Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

१३ जुलै २०११ आणि नंतर...

स — सुशान्त, गुरुवार, 07/14/2011 - 17:43
धडाड धुरळा उडतो गगनी पुन्हा भय जनी दाटते गा एकमेकां सारे सावरू धावती निस्तरू पाहती पुन्हा तेच सुटकेचा कोणी टाकती निःश्वास कुणाचा प्रवास संपलेला विव्हळत जागे कोणी वेदनांत कुठे डोळियांत पाणी साचे चित्रवाणीवर वृत्त साकळते जगाला कळते घडले ते परिस्थिती कोणी सांगे विवरून काय हो कारण घडे त्याचे निषेधाचे कुणी पेटवी पलिते शांत राखा माथे म्हणे कोणी कुणी म्हणे धन्य धन्य नागरिक शूर नि सोशिक धैर्यवंत उलटते रात येता येता नीज पुन्हा नवा आज उजाडतो भयशंका मनी दाटल्या घेऊन चालती गा जन तीच वाट कुजबुज कुठे संताप थोडासा अगतिकचासा एक एक पोट शिकविते धैर्य ते अटळ अन्य काही बळ नाही तेथे

प्रतिक्रिया द्या
1077 वाचन

💬 प्रतिसाद (1)
ग
गणेशा Fri, 07/15/2011 - 09:11 नवीन
कविता खुप छान लिहिली आहे.. मनातील तळमळ स्पष्ट जाणवते आहे. असेच लिहित रहा... वाचत आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा