कारण आयुर्वेद ही फक्त उपचार पद्धती नसून जीवन पद्धती आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आयुर्वेदिक उपचार सुरू असताना कोणतं अन्न खावं नि कोणतं खाऊ नये, दिवसातून पाणी किती वेळा प्यावं, झोप किती घ्यावी या सगळ्या साध्या उपचारांचा अगदी जवळून अनुभव घेतलाय/घेतोय, त्यामुळेच या वरील वाक्याशी शंभरवेळा सहमत.
लेखन आवडले.
बरेच दिवसांपासून (बहुतेक आमच्या सगळ्यांच्याच मनात ) एक विनंती करायची होती. मिपावरील सगळ्या डॉक्टर्सना. अनाहितामध्ये एका तब्येतविषयक धाग्यात नोकरी आणि घर, यामध्ये जी ओढाताण होते त्यामुळे स्त्रीयांना काही तब्येतीचे प्रश्न उदभवतात, भविष्यात ते विकोपाला जाऊ शकतात असे वाटावे अशी परिस्थिती एकूणच समाजात असल्याचे जाणवले. पौष्टीक आहार, त्यात ऋतुमानानुसार बदल, याबद्दल माहिती व किती ताण घ्यावा किंवा घेऊ नये, व का? हे सांगणारा लेख जर आला तर सगळ्यांना मदत होईल असे वाटते. अगदी वेगळा लेख फक्त त्रीयांच्या दृष्टीकोनातून लिहेणे नाही जमले तरी, डॉ. बाबा पाटील यांन्ची परवानगी असल्यास त्यांच्या लेखमालिकेच्या प्रतिसादातून जरी सांगितले तरी चालेल.
सर्व डॉक्टरांना (अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी) अनाहितावर, 'आरोग्य विभाग' उघडून, 'एक डॉक्टर' म्हणून प्रवेश देण्यात यावा असे सुचवितो. इथे सर्व स्त्री सदस्यांना आणि फक्त डॉक्टर पुरुष सदस्यांना प्रवेश असावा. ह्या विभागापलीकडे डॉक्टर सद्स्यांसही प्रवेश नसावा.
परंतु मुख्य फलकावर प्रामाणिक प्रतिसाद देणे, आपल्या समस्या/अनुभव मांडणे मिपाच्या महिला सदस्यांना अवघड वाटेल अशा विचाराने मूळ प्रतिसादातील प्रतिबंधित विभागाची कल्पना मांडली आहे.
तुम्ही म्हणता आहात तेही पटतंय. पण अशा जास्तीतजास्त महिलांनी मिपाचे सदस्यत्व घ्यावे हा एक मार्ग उरतो.
पहिला भाग आवडेश ..
मध्ये सोडु नका हि नम्र विनंती !! ( ते अनाहिता ई. साठी नंतर लिहा हवे तर ;) )
मेडिसीनपेक्षा आहारावर तब्येत अवलंबुन असते यावर ठाम विश्वास असलेला
सहमत. निरोगी राहण्यासाठी तिचा स्वीकार करणे उत्तमच. पण आजार आला तर त्याचे निदान करण्यासाठी निष्णात वैद्याचा अनुभव याहून जास्त काय आहे? आधुनिक अॅलोपाथीमध्ये उपलब्ध असलेल्या असंख्य प्रकारच्या चाचण्या हा प्लस पॉइंट आहे.
मी या विषयातला अंतिम शब्द नाही.आणी फक्त एकाच शास्त्राचा माझा दुराग्रह देखिल नाही. आज पर्यंत जे काही शिकलो आहे (अभ्यास व अनुभवजन्य ) ते सर्वां पर्यंत पोहचवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.तुमच्या शंकांची माझ्या अल्प मतीनुसार योग्य ती उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल.साधारण दिड ते दोन वर्ष ही लेखमाला चालेल असा अंदाज आहे.ज्या दिवशी तुम्हाला कंटाळा येइल त्या दिवशी स्पष्ट सांगा लेखनी बंद करेल.
पुनःएकदा धन्यवाद.
आपला
बाबा पाटील उर्फ डॉ. प्रशांत दौंडकर-पाटील
www.ayurvedandpanchakarma.com
बाबा साहेब,
एक मूळ( फालतू पण असू शकेल) शंका.
आज काल पंचकर्म हा परवलीचा शब्द झाला आहे. तीस एक वर्षा पुर्वी ते फारसे ऐकू येत नसे. (म्हणजे मी माझ्या मित्रांबरोबर पुण्यात ताराचंद मध्ये आयुर्वेदाची अगदी बाळबोध माहिती घेण्यासाठी जात असे तेंव्हा). तेंव्हा पंचकर्म हे किती आवश्यक आणि किती बाजारीकारणाचा रेटा आहे?
तेंव्हा आणि आताच्या आयुर्वेदात इतका जमीन अस्मानाचा फरक झालेला नाही असे मला वाटते
पुढील भागाच्या प्रतीक्षेत. आयुर्वेद किस भानगड का नाम है ते नेमकं जाणून घ्यायची इच्छा फार आहे. पेप्रातले लेख परिभाषेचा मारा करतात त्यामुळे टर्न ऑफ होतं, घंटा कळत नाही.
आयुर्वेदाला चांगले ठरवायवे असल्यास इतर पद्धतींचा पुरस्कार करणार्या लोकांना 'चिखलफेकू' ठरवण्याची गरज आहे का? आयुर्वेदामध्ये अनेक फायदे आहेत आणि त्यांच्यामुळेच ही पद्धत लोकप्रिय राहणार आहे. पण जिथे इतर पद्धतींमधून फायदा होत असेल तिथे तोसुद्धा करून घेणेच हिताचे असते हे सर्वजण जाणतात आणि तो करून घेतात.
आज आपले सरासरी आयुष्यमान वाढलेले आहे ते अॅलोपथीमुळे की आयुर्वेदामुळे की होमिओपाथी, युनानी वगैरेंमुळे?
वाढलेले सरासरी आयुष्यमान (विशेषतः भारतातील) याबद्दल जास्त माहिती देता येईल का? (पूर्वी केंव्हा केंव्हा किती किती होते, जनसंख्येच्या मानाने मृत्युंचे प्रमाण किती होते व आहे, जास्त मृत्यु कोणत्या वयात होत व आता होत आहेत? सरासरी आयुष्य कसे वाढले, वगैरे?)
भारतातील आयुर्मानाबद्दलचा माहिती गेल्या सुमारे पन्नास वर्षांत अत्यंत विश्वसनीयरीत्या नोंदली गेलेली आहे.
या दुव्यावरचं टेबल क्र. १.२५ पहा. १९७१ ते १९९९ या २८ वर्षांत बालमृत्यूंचं प्रमाण सुमारे ६० टक्क्यांनी घटलेलं आहे (वय वर्षं ० ते ४ आणि ५ ते ९). इतरही वयोगटांत नेत्रदीपक सुधारणा आहेत.
जन्माच्या वेळचं अपेक्षित आयुष्य १९६० साली ४२ होतं. ते वाढून आता ६५ च्या आसपास झालेलं आहे.
साहेब, नमस्कार !
असा "प्रथम ग्रासे मक्षिकापात" करण्याने काय साधणार आहे? आयुर्वेद आणि अॅलोपॅथी या एकमेकाच्या विरोधी नसून पूरक आहेत हे मानून अनेक मान्यवर तज्ञ आणि रुग्णालये दोन्हींचा सर्वसमावेशक (होलिस्टिक) उपचारात विचारपूर्वक समावेश करत असतात.
कोणत्याही बाबतीत काही हितसंबद्धी एका बाजूने प्रचार करत दुसर्याची हेटाळणी करतात, तसेच आयुर्वेदाच्या बाबतितही होते. तुम्ही पण तोच प्रकार दुसर्या बाजूने करत आहात (आणि या धाग्यावर तसे करण्यासारखे अजून काही कारण नसताना केवळ पूर्वग्रहदुषित कारणांनी होते आहे) हे तुमच्या ध्यानात यावे यासाठीच हे लिहीले आहे. समजून घ्याल अशी आशा आहे... कारण हा उत्तम विषयावरचा धागा भरकटू नये हीच इच्छा आहे.
राम राम
आम्ही तुमच्याएवढे ४ बुकं शिकलेलो नाही. आजुबाजुला जेव्हा आम्ही आयुर्वेदाबद्दल कुणी काही लिहिलं, बोललं की त्याची कशी शिकलेल्या लोकांकडून खिल्ली उडवली जाते, हिणावले जाते, तुच्छतेने पाहिले जाते ते अगदी जवळून पाहिले आहे. आमचे पहाणे, आकलन, निरिक्षण चू़कीचे असेल तर आम्हाला आनंदच आहे.
मिपावरल्या आमच्या छोट्या कालावधीत आम्ही जे काहि भारतीय ते थिल्लर अशीच भुमिका अनेकांनी घेतलेली पाहिली आहे म्हणून तसे वाक्य लिहिले. चुकीचे असेल तर मोठ्या मनाने माफ करा... पण जर का ते वाक्य बरोबर असेल तर... असो.
माझ्या माहिती प्रमाणे कफ वात पित्त पैकी कोणती प्रकृती आहे, हे त्या व्यक्तीच्या पत्रिकेवरून सांगता येते. मागे मी डॉ. दीपक चोपडा यांच्या पुस्तकात अतिशय तपशीलवार प्रश्नावली दिलेली बघितली आहे, त्या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रकृती ओळखता येते, वगैरे.
