@ मनिम्याऊ:
......पटत नाहीयं...
खरे आहे. लहानपणापासूनच आपण पांडवांचे उदात्तीकरण करणार्या कथा वाचत आलेलो असतो. माझेही तसेच झाले, परंतु महाभारत वाचताना काही प्रश्न पडतात. यादव एकमेकात मारामार्या करून अगदी सगळे कसे मृत्युमुखी पडले असतील? अर्जुनाला सुभद्रा आवडली, तेवढ्यावरूनच श्रीकृष्णाने तिला पळवून न्यायला अर्जुनाला सांगितले? अर्जुन एवढा महापराक्रमी धनुर्धर, मग त्याला रानटी अभीरांनी कसेकाय पराभूत केले? त्याकाळी अनेक दासी,दासीपुत्र वगैरे असत, ते कुठून येत? द्वारका समुद्रात कशी बुडाली? श्रीकृष्णाने पांडवांचा, तर इतर यादवांनी दुर्योधनाचा पक्ष घेण्यामागे काय कारण असावे? दुर्योधनाकडे जास्त राजे का गेले? .... वगैरे. या आणि अश्या प्रश्नांची उत्तरे महाभारताकडे एका वेगळ्या नजरेतून बघण्यात मिळवण्याचा हा एक प्रयत्न आहे. अर्थातच हा कल्पनाविलास आहे. व्यास, वैशंपायन आणि सौतीच्या महाभारतात याचे संदर्भ वा स्पष्टीकरण मिळणार नाही. पूर्वग्रह बाजूला ठेऊन वाचण्यात एक वेगळा वाचनानुभव मिळेल, अशी आशा आहे.
सुभद्रेचं मन अर्जुनावर जडलंय आणि अर्जुनालाही सुभद्रा पसंत आहे हे कृष्णाला माहित होतं. बलरामांच्या मनात स्वतःचा शिष्य दुर्योधनाशी सुभद्रेचं लग्न लावून देण्याचं होतं. त्यावर उपाय म्हणून तातडीनं काही करण्यायोग्य, असा हा उपाय अनायास उपलब्ध होता. सरळ सांगूनही बलराम ऐकतीलच असं नाही ह्याची कल्पना असलशिष्य, कृष्णानं अर्जुनास सुभद्रेला पळवून नेऊन गांधर्व विवाह करायचा सल्ला दिलेला असावा.
यादवांचा अधःपात हे समाज उन्नतीच्या शिखरावर असतांना तारतम्य न बाळगता वागला तर काय होतं ह्याचं प्रतीक आहे. सर्व सुखं पायाशी लोळतांना आणि संपत्तीचा गर्व असतांना त्यांना पुढचा मार्ग दाखवणारा कृष्ण नसला तरी चालला असता. तेच शेवटी झालं. उद्वेग आणि खिन्नता यातून बलरामांनी प्रायोपवेशनानं देह सोडला. त्याचा संताप येऊन उरल्यासुरल्या भांडणार्या यादवांना कृष्णानं स्वतः मारून टाकलं. जेव्हा अर्जुन द्वारकेला पोहोचला तेव्हा कृष्णाचं आधीच निर्वाण झालेलं होतं. अर्जुन द्वारकेला पोहोचल्यावर वसुदेव आणि देवकी यांनीही देह सोडला. त्यांचं सर्व और्ध्वदेहिक करून मग उरलेल्या सगळ्यांसोबत अर्जुन निघाला.
अक्षय भाता आणि गांडीव यांचं प्रयोजन संपलेलं असूनही अर्जुन स्वतःचा अभिमान कुरवाळत राहिला.. त्या गर्वाचा या परतीच्या प्रवासात पुरता बिमोड झाला. त्याच्या समोर कित्येक लोक मारल्या गेले.. कित्येक लुटल्या गेले.. कसाबसा गांडीव वाचवून काही उरलेल्या लोकांसह आणि सामानासह अर्जुन हस्तिनापुरास पोहोचला. तो कुठे पकडला गेला असं मात्र कुठं माझ्या वाचनात आलं नाही.
यानंतर लवकरच सर्व पांडव द्रौपदीसह वानप्रस्थाला निघाले, बहुदा व्यासांच्या सांगण्यावरून. तेव्हा एका सरोवरात सर्व पांडवांनी आपापली शस्त्रं शिरवली. तेव्हाही अर्जुन गांडीवाला अंतर द्यायला तयार नव्हता, पण शेवटी युधिष्ठिराच्या उपदेशानुसार त्यानं त्याचा त्याग केला. यानंतर सर्व पांडव आणि द्रौपदी स्वर्गारोहिणी मार्गावर निघाले.
