Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आवडलं... शेवटचा पंच सुंदर! कधी व्यक्ती बदलतात, कधि परिस्थिती, कधी दोन्ही! वागण्या बोलण्याचे संदर्भ बदलतात, क्षितिजेही बदलतात. नाही म्हटलं, तरी.. 'त्रास होतोच'! अवांतरः ह्याची दुसरी (किंवा दुखरी) बाजू येणार का? ;)

दुसरी बाजू म्हणजे त्या मित्राची का... नाही नाही, तसा काही विचार नाही. खरे तर हा जुना लेख, म्हणजे माझे बहुधा दुसरेच लिखाण असावे. परवा नजर पडली तर स्वतालाच पुन्हा वाचून बरे वाटले. पण सुरुवातीच्या काळातला असल्याने शैली कच्ची होती, शुद्धलेखनाच्या ढिगभर चुका होत्या, त्या ठिकठाक करून प्रकाशित केला.. :) प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

लेख आवडला. तोडलंस मित्रा! काही आठवणी खर्‍या आहेत शंबर सुभाशितं,जुगार वगैरे :) पण एकंदर लेखाचा सारांश कळल्यावर वाटलं, होतं असं कधी कधी. माझा एक भ्रम होता. मला वाटायचं दोन मित्रांची मैत्री कायम टिकते आणि दोन मैत्रिणींची काही काळ. पण तो शेवटी भ्रमच होता. वास्तवात मला उलटचं दिसलं.

सुंदर आहे कथा. पण इतकी गाढी मैत्री अशी, कांही कारणं न देता, कशी तुटते? त्या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न का केला नाही? मित्राच्या मृत्यूच्या बातमीपेक्षा, मैत्रीचा मृत्यू अधिक क्लेशकारक असतो.

खाली पैसा उर्फ ज्योती ताई यांचा रिप्लायच माझा रिप्लाय समजा, अन मित्र दुरावण्याचे कारण शोधले नाही तरी साधारण असेच असू शकते.. नुसती आजूबाजुची परिस्थितीच नाही तर व्यक्तीमत्वेही बदलतात.. कॉलेजजीवनातील मैत्रीत सहसा असा अनुभव येत नाही पण शालेय जीवनातील मैत्रीत येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण बरेच बदल घडतात.. हे मी माझ्या कोणा मित्राला नजरेसमोर ठेऊन नाही लिहिले वा शालेय मैत्रीला कमी लेखायला नाही लिहिले तर हे असे होऊ शकते असे माझ्या ध्यानात आले तेच कथेतून इतरांशी शेअर केले.. आता यातून सकारात्मक बोध घेणेच चांगले नाही का.. :)

मुलांचीच नव्हे तर मुलींचीही मैत्री संपते. तुटत असेलही पण लग्न होऊन सासरी गेल्या की सगळं बदलतं. पुन्हा निमित्ताने, अचानक भेट झाली तर काय बोलावे हा प्रश्न असतो. आधी अगदी अपराधी वाटायचे नंतर मात्र हे असेच असल्याचे जाणवले.

आवडलं. जगात कित्येक गोष्टींना असं का याचं उत्तर नसतं. ही त्यातलीच एक. लहान असतानाचं ते जग नंतर रहात नाही. तिथे अशा मैत्रीला नेमकी कुठे जागा द्यावी हे कळत नाही. त्यामुळे जुने शाळूसोबती मित्र प्रत्यक्ष आयुष्यात परत येऊन त्या दोन मित्रांच्यामधे पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स अशा गोष्टी येण्यापेक्षा अशी मैत्री एक आठवण म्हणून राहणेच जास्त श्रेयस्कर असावे.

