आयर्लंडला भारताचा पराभवाचा धक्का
६ मार्च - आज वर्ल्ड कप मधला अजुन एक मोठा उलटफेर झाल्या आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्रेट अनसर्टंटीज असे म्हंटले जाते त्याचा आज बंगळुरु च्या ग्राऊंड मधल्या हजारो प्रेक्षकांनी प्रत्यक्षात तर करोडो लोकांनी टिव्ही वर आणि हजारो लोकांनी रेडिओ वर अनुभव घेतल्या आहे .
आज आयर्लंड मैदानात उतरलं होतं ते भारताचा खुर्दा उडवण्याच्या उद्देशाने. परंतु सुरुवातीलाच दुबळ्या भारताला टॉस जिंकुन थोडंफार लक ची साथ मिळाली. भारताच्या बॉलर झहिर खान ह्याने आयर्लंड ची सलामीची जोडी पहिल्याच तीन षटकांतच तंबुत पाठवली तेंव्हा भारतभर फटाके फोडल्या गेले. परंतु आयर्लंड च्या मजबुत बॅटींग ने भारतीय गोलंजाजांचा हा आनंदाचा बुडबुडा बुळ्ळुक कन फोडला . अंतरराष्ट्रीय स्तरावर टॉप मधे गणल्या गेलेल्या तिन आणि चार नंबर वर आलेल्या जॉइस आणि नेल ओब्रायन यांच्या कडून भारताच्या सुमार बॉलिंग चा छाण समाचार घेतल्या गेला. एका चुकीमुळे रन आउट होत ही जोडी फुटली. नंतर भारताच्या नवोदित बॉलर युवराज सिंग याने ५ विकेट घेत आयर्लंड चे मोठ्या धावांचे लक्ष धुळीस मिळवत २०७ मध्ये डाव आटोपला.
२०७ धावांचं अशक्यप्राय वाटणारं लक्ष घेऊन भारताची अनुभवहीन जोडी म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर मैदानात उतरले तेंव्हा भारतियांचे श्वास काही काळ रोखल्या गेले होते . आपल्या करियर मधे शिकण्याच्या पहिल्याच टप्प्यात असणार्या सेहवाग ने चौकाराने खाते उघडले तेंव्हा बरे वाटले. परंतु पुढच्याच चेंडु वर अँब्रोज , आक्रम आणि युनुस नंतर सर्वांत खरणाक समजल्या जाणार्या जॉन्स्टन ने त्याची विकेट घेतली. नंतर आलेल्या गंभिरला ही जॉनस्टन ने चलते केले . सुरुवातीच्या धक्यानंतर कोम्यात गेलेल्या भारतिय फलंदाजांनी ह्याचा एवढा धसका घेतला की जर चौकार मारल्या तर आयर्लंड चे बॉलर्स रागाच्या भरात शरीरवेधी बॉलिंग करुन त्यांच्या बरगड्या तर तोडणार नाही ना ? अशा भितीत खेळले , जे बरोबरंही होतं. आयर्लंड चे स्पिनर सुद्धा १६०-१७० किमी च्या वेगाने मारा करण्यास समर्थ आहेत. बॉलिंग चेंज नंतर आलेला जगद्विख्यात आणि आजवर कसोटी वन डे आणि २०-२० मधे १३,००० च्या वर विकेट्स घेतलेला डॉक्रेल बॉलींग ला आला तेंव्हा आपला पहिलाच सामना खेळणारा १६ वर्षिय खेळाडु सचिन तेंडुकर कसा बसा रन काढत होता. पण डॉक्रेल ला नवख्या सचिन ला चकवायला वेळ लागला नाही. त्याने एका सहज फेकलेल्या चेंडु वर सचिन चकला आणि अंपायर रिव्ह्यु ची वाट ही न पहाता चलता बनला. रिव्ह्यु घेतल्या आयर्लंड चे स्पिनर फायरबॉल्स टाकुन आपली पँटच जाळुन टाकणार नाहीत ना ? आणि पहिल्याच मॅच मधे आपला पोपट होणार नाही ना ? ही भिती सचिन च्या तोंडावर साफ झळकत होती. नंतर आलेले कॅप्टन धोणी बॉल खाऊन जेवढी प्रॅक्टिस मिळेल तेवढी घेत होते. पण आज नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ढोणी आउट झाल्यावर आलेला युसुफ पठाण येऊन असे काही शॉट खेळला की भारत स्ट्राँग टीम वाटावी , आणि आयर्लंड एखादी खटमल टिम वाटावी. त्याने आल्या आल्या मॅच चा संपुर्ण खेळंच पालटून टाकला. लक बाय चान्स ने ७६ बॉलांत ५० रन्स मिळवुन युवराज ने ही फिफ्टि साजरी केली. आयर्लंड चे खेळाडु स्तब्ध होते. त्यांना आपण मॅच हारल्यावर विश्वासंच बसत नव्हता. सगळे प्लेयर्स ग्राऊंड मधे च उभे होते.
मॅच जिंकल्या नंतर मला माझ्यावर विश्वासच बसत नव्हता . भारताने आयर्लंड ला खरोखर हरवलं ? मी ७-८ न्युज चॅणल बदलुन पाहिले . तरी देखील विश्वास बसत नव्हता. पण नंतर माझं सुन्न झालेलं चित्त थार्यावर आलं तेंव्हा मला बाहेरचा फटाक्यांचा आवाज ऐकु आला.
ह्या ऐतिहासिक विजया मुळे भारतात क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल . भारत सरकार ने भारतिय टीम वर बक्षिसांची खैरात केल्याचे ही ऐकले आहे .
टिम इंडीयाचे ह्या विजयाबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच !
- कॅमेरामॅन मनिश के साथ मै पत्रकार टारझन चौरासिया
पीटीआय , गाझियाबाद
प्रतिक्रिया