Welcome to misalpav.com
लेखक: पद्मश्री चित्रे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

तुम्ही आठवणी जागवल्या. माझी आई, माझ्या (आणि भावंडांच्या) नशिबाने शेवटच्या आठवड्यापर्यंत सगळ्यांना ओळखत होती, बोलत होती. तिच्या सर्व जाणीवा जाग्या होत्या. शेवटच्या आठवड्यात क्वचित वर्तमानात यायची, भावाला, बहिणीला ओळखायची बोलायची (मलाही ओळखत असावी असा माझा अंदाज) आठवड्याभरात, दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्हा भावंडांच्या नजरेसमोर तिने डोळे मिटले, शेवटचा श्वास घेतला. आम्ही सर्वार्थाने पोरके झालो. तुम्हाला आईची येणारी आठवण, दु:खाचे कढ प्रामाणिक आहेत. आईचे संस्कार विसरू नका. त्या संस्कारांची जन्मभराची साथ म्हणजेच प्रत्यक्ष आईची साथ.

आई वडिलांचं जाणं हेच ख-या धाग्यांचं तुटणं असतं, नाळ तिथंच जोडलेली असते म्हणुन. कधी कधी वाटतं ही नाती नकळत्या वयातच संपतात तेच बरं असतं. असहायता आणि दु:ख हे एकत्र सहन करायची ताकद प्रत्येकाला मिळतेच असं नाही.

मनाला भिडणारे आहे.. अंतर्मुख करणारे लेखन. तुम्ही म्हणता तसे खरचं मलाही वाट्तं आई कुठूनतरी लक्ष ठेऊन आहे. एरवी नास्तिक, बुध्दीप्रमाण्यावर विश्वास ठेवतांना हा मात्र हळवा कोपरा बुध्दी पेक्षा भावना प्रबळ असल्याचे दाखऊन देतो.

असेच म्हणते. नक्कीच आई लक्ष ठेवुन असणार. आपल्या आईच्या आठवणी मुलांना सांगत रहा, किंवा तिच्या काही सवयी असतील तर तुम्ही लावुन घेऊ शकता, पोरकेपणा काही अंशाने कमी होण्यास मदत होईल ही आशा.

अंगणात गमले मजला संपले बालपण माझे... खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता.

धन्यवाद तुम्हा सर्वांचे. खूप दिवसांनी लिहिलं , मन मोकळं केलं. बरं वाटलं. तुमच्या सह-अनुभूती साठी, प्रतिसादासाठी आभार