आरक्षण!
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घ्या!! :) )
नुकताच महाराष्ट्र सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडनुकात महिलांना ५०% आरक्षण जाहीर केले. मिपाकरांना याबद्दल काय वाटते यासाठी हा लेखनप्रपंच !!
अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का? आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ? महिलांचे समाजातिल स्थान सुधारले का ? बरं आनंदीबाई जोशी सारख्या काही महीला तर विना आरक्षणपण पुढे गेल्या . सोनीया गांधी , सायना नेहवाल , ऐश्वर्या राय यांना कुठले आरक्षण होते ?
जिल्हा परीषद वगैरेशी माझा जवळचा संबंध येत असल्यामुळे मला महीला पदाधिका-यांबद्दल बरीच माहीती आहे. राखीव जागेतुन निवडुन आल्यावर सुद्धा जवळजवळ सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात . अशा प्रकारचे आरक्षण कितपत योग्य आहे ? आज बर्याच मोठ्या शहरात पुरुषांशी निखळ स्पर्धा करुन प्रगती केलेल्या महीलांशी तुलना अशा आरक्षण घेउन प्रगती केलेल्या महीलांशी करता येइल का ?
माझे वैयक्तिक मत तर असे आहे की जेव्हा एखादा समाजघटक ( यात महीलासुध्दा आल्या! ) स्वतः पुढे होउन मिळनारे आरक्षण नाकारुन स्वकष्टाने प्रगती साधेल त्यांच्या आत्मविश्वासाला तुलना नसेल !!!
( कोनाच्या भावना दुखावल्यास Sorry !!)
प्रतिक्रिया