’तिच्यामुळे’
पेन होतं, कागद होता
त्या रात्री तो जागत होता
रात्र चढू लागली
त्याला आशा वाटली
चंद्र गोजिरा झाला
गार वारा झाला
मन कोरं होतं,
कागदही कोरा होता
तरी पेन कागदाला भिडला
पाच मिनीटं तसाच राहीला,
एक ठिपका करून वर आला
रात्रभर हेच चालू राहीले
श्वास चालू राहीले,
आयुष्य चालू राहीले की नाही हे कळत नव्हते
घड्याळाचे काटे सरकू लागले
आज कविता होणार नाही हे कळू लागले
रात्र संपू लागली
पेनातली शाई सुकू लागली
झोप येऊ लागली
त्याने अखेर पेन उचलला आणि
’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला
ह्रषिकेश चुरी
💬 प्रतिसाद
(3)
प
पक पक पक
Tue, 10/23/2012 - 18:04
नवीन
’तिच्यामुळे’ एवढंच लिहून झोपी गेला
तुम्ही देखील तेच करायला हवे होते... :bigsmile:
- Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/25/2012 - 05:18
नवीन
आंतरजालाची शाई संपेस्तोवर लिहू शकेल तो खरा कवी!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
गुरुवार, 10/25/2012 - 02:44
नवीन
काही बोलायाचे आहे
पण बोलणार नाही ।
फिस्सकन हस्सयाचे आहे
पण हसणार नाही ।
- Log in or register to post comments