Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्रिगेडी वृत्ती

अ
अँग्री बर्ड यांनी
Wed, 03/02/2011 - 15:34  ·  लेख
लेख
ब्रिगेडी वृत्ती जेवढी वाढत आहे तितकाच क्लेश महाराजांच्या आत्म्याला होत असेल नाही का ? थोर व्यक्तींचे कार्य त्यांना जनमानसातून पुसता येत नसल्याने ब्रिगेडी लेखक आणि कार्यकर्ते जिवाचा आटापिटा करून त्यां थोर व्यक्तींना शिवीगाळ करत आहेत.शिव्या दिल्या म्हणजे त्या व्यक्तीची प्रतिमा जनमानसातून खाली उतरली अशी भाबडी समजूत करून घेतात ते .ह्यांची ४-५ रुपयावाली पुस्तके जी खपवत असतात त्यात वाक्याची शेवटी पूर्णविराम नसेल पण शिवी तरी असेलच .आणि बऱ्याच चुका आहेत त्यामध्ये आणि ते त्यामध्ये बिनधास्तपणे ठोकेबाजी करतात ह्याबद्दल गम्मत वाटते .त्यांनी स्वामी विवेकानंदांचे चातुर्वण्यावरचे भाष्य जे छापले आहे त्याखाली त्यांनी अजून एक स्वामी विवेकानंदांचे वाक्य छापावे ते म्हणजे "विद्वेषाच्या आधारावर केलेले कोणतेही काम फार काळ टिकत नाही .

प्रतिक्रिया द्या
13665 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

अ
अमित देवधर गुरुवार, 03/03/2011 - 13:21 नवीन
वरची चर्चा बर्‍याच वेळापासून वाचतो आहे. काही गोष्टींची नवीन माहिती मिळाली आणि काहींमुळे मनोरंजनही :). पण हा विषय जितका समजला जातो, तितका छोटा नाही. जे आपल्याला सध्याचं स्वरूप दिसतं, तो हिमनगासारखा त्याचा पाण्यावरचा भाग आहे (याच्या विचारांचे पेपर निघतात, ऑर्कुट कम्युनिटी आहेत, त्याचे विचारवंत आहेत, राजकीय, सामाजिक व वैचारिक आघाड्या आहेत, अनेक सुशिक्षित लोक याच्या कार्यात सहभागी आहेत इ.). मृगनयनीशी सहमत की, तो दुर्लक्ष करून नाहीसा / कमी होण्यासारखा नाही (कारण त्याला राजकीय पाठिंबा आहे+तो अतिजुन्या १००-१५० वर्षांपूर्वीच्या जातिभेदाच्या पायावर उभा आहे.); किंबहुना दुर्लक्ष केल्यामुळेच तो आताएवढा मोठा झालेला असण्याची शक्यता बरीच आहे. पण म्हणून त्यांना शिव्या घालून तो कमी होईल हीही शक्यता नाही. या वादामध्ये जे (इतर समाज) चुकीच्या ज्ञानाच्या आहारी जाताहेत, तेही आपलेच लोक आहेत. तस्मात्, त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना त्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. (इथे भाबडा/टोकाचा गांधीवाद अपेक्षित नाही, ही खरी मराठी समाजाची गरज आहे.) पूर्वी हा अतिरेकी ब्राह्मणविरोध फक्त भावनिक पातळीवर व्यक्त होत होता (गेल्या काही वर्षांपर्यंत). सध्या पुस्तकं, पुतळा हटवणं, व्याख्यानं देणं 'हे' जे चालू आहे; ते त्याला तात्विक अधिष्ठान देणं. कोणत्याही चळवळीला 'तात्विक अधिष्ठान देणं' ही एक मोठी गोष्ट असते, जी तिला बुध्दीच्या पातळीवर नेऊन ठेवतं, ज्याकडे समाजातला वरचा (सुशिक्षित) वर्ग कुतूहलाने पाहतो आणि खालचा (अशिक्षित) वर्ग श्रध्देने. त्यामुळे तिला नवीन आवाका, सामर्थ्य मिळतं. आता हा राडा वाटत असला, तरी करणारे ते चळवळ म्हणून करत आहेत; त्याची उद्दिष्टं, परिणाम, गृहितकं, साधनं काहीही सगळ्या मराठी समाजाच्या दृष्टीने चूकीचं असलं तरी. आता मराठी समाजासाठी बरोबर/चूक काय