त्या दोन मित्रांच्यामधे पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स अशा गोष्टी येण्यापेक्षा ....
गाढी मैत्री, खरी मैत्री (जी कथेत वर्णीली आहे) त्यात वरील प्रश्न कधी उद्भवत नाहीत. निदान पहिल्या भेटीत तरी नाहीच नाही. तसे उद्भवत असतील तर गाढी मैत्री, खरी मैत्री हे आपले त्या काळचे भ्रम होते किंवा वरवरच्या नात्याला दिलेले एक चुकीचे 'लेबल' होते असे कबूल केले पाहीजे. १४ वर्षांचा काळ म्हणजे कांही फार मोठा काळ नाही. ४० वर्षांनंतर आम्ही ६९ च्या S.S.C.(त्या काळची ११वी) बॅचचे १८ वर्गमित्र, (गाढी आणि खरी मैत्रीवाले १-२च) एकत्र आलो पण आम्हाला असा कुठला दूजाभाव मनांत आला असे जाणवले नाही. त्या नंतर दरवर्षी (मी रजेवर जातो तेंव्हा) मित्राच्या घरी किंवा त्याच्या फार्म हाऊसवर भेटत असतो. वर्गमैत्रीणीही असतात. कधी त्यांची मुले असतात (तीशीत पोहोचलेली), नवरे नसतात (ते एक बरे आहे). खाणे, 'पिणे', गप्पागोष्टी, हास्यविनोद, जुन्या शाळेच्या शिक्षकांच्या आठवणी असे अनेक विषय असतात. कधी कुठे कोणाच्या वागण्या बोलण्यात पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स वगैरे येत नाही. हास्यविनोदांबरोबर तब्येतीच्या तक्रारींवर चर्चा होतात. कोणाला रक्तदाब, कोणाला मधूमेह, कोणाला मज्जारज्जूची समस्या तर कोणाला व्हर्टिगो अशा चर्चा होतात. एकमेकांना प्रेमळ, कळकळीचे सल्ले दिले जातात. दर भेटीत कोणीतरी मला वजन कमी करण्याचे महत्त्व पटवून देत असतोच. दिवसाचे ५-७ तास एकत्र घालवून हसत खेळत आम्ही पुन्हा कधी भेटायचे ह्यावर चर्चा करून आपापल्या घरी जातो. जीथे, पैसे, जागा, कुटुंब, नोकरीतल्या पोझिशन्स हे विचार मनांत येतात तिथे मैत्री वास करीत नाही. कृष्ण-सुदाम्याची मैत्री हे टोकाचे उदाहरण वाटले तरी आदर्श आहे, ह्या बाबत दुमत नसावे.

कृष्ण सुदामा नक्कीच आदर्श मैत्रीचे उदाहरण आहे आणि म्हणूनच ते पुराणात आहे. पण एखादा दिवस सुदामा आला तर कृष्णाने त्याचे आदरातिथ्य केले पण पुढे काय? पुढे कृष्णपुराणातून तो सुदामा गायबलाच. तसेच त्याला कृष्णाने श्रीमंती अन वैभव दिले असेही कथेत आहे, गरीब म्हणूनच राहिला असता एखादा मित्र तर कृष्णाला चालले नसते का? हलकेच घ्या हा हे सारे मुद्दे, निव्वळ वादाला वाद म्हणून लिहिलेय. :) असो, आपण जी वर स्वताची उदाहरणे दिलीत तशीच उदाहरणे देवाच्या कृपेने माझ्याही गाठीशी आहेत. शाळेचे बरेच मित्र फेसबूकात असले तरी खास संपर्कात असणारे दोनच मित्र आहेत... मात्र डिप्लोमा डिग्रीचा वीजेटीआयचा आमचा भलामोठा ग्रूप अजूनही जसाच्या तसा आहे... पहिल्या नोकरीचा चौघांचा ग्रूप ही तसाच, अजूनही आम्ही ठरवून भेटतो. दुसर्‍या जॉबला एकच खास मित्र होता, पुढे आमच्या कामाच्या जागा बदलल्या, पण माझ्या लग्नाच्या वेळी तो दिल्लीवरून दोन-तीन दिवस सुट्टी टाकून आला, त्याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी माझे एक छोटेसे ऑपरेशन निघाल्याने मला त्याच्या गावी केरळाला जाता आले नाही.... हल्ली ऑर्कुट आटपले मात्र पाच-सहा वर्षांपूर्वी ऑर्कुटच्या माध्यमातूनच भेटलेल्या मित्रांशी अजूनही भेटीगाठी होतात.... चाळ सुटली, मित्र इथे तिथे पांगलेत पण अजूनही ठरवून ट्रिपा निघतात, पार्ट्या साजर्‍या होतात.. तर असेही अनुभव आहेत अन तसेही अनुभव आहेत.. एखाद्या मैत्रीचे आयुष्य असते तेवढेच, किंवा ती त्या एखाद्या वयात अन एखाद्या परीस्थितीच उमलते, बहरते अन नंतर आयुष्यातून निघून जाते. म्हणून ती गाढी नव्हती असे म्हणने नाही पटत.. खास करून शाळेच्या लहान वयातील मैत्री..

