लोकशाही कडून राजेशाही
💬 प्रतिसाद
(5)
अ
अर्धवटराव
Sun, 01/30/2011 - 02:13
नवीन
सर्वप्रथम, तुम्ही ज्या लोकशाहीच्या मृत्युविषयी साशंक आहात, ती प्रगल्भ लोकशाही आपल्याकडे अजुन रुजायची आहे. आपली लोकशाही अजुनही बाल्यावस्थेत आहे. पण या लोकशाहीचा राजेशाहीत अंत होणार नाहि. हि लोकशाही तारुण्यावस्थेत पोहोचेल, आणि लोकमानासच देशाचा कारभार चालवेल. थोडा वेळ लागेल, पण असं होण्याची शक्यता जास्त आहे, कारण आपल्याकडे प्रचंड लोकसंख्या आहे आणि हळुहळु सुशिक्षीतपणा देखील वाढतो आहे. इतक्या प्रचंड लोकदबावाला कोणि एक परिवार कंट्रोल करु शकणार नहि.
अर्धवटराव
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Sun, 01/30/2011 - 05:54
नवीन
सहमत आहे. लोकशाहीच्या काही संकल्पना भारतात नक्कीच रुजल्या पण आपले राजकारण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अजुनही बाल्यावस्थेत आहे. अजूनही अनेकांना फक्त एक माणूस देश बदलू शकतो असे वाटते.सगळ्या राजकरण्यांना 'उडवले' की देशाचे चित्र पालटेल असे अनेकांना वाटते. ही मानसिकता बदलायला थोडा वेळ लागेल.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Sun, 01/30/2011 - 14:24
नवीन
हेच या पूढील नीवड्णूकींचे नीकश ठरऊ लागतील. म्हणून अजूनही आशा वाटते. विशेषतः जेव्हां पूण्यातील सामान्य जनतेने मध्यंतरी घातल्या गेलेल्या राजकीय-जातीय धूमाकूळाला ज्या पध्दतीने नाकारले, ते बघून नीश्चीतच आशा वाटते.
- Log in or register to post comments
B
Bhushan11
Mon, 01/31/2011 - 08:50
नवीन
आपला आशावाद प्रत्यक्षात येवो अशी परमेश्वराला प्रार्थना.
१९७६ मध्ये कॉंग्रेसचा पराभव करून जनता पक्ष प्रचंड बहुसंख्येने निवडून आला. त्यानंतर परत इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस निवडून आली.
त्या वेळी आणि त्यानंतर काही काळ लोकशाही नांदत होती असं मला वाटतं.
पण आता काळ बदलला आणि पुढार्यांना लोकांचा विसर पडत चाललेला दिसतो. निवडणुकान्साठी प्रचंड पैसा उभा केला जात आहे.
मिडीयालां उघडपणे विकत घेतला जात आहे. सामान्य माणसाला निवडणूकीत उभं राहणं केवळ अशक्य. सरते शेवटी याच मोजक्या राजांपैकी कोणीतरी निवडून येतो.
- Log in or register to post comments
व
वडिल
Fri, 02/04/2011 - 14:48
नवीन
ओबामा ला पाकिस्तान बद्द्ल पत्र लिहिणारी लोकं भारतात जास्त आहेत. असली लोकं स्वत: च्या स्वार्था साठि कोणालाहि विकतील.
युवकांनी पुढाकार घेवुन जर क्रांती घडवुन आणली नाहि तर, पुढच्या पिढिला परत गुलाम म्हणुन जगावे लागेल.
राजे महाराजे होते तसे प्रत्येक जाती/प्रांताचे मुखवटे घातलेले नेते, त्यांच्या मागे कॉर्पोरेट लॉबी असेल. बाबुगीरी (मॅनेजरस)साठि एम बी ए फॅक्टरी तुन तयार झालेले निवडक "उच्चशिक्षित" आणि व्यसनाधिन तरुण दर महिन्या च्या इ एम आय भरण्या पोटि अनेक गुलामां कडुन काम करुन घेण्यात गर्क... हि स्थिती खरं तर आज हि थोड्या प्रमाणात आहे. ती मोठ्या प्रमाणात वाढेल.
भारताची वाढ हि स्टॉक इन्डेक्स नी न मोजता.. सामान्य माणसाच्या जिवनमाना शी / शिक्षणा शी / रस्ते -पाणि -वीज - स्वच्छता- आरोग्य- आरोग्यविषयी सुविधा ह्यावर आधारीत असावे. जास्त टिव्हि चॅनल, पाश्वात्त रहाणिमान म्हणजे प्रगती नव्हे.
- Log in or register to post comments