हे ठरवताना मला ब्राह्मण/मराठे कोणातरी एकाची बाजू घ्यायची आहे, असा गैरसमज करून घेऊ नये. याच्या पलिकडे समाज आणि राष्ट्रासाठी कल्याणकारक अशी एक नीती/बाजू/गोष्टी असतात, त्या अपेक्षित आहेत (त्या कोणत्या, ते छ. शिवाजी महाराज/टिळक यांच्या कार्याचा अंदाज घेतला की लक्षात येऊ शकतात). असो. आत्ता या गोष्टीचा विचार करताना हे बघणं गरजेचं आहे असं वाटतं की, १. ही चेष्टेवारी नेण्याची, दुर्लक्ष करून कमी होणारी गोष्ट नाही. चुकीच्या कोणत्याही छोट्या/मोठ्या गोष्टीकडे (विशेषत: सामाजिक बाबतीत) दुर्लक्ष करणं बरोबर नाही. २. ही चळवळ आता पूर्वीपेक्षा जास्त जोरात आहे व ती वैचारिकदृष्ट्या व आचरणदृष्ट्या ब्राह्मण/मराठा/इतर व एकंदर भारतीय समाजासाठीही योग्य नाही. ३. ब्राह्मणेतर समाजातील इतर अनेक समाज अजूनही खरंच अतिखालावलेल्या अवस्थेत आहेत (उदा. पारधी समाज), आणि ती सुधारल्याशिवाय अशा चळवळीला मिळणारा आंधळा पाठिंबा कमी होणार नाही. पण एकट्या ब्राह्मणसमाजावर त्याची जबाबदारी नाही, सगळ्या मराठी समाजांवर आहे (ब्राह्मणसमाजाकडे फारसं सामाजिक, राजकीय बळ आता नाही, ही गोष्ट इथे लक्षात घ्यावी). ४. सगळ्या मराठी समाजाचं हित व्हायचं असेल, तर या चळवळीचा प्रतिवाद बुध्दीच्या साधनाने, मिडियाच्या साधनाने (योग्य व सत्य ज्ञान पुराव्यासह वरच्या ते खालच्या समाजापर्यंत प्रसारित करून), जातिभेदाची भावना आपल्या पातळीवर कमी करून करणं गरजेचं आहे. ५. सुशिक्षित समाजाने सामाजिक गोष्टींकडे दुर्लक्ष न करणं. यथानुशक्त्या योग्य प्रकारे, जमेल तितकं/तेव्हा चांगल्या गोष्टी करणं/पाठिंबा व्यक्त करणं आणि वाईट गोष्टी न करणं/विरोध व्यक्त करणं गरजेचं आहे. ही चळवळ व अशा गोष्टींचं मूळ त्यात आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 03/03/2011 - 16:22 नवीन
अप्रतिम प्रतिसाद .. एकदम बरोबर .. समस्त मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे ही कळकळ आहेच .. फक्त मराठा.. ब्राम्हण .. माळी .. कोकणी .. घाटी ... अशी जातीय आणि राहत्या जागेवरुन भांडने करणारी लोक पाहिली की अतिशय वाईट वाटते .. आणि असे कित्येक धागे ठोस मार्ग न दाखवता आपापसात आपण कसे कुठल्या जातीचे आणि ते कसे चुकीचे यात अडकतात तेंव्हा कीव येतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमित देवधर
अ
अविनाशकुलकर्णी गुरुवार, 03/03/2011 - 14:24 नवीन
+१... अमीत राव बरोबर लिहिलेत
  • Log in or register to post comments
अ
अशोक पतिल गुरुवार, 03/03/2011 - 14:43 नवीन
ब्रिगेड या नावाखाली होनारे प्रताप बघुन फार वाईट वाट्ते . सन्ताप याचा येतो कि मोठे म्हणवणारे पुढारी मूग गिळुन आहेत. मी एक मराठा आहे. पण हे विषारी विचार प्रसवणारे या समाजचे असुच शकत नाहित.दादोजी...हटवले गेले.. ते कोणी देशद्रोही होते का ? अतिरेकी ब्राह्मणविरोध करता, पण हेही लक्शात असावे की ज्या इतिहासा चा गर्व करता तो ब्राह्मणा नी जतन केलाय . समाजाच भले करायचे असेल तर अजुन ही खुप काही करता येइल. मला खात्री आहे की समस्त मराठा समाज्या एक सहस्रा ने हि याच्या मागे नसेल.
