तात्या तुमची कमाल आहे !! चक्रधराना मिपाच्या फलाटा वरती आणावेसे वाटले हेच माझ्यासाठी मुळात कौतुकास्पद आहे. बहुत खूब !! चक्रधर मला आवडणारे एक महान कवी आहेत. त्यांची कविता काळजात रुतून बसणारी. त्यांची सादर करण्याची स्टाईल ही मला भिडते. छान विषय छेडलात. मी नाशिकमध्ये राहतो त्यामुळे वसंत पोतदार हा अवलिया ही खुप चांगला परिचयाचा होता.
तात्या, अरे तुम्ही हे काय चालवलं आहे इथे ? पहिले अण्णा किरानावाले, आता चक्रधर दिल्ली वाले ! आम्हाला रोज
एकाची आठवण देऊन किती उसासे मारायला लावणार ? आता आणखी काही अण्णा सुचवितो. माडगूळकर, फडके, चितळकर . होउन जाउन द्या एकदा !!!!
>> आता आणखी काही अण्णा सुचवितो. माडगूळकर, फडके, चितळकर . होउन जाउन द्या एकदा !!!!
अण्णा माडगुळकरांच्या भेटीचं आमच्या नशिबात नाही..
त्यांचे बंधु आणि उत्तम ग्रामिण कथाकार व्यंकटेश तथा तात्या माडगुळकरांच्या पाया पडण्याचं भाग्य लाभलं आहे..
अण्णा चितळकरांना भेटण्याचं भाग्यात नव्हतं..
फडके आणि विशेष करून ललीमावशीशी खूप घरोब्याचे संबंध होते..
भाईकाकांच्या पाया पडण्याचं आणि त्यांच्याशी एकदा फोनवर व दोनतीनदा प्रत्यक्ष भेटीचं भाग्य लाभलं आहे.. ते गेल्यानंतरही एक्दा त्यांच्या घरी गेलो होतो..
नाशिकला कुसुमाग्रजांच्या घरी सकाळी भरणार्या सामान्य माणसांच्या दरबारात एकदा हजेरी लावून पाया पडलो होतो..
दीदीची भेट मिळू शकेल पण अजून तिच्यापुढे उभा रजायला घाबरतो..
असो..
आपल्या जीवनाला फुरसदीचा एक लांबलचक भरजरी पदर असावा असं मनापासून वाटत असलं तरी चरितार्थ चालविण्यासाठी कामधंदा करण्यातच आपण फार खर्ची पडतो. आपलं सगळं जीवन एका विलक्षण यांत्रिक गतीने झपाटून टाकलं आहे.
कधी अंगावर चांदणं पडत नाही.
कधी झाडाच्या पानांची सळसळ ऐकू येत नाही.
कधी ओढ्यात अंघोळ होत नाही.
कधी उताणं झोपून चांदण्यांनी गच्च भरलेलं आभाळ पाहता येत नाही. परंतु तरीही रानावनातील अदभूत जगाविषयी माझ्या छांदिष्ट मनात जे अनिवार आणि न संपणारं कुतूहल आहे त्याचा हा वृतांत आहे.
व्यंकटेश माडगुळकर --जंगलातील दिवस.
ह्म्म!! हेच्च म्हणते.
दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे
आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,
तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली
तात्या तुमच्या लेखणी मध्ये एक मस्त मस्त माधुर्य असते. मजा येते वाचताना.
हा कवी खरच जादुई होता. तो एक हिंदी गाण्यांचा प्रोग्राम सादर करत असे.....जाम आवडायचा.
अशोक चक्रधरांचे नाव घेतले की मला 'पोलखोलक यंत्र' आठवते.
समोरच्या व्यक्तिच्या मनात काय आहे हे सांगणारे यंत्र कविला मिळाल्यावर काय घडते ते इथे वाचा.
चक्रधरांच्या इतर कविता इथे वाचा.
प्रतिक्रिया
कविता सुंदर आहेच.
संवेदनशील कवी.
ही कविता ऐकली होती पूर्वी. या
कविता सुंदर आहे.
तात्या खरेतर आभार तुमचे
कविता
किक देणारे स्मरण....
तात्या , काय चालवलं आहे ?
>> आता आणखी काही अण्णा
तात्या माडगुळकर-
ह्म्म!! हेच्च म्हणते.
मस्त लेखन !
हा कवी खरच जादुई होता.
ना----ना
कविता छान आहे
+ १
पोलखोलक यंत्र