Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

संमत कायद्याच्या कलमांनी गेल्या काही दिवसात किती दोषी लोकांना पकडून या कलमांद्वारे कारवाई झाली? जाहिराती पोलिसांच्या तत्परतेचे अभिनंदन...

मध्यंतरी http://www.7witches.com वर लोकांनी खटले भरले होते असं वाचनात आलं होतं. कारण त्यांनी स्पेल कास्ट करायला (ज्याद्वारे संपत्ती मिळेल, हरवलेले मुल सापडेल वगैरे वगैरे वगैरे कारणांसाठी) पैसे क्रेडीटकार्डद्वारे ऑनलाइन भरले होते व त्याचा उपयोग न झाल्यावर पुन्हा अजुन स्ट्राँग स्पेल कास्ट करायला जास्त पैसे दिले पण यश मिळाले नाही. अन हा सर्व व्यवहार अर्थातच कागदोपत्रि सिध्द झाला होता, जादुटोणा कायदा आहे कि नाही माहित नाही पण ग्राहकसंरक्षण कायद्याचा उपयोग केला गेला होता.

आज दोन महिने झाले तरी सरकारने एकही केस या कलमांखाली कोर्टात खेचली गेल्याचे वाचनात नाही. ज्या त्वरेने काही तरी करून दाखवायचे म्हणून हे बिल मांडून तात्पुरते उगी उगी केले जात आहे त्यावरून हे बिल बार बालांच्या बिलाच्या वाटेवर तर नाही ना असा संशय घेता येऊ शकतो. नजर भोंदू बाबांवर

आज दोन महिने झाले तरी सरकारने एकही केस या कलमांखाली कोर्टात खेचली गेल्याचे वाचनात नाही. >>> प्रॉब्लेम काय आहे ? समजा दोन महिने बलात्काराची एकही केस त्या कायद्याखाली कोर्टात खेचली गेली नाही तर तुम्हाला वाईट वाटेल कि आनंद होईल ? का बलात्काराची केस कोर्टात येत नाही म्हणून कायदाच नको म्हणायचंय ? तुमचं लॉजिक ऐकायचं म्हणलं तर हरेक कायद्याच्या उपयुक्ततेसाठी माणसं " कामाला" लावायला लागतील. तुमचा आणि अंनिसचा ३६ चा आकडा आहे भौतेक. त्यांना श्रेय मिळतेय याचा पोटशूळ दिसून आला.

यासाठी अनेक लोक समर्थ आहेत. माझ्यापर्यंत पाळी येईल असे वाटत नाही.

हा हा हा नेमके =)) नाडीधंद्यावर अशी केस खरेच कोणी टाकली तर लै मजा येईल. नाडीवाल्यांचं पितळ आपलं नाडी उघडी पडेल.

कायद्यात त्रूटी असणे , मुद्दाम ठेवणे, कायद्याला धाब्यावर बसविणे या गोष्टी वाईटच पण त्या कायदाच अस्तित्वात नसण्यापेक्षा नक्कीच चांगल्या असतात.