अभिशाप जीवनाचा
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद)
आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला
जगणे उदासवाणे, माझे करून गेला
नशिबी वियोग आला, सार्या सवंगड्यांचा
अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला
हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते
चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला
मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला
दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84
निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झालाकाय कल्पना आहे! मस्त झालाय तुमचा भावानुवाद. खरतर एखाद्या गोष्टीमुळे फक्त सुरवात होते एखाद्या लिखाणाची, पण मग त्याला (लिखाणाला)स्वतःच अस एक वेगळेपण, एक वलय निर्माण होत, त्यामुळे मुळ प्रेरणेवर किती विसंबायच ते आपणच ठरवु शकतो.