माझ्या वाचनांत इतकीच माहिती आहे. थोडं आणिक विस्तृत असेल पण गाभा असाच.
अभीरांचा इतिहास माहित नाही मला. त्यामुळे त्याबद्दल काही लिहिणे योग्य नाही. पण अभिमन्यू या नावाची उत्पत्ती मात्र आत्ता वाचनात आली.
मला असलेले काही प्रश्न यात असे -
या सर्व यादवीच्या प्रकारात वा नंतरही, उद्धव कुठे होते? उद्धवगीता म्हणतात ती केव्हा सांगीतली गेली? कृष्ण - बलरामांचं और्ध्वदेहिक उद्धवानं केलं की वसुदेवानं की अर्जुनानं?
चित्रे नेहमीप्रमाणेच उत्तम. महाभारताने अनेकाना अनेक विषयांवर लिहायला लावले आहे. त्यातील पात्रे घेऊन नव्याने रचलेली गोष्ट आवडली. पुढचा भाग लवकर येऊ द्या.
हे मुळ महाभारतात असेल असं वाटत नाही.
"महाभारताचे" नांव वापरुन आम्हा वाचकांची फसवणूक करण्यात आली आहे. व्यास आता वाद घालायला येणार नाहीत म्हणून त्यांच्या सोन्याच्या मंदीराला हा वीटा लावण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
"महाभारताचे" नांव वापरुन आम्हा वाचकांची फसवणूक करण्यात आली आहे. व्यास आता वाद घालायला येणार नाहीत म्हणून त्यांच्या सोन्याच्या मंदीराला हा वीटा लावण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.
ह्या कमेंटीबद्दलही काही लिहा की.
आपल्या सोयीचे तेव्हढे उचलून गैरसोयीच्या मुद्द्यांना फाटयावर मारण्याची कला आपण कुठून अवगत केली आहे हे आम्हांस चांगले ठाऊक आहे. ;)
@ धन्या:
...हे मुळ महाभारतात असेल असं वाटत नाही...
असे मी म्हणतच नाहिये, हा सर्व कल्पनाविलासच आहे.
शिवाय "मूळ" महाभारतात काय आहे अन काय नाही, ते मुळात किती मोठे होते, याविषयी तर जुन्या काळापासून अनेकांनी आपापले तर्क लढवलेले आहेत. एकंदरित महाभारतातील पात्रे आणि एकूण कथानक एवढे विशाल आहे, की त्यात अनंत काळपर्यंतचे लेखक, कवी, चित्रकार, सिनेमावाले यांना आपापल्या परीने काहीतरी काढ-घाल, निर्मिती करता येईल.
बारकाईने बघणार्याला या 'सोन्याच्या' मंदिरातही अनेक चोरवाटा, गुप्त भुयारे, गूढ-अंधारी तळघरे इ. दिसून येतात. त्यातून मुशाफिरी करण्यातील आनंद पण काही और आहे.
शिवाय "मूळ" महाभारतात काय आहे अन काय नाही, ते मुळात किती मोठे होते, याविषयी तर जुन्या काळापासून अनेकांनी आपापले तर्क लढवलेले आहेत. एकंदरित महाभारतातील पात्रे आणि एकूण कथानक एवढे विशाल आहे, की त्यात अनंत काळपर्यंतचे लेखक, कवी, चित्रकार, सिनेमावाले यांना आपापल्या परीने काहीतरी काढ-घाल, निर्मिती करता येईल.
बारकाईने बघणार्याला या 'सोन्याच्या' मंदिरातही अनेक चोरवाटा, गुप्त भुयारे, गूढ-अंधारी तळघरे इ. दिसून येतात. त्यातून मुशाफिरी करण्यातील आनंद पण काही और आहे.
नुकतंच आनंद जातेगांवकरांचं "व्यासांचा वारसा" म्हणून महाभारताचं एका वेगळ्या कोनातून दर्शन घडवणारं नितांत सुंदर पुस्तक वाचलं.
महाभारताबद्दल ओढा असणार्या प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक आहे.
चित्रगुप्त, सांप्रत धागाकर्ते यांची ओळख माधुरी दिक्षित यांच्या वर केलेल्या काव्याने झाली. यांचे काही जुने धागे वाचले, प्रतिसादले. चांगले मनोरंजक लिहीतात.
