जाते. जर राष्ट्रपतींना यात काहि वावगे वाटले तर ते स्वाक्षरीस नकार देऊन बिल पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवू शकतात. अर्थात संसदेने ते पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना मंजूरी देणे बंधनकारक आहे. मात्र इथे एक मेख आहे. पहिल्यावेळी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करण्याला / पुनर्विचारार्थ संसदेकडे पाठवण्याला कोणतेही काळाचे बंधन नाही. म्हणजे अप्रत्यक्षपणे राष्ट्रपतींना मिळालेला हा व्हेटो आहे. यालाच भारतीय राष्ट्रपतींचा 'पॉकेट व्हेटो' म्हटले जाते.
बरोबर पण समजा पंतप्रधानांनी शिफारस केलेल्या व्यक्तीस मंत्रीपदाची शपथ देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे का?
होय. हे बंधनकारक आहे. राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने कोणत्याही भारतीय नागरीकाची पंतप्रधानांची निवड करू शकतात. आवश्यकता वाटल्यास त्या व्यक्तीला बहुमत सिद्ध करायला लाऊ शकतात. (जर सांगितले नाही व विरोधकांना त्या व्यक्तीकडे बहुमत नाही वाटत असेल तर अविश्वास ठरावाचा पर्याय आहेच). माझ्या माहितीनूसार बाकी उर्वरीत मंत्रीमंडळ पंतप्रधानांनी शिफारस केल्याप्रमाणे असणे बंधनकारक आहे.
माझ्या मते राष्ट्रपतींचा आणखी एक विशेषाधिकार म्हणजे नव्या राज्याची निर्मिती करायचे विधेयक संसदेत मांडले जाते त्यासाठी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते
होय. मात्र राष्ट्रपती अशी शिफारस आपणहून करू शकत नाहीत पंतप्रधान/मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने ही शिफारस राष्ट्रपती करू शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गुंडोपंत Mon, 01/31/2011 - 01:46 नवीन
फार छान! लेखमाला. आवडली. याचा वापर करून मराठी विकिवर काही भर देता येईल असे वाटते. तसे करणार का?
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 01/31/2011 - 02:23 नवीन
लेखमाला पुन्हा सुरु केल्याबद्दल धन्यवाद. संग्रहणीय लेखमाला! ------------------------------------------ वाचनखूण साठवा कळ हवी आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 01/31/2011 - 20:40 नवीन
हेच म्हणतो. (आणि सहजराव : थ्यांकू+१. कोणत्या शब्दाबाबत ते तुम्हाला ठाऊक आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
न
नितिन थत्ते Tue, 02/01/2011 - 06:17 नवीन
असेच म्हणतो. सहज यांच्याशी सर्व बाबतीत सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
निखिल देशपांडे Mon, 01/31/2011 - 08:24 नवीन
लेखमाला पुन्हा सुरु केल्याबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार Tue, 02/01/2011 - 07:21 नवीन
"....इथे राष्ट्रपतींना पूर्ण अधिकार नसला तरी एखादा निर्णय पुनर्विचारांसाठी परत येणे नामुष्कीचे असल्याने त्यावर सर्वस्तरांवर पुनर्विचार होतो....." ~ लेख नि:संशय अभ्यासपूर्ण आहे ते वरील सर्व प्रतिसादातून प्रतीत झालेच आहे त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करत नाही. फक्त वरील वाक्यासंदर्भात हा प्रतिसाद. इथे "नामुष्की" संज्ञेचे प्रयोजन अप्रस्तुत आहे असे व्यक्तीशः मला वाटते. दोन्ही सदनांत मंजूर झालेले बिल राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरी आणि सहीसाठी पाठविणे हा जसा प्रघात आहे तसेच घटनेतच असलेल्या तरतुदीनुसार राष्ट्रपती (जर त्याना वाटले तर) Reconsideration साठी ते परत पाठवू शकतात. हा एक सर्वसाधारण उपचार आहे. शेवटी संसदेला वाटले तर त्या परत आलेल्या बिलावर ती पुनर्विचार करू शकते अन्यथा आहे त्या स्थितीतच ते बिल परत राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठविले जाते आणि मग त्यावर कोणताही प्रश्न न उभा करता राष्ट्रपती सही करतातच अशी सोय आहेच. मात्र दोन्ही सदनात घडत असलेल्या बिल संदर्भात "डेडलॉक" नावाचा प्रकार जर घडला (म्हणजेच एका सदनाने प्रस्तुत केलेले बिल दुसर्‍या सदनाने 'रीजेक्ट' केले तर इथे घटनात्मक 'डेडलॉक' उभा ठाकतो). अशावेळी मग खुद्द राष्ट्रपतीच दोन्ही संसदेचे संयुक्त अधिवेशन [फक्त त्याच कारणासाठी] बोलावितात आणि मग परत त्या बिलावर काथ्याकुट चालू होतो. अर्थात १९५० पासून आजतारखेअखेर केवळ तीनच वेळा "डेडलॉक" मुळे दोन्ही संसदेचे 'जॉईन्ट सिटींग" झाले असल्याचा इतिहास आहे. १. हुंडाबंदी कायदा १९५९, (२) बॅन्किंग सर्व्हिस कमिशन बिल १९७८ आणि (३) आतंकवाद विरोधी बिल २००२. थोडक्यात बिल मंजुरीसाठी जाणे, राष्ट्रपतीनी त्यावर सही करणे वा पुनर्विचारासाठी परत पाठविणे, वा दोन्ही संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलाविणे यात व्यक्तिगत पातळीवर वा संसद पातळीवर नामुष्की असते असे संभवत नाही. (अवांतर : तसे पाहिले तर एक 'अवघड स्थिती' मात्र एकदा आली होती. ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना त्यांच्याकडे 'पोस्टल बिल' मंजुरी आणि सहीसाठी आले असता, ते त्यानी परत न पाठविता स्वतंत्ररित्या संसदेकडे काही खुलासे मागितले, जे संसदेने त्याना पुरविले नाहीत. मग झैलसिंग यानी ते बिल जसेच्यातसे राष्ट्रपती भवनातच ठेवले. संसदेनेही त्याचा पाठपुरावा केला नाही...आणि अखेरीस ते बिल बासनात गुंडाळले गेले....हाही एकमेव प्रसंग.) असो...बाकी लेखमालेच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहेच हे वेगळे सांगत नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/01/2011 - 10:03 नवीन
अपेक्षेप्रमाणे उत्तम प्रतिसाद. फक्त एक सुधारणा:
ग्यानी झैलसिंग राष्ट्रपती असताना त्यांच्याकडे 'पोस्टल बिल' मंजुरी आणि सहीसाठी आले असता, ते त्यानी परत न पाठविता स्वतंत्ररित्या संसदेकडे काही खुलासे मागितले, जे संसदेने त्याना पुरविले नाहीत. मग झैलसिंग यानी ते बिल जसेच्यातसे राष्ट्रपती भवनातच ठेवले. संसदेनेही त्याचा पाठपुरावा केला नाही...आणि अखेरीस ते बिल बासनात गुंडाळले गेले
माझ्या माहिती प्रमाणे ग्यानी झैलसिंग यांनी 'पॉकेट व्हेटो' वापरला. हे बिल पुनर्विचारार्थ पाठवलेच नाही. त्यांची टर्म संपल्यावर श्री. वेंकटरमण यांनी ते बिल पुनर्विचारार्थ पाठवले. मात्र बिल पुन्हा संसदेत यायच्या आधीच सरकारच बदलले आणि नव्या सरकारने हे बिल संसदेत आणलेच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार
ऋ
ऋषिकेश Tue, 02/01/2011 - 10:11 नवीन
सगळ्यांचे प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार. पुढचा भाग टाकत आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा