"दुसरीकडे देशाचे कृषिमंत्री मा. पवार साहेब म्हणतात कि, अश्या गोष्टीने (अंधश्रद्धेला) बुवाबाजीला खतपाणी मिळेल आणि अश्या गोष्टी घडता कामा नये."
ह्यांचा काय संबंध?
ह्यांचा काय संबंध?
हे सांगण्याचं तात्पर्य इतकंच होतं कि, एकाच खात्याचे मंत्री (राज्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री) असूनही त्यांच्या भूमिकेत किती विरोधाभास आहे त्यांचा दोघांचा प्रत्यक्ष त्या खात्याचे काम करत असताना एकमेकांशी किती समन्वय ? (co-ordination) असेल. यावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांची भूमिका एकच असेल का ? याविषयी मन सांशक होतंय हे सांगण्याचा प्रयत्न होता ! (आदरणीय मा. पवार साहेबांनी या सोने शोधण्याच्या मोहिमेला केलेला विरोध म्हणजे त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतेय या प्रकरणामध्ये त्यांनी बुवा बाजी ला विरोध केलेला दिसतोय आहे )
(आदरणीय मा. पवार साहेबांनी या सोने शोधण्याच्या मोहिमेला केलेला विरोध म्हणजे त्यांचे पुरोगामीत्व सिद्ध करतेय या प्रकरणामध्ये त्यांनी बुवा बाजी ला विरोध केलेला दिसतोय आहे )
का कुणास ठावुक पण मला "सिंहासन" मधला निळू फुले म्हणजे मीच असे वाटायला लागले आहे.
तुमचा मुद्दा बरोबर आहे साजिद , नुसते शेती खातेच नव्हे ,तर एकूणच सध्याच्या केन्द्रीय आणी राज्य मन्त्रिमण्ड्ळातील मन्त्र्यान्च्या वागण्या आणि बोलण्यातील ''समन्वय'' शोधुनही सापडणार नाही. राश्त्रवादी आणि कोन्ग्रेस यान्चे नाते विळ्या-भोपळ्याचेच आहे, पण तुम्ही आम्ही भाउ -दोघे मिळून खाउ या नीतीने हे सरकार चालु आहे .
कि काहितरी बनाव रचुन त्या बाबाच्या मागे उत्तर प्रदेशचे जनमत उभे करायचे व त्याच्या तोंडुन सत्ताधारी पक्षाला अनुकूल वक्तव्य वदवुन घ्यायचे असा काहितरी राजकारणी डाव असेल. पण अजुन तरी तसं काहि झालं नाहि.
अवांतरः इंग्रजांनी कितीही लुटालूट केली तरी असे भूमीखालचे, तळघरातले वगैरे सगळंच गुप्तधन त्यांना ठाऊक असायची शक्यता नव्हती. तेंव्हा असे गुप्तधन भारतात अनेक ठिकाणी अजुनही सापडु शकते.
जयपूर जवळ आमेरचा किल्ला आहे, त्याच्या अगदी वरती डोंगरावर 'जयगढ' हा किल्ला आहे. इंदिरा गांधींनी पुढाकार घेऊन खुद्द भारतीय पुरातत्व खात्यातर्फे इथे प्राचीन खजिना खोदून काढण्याची मोठी मोहीम चालवली होती. हा संपूर्ण भाग त्याकाळी कडेकोट बंदोबस्तात असून अन्य कुणालाही तिकडे जाण्याची बंदी होती. या प्रकल्पातील एक उच्च अधिकारी माझ्या परिचयाचे होते. काही महिने झाल्यानंतर तिथे काहीही मिळले नाही असे सरकारी पातळीवर घोषित करण्यात आले.
याबद्दल वस्तुस्थिती काय होती, हे माझ्या त्या परिचितांनी सांगितले नाही.
प्रतिक्रिया
जावू द्या हो...
बाकी.....
सांगण्याचं तात्पर्य इतकंच....
असेल असेही असेल...
बरोबर
हो ना अगदी अगदी.....
मला सुरुवातीला वाटलं...
जयगढ येथील खजिना
पद्मनाभन येतील सोन्याचे पुढे