प्रथमदर्शनी शिर्षक खुपच भारी वाटले. कदाचित दोन महान संस्कृती मधे काही साम्य,दुवा शोधण्याचा प्रयत्न असेल असे वाटले व कुतूहल वाढले. माझ्या माहितीनुसार,
स्पार्टाची राणी हेलन व सुभद्रा या दोघी घरच्यांच्या मनाविरुद्ध आपल्या प्रियकरा बरोबर पळून गेल्या होत्या.
या दोन्ही महान संस्कृती झालेल्या भयंकर महायुद्धा मुळे रसातळाला गेल्या,
अवास्तव पुत्रमोह हे दोन्हीही महायुद्धाचे मुख्य कारण ठरले असे मानण्यास भरपुर वाव आहे.
दोन्ही महायुद्धामुळे वर्णसंकर होऊन नवीन संस्कृती निर्माण झाली असेही म्हणू शकतो.दोन्ही
महायुद्धाच्या मागे दैवी शक्तीचा हात होता असेही वाटते.
असे जरी असले मुख्य फरक ,हेलन मुळे महायुद्ध झाले पण सुभद्रा महाभारतातील युद्धाला कारणीभूत नव्हती.
धागाकर्त्यांनी स्वतःच कबूल केले की हा केवळ कल्पना विलास आहे.
अभीरमन्यू बद्दल कधीच वाचले नव्हते. पण अभीर ही एक यदुवंशी क्षत्रिय जमात असल्याचे माहीत होते. अभीर हे सुद्धा गोपालक सर्वत्र पसरलेले व वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात.
हरियाणा-अहीर,महाराष्ट्र-गवळी उत्तर भारत-गोप, ग्वाला गुजरात,दक्षिण भारत - आयर, गौल्ला,कोनार (कोणार) बुंदेलखंड- दाऊ (दौवा)
अभीरांनी सातवाहन राज्याचा काही भाग जिंकला व नाशिक जवळच आपले राज्य स्थापले.
अभीरमन्यू उवाच,
माझी प्रिय सुभद्रा. माझी बालसखी. मी तिच्याशी लग्न लावण्याची, आणि मग त्या आधारे सर्व अभीरांची यादवांच्या दास्यातून सुटका करण्याची स्वप्ने बघत होतो.… अर्थात सुभद्रेला याची काहीच कल्पना नव्हती,अभीरमन्यू हा बलरामाचा अश्रीत, त्याने सुभद्रे बरोबर विवाहाची स्वप्न म्हणजे फक्त स्वप्न रंजनच म्हणावे लागेल. हे म्हणजे मुक्कदर का सिकंदर मधल्या बच्चन आणी राखी च्या प्रेमा सारखेच वाटते.
महाभारत या महाकाव्यात एक सुसूत्रता आहे. प्रत्येक घडामोडीला मागील संदर्भ आहे. जसे यादवांना दुर्वास ऋषीचा शाप.
द्वारकेत यादव उन्मत्त झाले होते. यातूनच यादवी माजणे हा वाक्प्रचार आला असावा.
महाभारत या महाकाव्यात एक सुसूत्रता आहे. प्रत्येक घडामोडीला मागील संदर्भ आहे. कल्पनाविलास करणे म्हणजे वडाची साल पिपंळाला लावणे असे वाटते.
मनोरंजन म्हणून लेख चांगला आहे पण अतिरंजित वाटतो.
चित्रे खुपच छान आहेत.
कल्पना आणी विलास यांच्या मिलनातून होणाऱ्या सृजनाला अंत नाही त्यामुळे प्रथमदर्शनी चांगले वाटले.
असाच एक कल्पनाविलास १९९७ मधे ललित बहल यांनी दूरदर्शनवर वेद व्यास के पोते या नावाने प्रसारीत केला होता.
प्रतिक्रिया
पटत नाहीयं...
एक वेगळा प्रयत्न
सुभद्रेचं मन अर्जुनावर जडलंय
स्टोरी इंटरेस्टींग वाटते आहे.
गोष्ट आवडली
मस्त
द्रौपदी
व्यासोच्छिष्टं जगत सर्वं
उत्कंठा
उत्कंठा
हे मुळ महाभारतात असेल असं
चित्रगुप्तांनी अगोदरच
आमच्या
महाभारतातील गुप्त भुयारे, गूढ-अंधारी तळघरे इ.
येस...
कल्पनाविलास आवडला
लिखाण आणि लेखनशैली बेहद्द
वेगळ्या दृष्टीकोनातून
चित्रगुप्त, सांप्रत धागाकर्ते