माझा आणी ज्योतीष विद्येचा कधीच संबध आला नाही किंवा त्याविषयी काही माहितीही नाही त्यामुळे एथे फक्त आयुर्वेदाची बेसिक माहिती व व्यवहारिक दैंनदिन आयुर्वेद यावरच भर देइल.
उत्तम लेख.
आयुर्वेदाचार्य मिपाकर प्रास यांच्या दोन लेखांची आठवण झाली.
http://misalpav.com/diwali2012/ayurved_way_of_life
http://misalpav.com/node/24007
कोणतेही शास्त्र सर्व रोगांवर पूर्ण आणि हमखास इलाज करू शकत नाही असे माझे मत आहे .
विश्वास उडण्याचे कारण ते शास्त्र जाणणारे हे कबूल करत नाहित ."एवढ्या दिवसांत गुण नाही आल्यास दुसरे उपाय कर " असे सांगत नाहित .
आपणही माझ्यासारखेच भुगतभोगी आहेत असे वाटते, म्हणून मी आपणास काही महत्त्वाची प्रश्न विचारतो.
आपला ह्या विषयावर गहन अभ्यास असावा, असे वाटते.
कृपया आपले शिक्षण चिकित्साविज्ञानाच्या कोणत्या शाळेत/महाविद्यालयात/विद्यापीठात झाले आहे ते कळवावे.
जे हे विधान चिडून केले असले तर
१)आधी शांत होऊन १ ते १०० मनामध्ये मोजून मगच परत एकदा विचार करणे.
२)तोच तोच विचार येत असेल तर परत पायरी (step no.) १ अनुसरावी/follow करावी हि विनंती.
जर आपल्याला काही गहन शंका असतील तर मला व्य नि पाठविणे. मी सर्व शंकांचे निरसन करू शकेन असे वाटते.
आपला मिपास्नेही : आयुर्हीत
आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करताना जाणवते की ज्या सिध्दांतांचा शोध आधुनिकामध्ये काही शेकडो वर्षांपुर्वी लागला त्याच सिध्दांतांचे वर्णन हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदीय ग्रंथात आधीच करून ठेवले आहे. एवढेच नव्हे, तर आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही शरीरघटकांची नावं त्यांच्याच संस्कृत नावाशी बरीच मिळतीजुळती वाटतात.
उदा: स्वेद - sweat
ह्रत् - heart
शिरोब्रह्म - cerebrum
शिरोविलोम - cerebellum
माझ्या अॅलर्जी चा उपचार आयुर्वेदानेच शक्य झाला (पंचकर्म). माझेही डॉक्टर एक पाटील म्हणूनच होते. आणि मला एका अॅलोपॅथीच्या डॉक्टरनीच सांगीतलं होतं की "आल्टर्नेटीव्ह थेरपी" वापरायला. आणि अतिशयच फरक पडला. त्या नंतर माझा आयुर्वेदा वर विश्वास बसला तो अजून ही कायम आहे.
प्रतिक्रिया
कारण आयुर्वेद ही फक्त उपचार
वाचतोय .
मस्त सुरुवात!
लेखन आवडले.
अनाहिता - आरोग्य विभाग.
+ १
त्यापेक्षा इथे मुख्य बोर्
सदस्य व्हा.
+१ टु पैसाताई.
पहिला भाग आवडेश ..
मस्त सुरुवात....
पुभाप्र.
आयुर्वेद एक आदर्श जीवन पद्धती
सर्वांना धन्यवाद...
वाचतोय. पुभाप्र.
बाबा साहेब,
सुबोध सर्,...
पहिल्याच लेखाच्या प्रतिसादात
पु.भा.प्र.
येऊ द्या बाबा.
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
वा वा ! आयुर्वेदावर सुगम पण
एलोपेथीच्या समर्थकांकडून
अॅलोपथीचा दुस्वास का?
सरासरी आयुष्यमान
भारतातील आयुर्मानाबद्दलचा
साहेब, नमस्कार !
राम राम
आयुर्वेद आणि ज्योतिष
आयुर्वेद आणि ज्योतिष
माझा आणी ज्योतीष विद्येचा कधीच संबध आला नाही ....
वाचत आहे
उत्तम लेख.
अभिनंदन.
साधारण दिड ते दोन वर्ष ही
उत्तम होईल ही लेखमाला.
वाचते आहे.
वाचतेय.
कोणतेही शास्त्र सर्व रोगांवर
सर्व रोगांवर पूर्ण आणि हमखास इलाज!
आयुर्वेद आणि आधुनिक
माझ्या अॅलर्जी चा उपचार