कडाक्याचं भांडण होऊन संपलेली मैत्री कायम परवडली .आठवण आल्यावर कमीत कमीत रागात चार शिव्या तरी घालता येतात पण हे . काहीच न बोलता थोडं थोडं संपत जाणं . लई त्रास होतो डोक्याला .दर वेळी वाटतं . . कि नाही . सगळं होईल पूर्वी सारखं . पण . . असो . कथा / अनुभव आवडेश . . :)

आम्ही चार मित्र,रहायला देखिल चौघांचे बंगले एका चौकोनात चार कोपर्‍यावर्,मी वैद्यकीय व्यवसायात्,दुसरा डॉक्टरच पन पेट्रोल पंपवाला,तिसरा आयटीवाला आनी चौथा सगळ्यात मोठा डाकु लॅण्ड डेव्हलपर पण मैत्रीत कधीच एकमेकांचा व्यवसाय काय आहे याचा विचार केला जात नाही.जो कोनी अडचणीत असेल त्याला इतर तिघे सांभाळातात्,एकाच्या घरात कार्यक्रम असेल तर बाकीचे सगळा कार्यक्रम पार पडेपर्यंत राबत असतात.एकवेळ जवळचे नातेवाइक नाही करणार पन आम्ही चौघे एकमेकांच्या प्रचंड जवळ असतो. आणी यासगळ्यात पैसा, पद, प्रतिष्ठा या सगळ्यांना कुठेच जागा नसते,उलट जो कमी पडेल त्याला योग्य ती मदत न मागता पुरवली जाते. भांडण होत नाही असे नाही पन ते कधीच ताणल जात नाही.म्हणुन म्हणतो मैत्रीत वयक्तीक अंहकार बाजुला ठेवला तर ती मैत्री कधीच संपत नाही...

काय लिहिलय! अगदी स्वतः बाबतीत असाव अस वाटल. शाळेतल्या भाबड्या वयात जुळणारे विश्व असच कायम खुणावत रहात. काहीजण त्यातच रहातात तर काहीजणांना तिकडे फिरकुन पहायचही धाडस होत नाही, तर काहीजणांच्या लेखी ते कुठच अस्तीत्वात नसत. चालायचच.

माझी 'मैय्या' मला म्हणते "आपलं आयुष्य हे एका 'पझल'सारखं आहे...तुकड्या-तुकड्यात जोडलेलं. कुठल्याही एका तुकड्याशिवाय ही 'पझल' पुर्ण होत नाही." तो मित्रही आयुष्यात त्यातल्या एका तुकड्याप्रमाणे आला होता असं मनाला समजवायचं. बाकी मित्रा तुझं लेखन फारच अप्रतिम असतं.

आपलं आयुष्य हे एका 'पझल'सारखं आहे...तुकड्या-तुकड्यात जोडलेलं. कुठल्याही एका तुकड्याशिवाय ही 'पझल' पुर्ण होत नाही.
खरंय. आणि कोणताही एक तुकडा म्हणजे आयुष्य असं होत नाही.