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 03/03/2011 - 16:13 नवीन
समस्त मराठा समाज यांच्या मागे नाही हे माहित आहे, पण मराठा समाजातील मान्यवर पुढे येऊन यांचा जाहीर विरोध का करत नाहीत हा प्रश्न मला पडला आहे. (हे तिरकस पणे नाही लिहिले, मला खरच कळत नाही आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल
अ
अँग्री बर्ड गुरुवार, 03/03/2011 - 17:53 नवीन
तुम्हाला ० मार्क . तांबे बाई माझ्या प्रोफाईल वर आहेत,हे मुद्दे लिहून मी माझ्या नोट्स मध्ये टाकले होते आणि मग मी संभाजी ब्रिगेड ला टाकले होते . ते मुद्दे सगळीकडे पसरलेत .. वहात शौल्द आय डॉ
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानेश... Fri, 03/04/2011 - 04:03 नवीन
"वहात शौल्द आय डॉ.." क्लास !! =)) या वाक्यावर चुचु आणि प्रविनभप्करचे पन्नास प्रतिसाद ओवाळून टाकले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अँग्री बर्ड
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 03/04/2011 - 08:40 नवीन
>>या वाक्यावर चुचु आणि प्रविनभप्करचे पन्नास प्रतिसाद ओवाळून टाकले !! हीहीही !!! अरे काल मी खूप प्रयत्न केला पण ते वाक्य कळले नव्हते. आज हा प्रतिसाद वाचून परत प्रयत्न केला, मग कळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
प
प्यारे१ Fri, 03/04/2011 - 08:57 नवीन
त्यांना, 'व्हॉट शुड आय डू' असे मराठीत लिहायचे होते असे ५ सदस्यीय तज्ज्ञ समितीच्या पुष्कळ निरीक्षणाअंती समजले असे आमचा वार्ताहर कळवतो. मेंदूवरील अतिताणामुळे समितीतील दोघे येरवडा येथे तर एक ठाणे येथे उपचारासाठी गेले आहेत. दोघे बेपत्ता आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
अ
अँग्री बर्ड Fri, 03/04/2011 - 09:22 नवीन
हे आम्हास माहिती आहे . पण गुगल ट्रान्सलेशन ची मजा अनुभवायची असेल तर सरळ धोपट लिहिण्यात काय अर्थ आहे हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सविता Fri, 03/04/2011 - 09:00 नवीन
आई ग... "वहात शौल्द आय डॉ.. म्हणजे.. "व्हॉट शुड आय डू?" ... निदान १० वेळा वाचले... अर्थ लावण्यासाठी! अहो... ५० काय ५०० प्रतिसाद ओवाळून टाकावेत इअतकं सुंदर आहे ते वाक्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानेश...
च
चंद्रू गुरुवार, 03/03/2011 - 21:50 नवीन
ब्रिगेडच्या शेणापतीची बायको बीजेपीची आमदार होती. म्हणजे ब्रिगेडला आतल्या हाताने बीजेपीचा पाटिंबांच असला पायजे. शेणेने साथ सोडली तर ब्रिगाडवालेच कामाला येतील. कोनीतरी राडेबाज लोक आपल्याबरोबर पायजेत ना. शेवटी राजकारन महत्वाचं बाकी सब झूट. तत्व वगेरे. शेणेने दलीत आणि मुसलमाणांना बरोबर घेतलं म्हनजे आपलं कसं जमनार ? मग आपली बी ब्रिगेड पायजे म्हनून बीजेपीचं कारस्थाण चाललेलं हाये.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Fri, 03/04/2011 - 05:15 नवीन
मस्त मनोरंजनात्मक धागा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा