Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडले आणि असाच अनुभव थोडाफार सगळ्यांनाच असतो हे ऐकुन बरे वाटले..

छान लिहीता तुम्ही अभिषेकराव. यातल्या बर्‍याच प्रसंगातून कधी थोडे आधी-कधी थोडे नंतर गेलो आहे. पुण्यातले श्रीक्रुष्ण टॉकीज असल्या पिक्चरसाठी प्रसिद्ध होते (आहे?)

प्रामाणिकपणा भावतो तुझ्या लिखाणातला.. आवडलच.. >>चाळीच्या ठिकाणी अश्या खाली घरांचा लगेच अड्डा बनतो. मग या अश्या अड्ड्यांवर जुगार, सिगारेट, दारू अशी सारी व्यसने चालतात.. अगदी अगदी. कुणाच्या घरचे चार दिवस बाहेर जायचा अवकाश, अड्डा भरायचाच आमचा.. ध म्मा ल..!!

धन्यवाद, प्रामाणिकपणे जगणे हा जगण्याचा सर्वात सोपा प्रकार आहे, तोच लिखाणात दाखवला तर लिखाणही सोपे पडते.

संयमित भाषेत लिहिलेला चांगला छान लेख.
अगदी आजही हे आईला कळले तर त्याला सामोरे जायची माझी हिंमत नाही.
हे वाक्य केवढ्या मोलाचं आहे.

सर्व प्रतिसादकांचे आभार ! ज्यांनी वाचले, आवडले, पण विषयाला अनुसरून प्रतिसाद न सुचल्याने टंकला नाही त्यांचेही आभार. :)

सहावीत असताना मी देखील "लग्न का करतात हो" असा प्रश्न विचारून सर्व संबंधितान्ना फेफरे आणले होते याची आठवण आणि त्यांचा झालेला चेहरा आठवून हसु आले... अर्थात माझा प्रश्न या विषयाशी संबंधित नव्हता, आणि मी प्रश्न पूर्ण सांगितल्यावर त्यांनी सोडलेला सुस्कारा पण आठवला.. :)

त्यानंतर आमच्यात त्या सिनेमाशी संबंधित असलेला ‘टारझन’ हा शब्द असल्या सिनेमांसाठी वापरायचा एक कोडवर्ड झाला होता णाही णाही... णारु ने हे वाक्य वाचले तर अख्खा आफ्रिका आणि तिथले हत्ती हसुन हसुन लोळले असते ! ;) बाकी माझेही अणुभव असेच काहीसे किंवा जास्तच खत्रुड आहेत... जेव्हा पहिला चित्रपट पाहिला होता तेव्हा माझ्या बाल मनावर शॉलिट्ट केमिकल लोचा झाला की त्यानंतर त्याचा अंमल सबंध आठवडा राहिला होता ! ;) जाउं दे उगाच जास्तीचे टंकन कष्ट घेणे टाळावे म्हणतो... ;) जाता जाता:- बीपी मधे मुलं-मुली एकत्र बसुन बीपी पाहतात हे काही पटले नाही बॉ !

सगळ्यांचा प्रकार बराचसा कॉमनच दिसतोय. 'थिअरी' समजली साधारण नववी-दहावीच्या आसपास. बरीचशी उत्सुकता, थोडा अपराधीपणा, बुचकळवणारा आदर्शवाद, नक्की आहे हे असंच की वेगळं ह्याबाबतचा गोंधळ.... काय नव्हतं? अभिषेक, मस्त लिखाण! चांगला पटकथाकार नि मुख्य म्हणजे दिग्दर्शक होशील असं वाटतं तुझे लेख वाचून.

खुपच छान लिहिले आहे. इतर विषयांना-देखील अगदी अलगदपणे ह्या एका लेखनातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे विशेष कौतुक :) असेच लिहित रहा, शुभेच्छा!

अभिषेकराव, मस्त लेख. 'मातीच्या चुली' म्हणतात ते खरंच...ते लूनावरून मोठ्ठी ब्याग (व्हीसीआरची) आणणे, मग शेजार्‍यांचे (मित्राच्या) प्रश्न इ.इ. सगळे आठवले :)