Welcome to misalpav.com
लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नरेंद्र मोदी - अनेक वर्षे राष्ट्रीय राजकारणात होते. पण गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासून खर्‍या अर्थाने चर्चेत आले. विकासपुरुष म्हणून प्रतिमा आहे. देशात सर्वत्र अत्यंत लोकप्रिय. देशाचे नेते झाले तर अपेक्षांचे ओझे प्रचंड असेल.
२००२ चे गुजरात चे दन्गे, हसरत जहाँ, आणि जातियवादी, आणि ते कधीच पंतप्रधान होणार नाहीत असा तळतळाट केला नसल्यामुळे लेखक/खिका हे जातीयवादी आहेत आणि सेकुलर नाहीत हे सिदध होते आहे. संपादकानी अशा धाग्यावर (जिथे एवढ्या मोठ्या चर्चेत साधा सेकुलर हा शब्द पण नाही म्हणून समज द्यावी. :):):):):

खरे आहे! :) आजकाल अनेकांना काय झाले आहे ते समजत नाही... आता प्रितिश नंदींसारखे पत्रकारच बघाना काय म्हणतात ते!

जर कॉन्ग्रेस आली तर सुशीलकुमार शिन्दे... अनेक गणितं आहेत त्यामागे. सगळ्यात मोठे गणीत हे की ते मनमोहन सिन्ग यांचा मौन आणि आज्ञापालन वारसा चालवु शकतात. ते ही फक्त हास्य देवुन. :)

काँग्रेसचाच पंत प्रधान होणार असे मतांचे गणित पुढच्या निवडणुकी नंतर झाले तर पी. चिदम्बरन यांचे नाव वरील यादीत असावे लागेल. हुशार आणि अनुभवी मुत्सद्दी म्हणून त्यांचा लौकिक आहे . ते मुखदुर्बळ नाहीत. राहुल गांधींची हे पद स्वीकारण्याची हिम्मत होईल असे त्यांच्या आजवरच्या वागण्यावरून वाटत नाही. शिवाय त्यांनी पंतप्रधान बनण्याच्या बाबत काही तांत्रिक अथवा कायदेशीर अडचणी आहेत असे सुब्रमनियम स्वामी म्हणतात.

सध्याच्या परिस्थितीत तरि कॉन्ग्रेस परत सत्तेवर येइल अशी चिन्हे आहेत. डॉ. मनमोहन सिंग परत पंतप्रधान होतील अशी चिन्हे दिसत असली तरी पॄथ्वीराज चव्हाण होण्याची शक्यता सुशील कुमार पेक्षा जास्ती आहे...

दिग्गीराजांचा समावेश न करण्यामागे आरेसेसचा हात असण्याची अतिदाट शक्यता आहे.
अजून लॉजिकः हात (पंजा) ही काँग्रेसची निशाणी.. याचा अर्थ आर एस एस चा हात आहे तर काँग्रेसनेच असे घडवून आणले आणि आर एस एस ही काँग्रेसचीच संघटना आहे असा होऊ शकतो का? ;)

माझ्या नातवाच्या वयाची मुले मला डॉगविजय,पिग्विजय म्हणतात तरी मी त्यांच्या विचारांचा आदर करतो असे दिग्गीराजा म्हणाल्याने आदर दुन्नाव्ल्ला आणि ड्वोले पानाव्वले

गेल्या निवडणुकीत,आयोगाने घालून दिलेल्या बंधनाच्या पेक्षा कैक पटीने अधिक खर्च केल्याची कबुली दिल्यांनतर गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा उभे रहायला निवडणूक आयोग परवानगी देईल असे वाटत नाही. त्यामुळे जोगांच्या यादीतील हे नाव बाद करावे लागेल.

त्यांना स्वतःलाही आश्चर्य वाटेल, या यादीत स्वतःचे नाव बघून.

आज देशासमोर अनेक प्रश्न आहेत. आसाममधे बांगलादेशी लोकसंख्या वाढत आहे. यातले काही लोक मतदानाचा अधिकार मिळवून आसाम विधानसभेतही पोचले आहेत. याउलट काश्मीरमधे फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून आलेले अनेक हिंदू जीव असे आहेत ज्यांना अजून भारताचे नागरीकत्त्व मिळालेले नाही. स्वातंत्र्यानंतर तीन पिढ्या झाल्या पण हा प्रश्न सुटलेला नाही. १९८९ मधे काश्मीरमधून हिंदूना हाकलून देण्यात आले. त्या हिंदूंना त्यांचे काश्मीरातील घर परत मिळवून देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसत नाही. चीन आमच्या देशाच्या सीमा पार करून आत घुसतो आहे. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत. या सगळ्या प्रश्नांचे गांभीर्य असणारा नेता हवा आहे.