Welcome to misalpav.com
लेखक: इंद्रधनुष्य | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मिपावर 'इंद्रधनुष्य' यांचं स्वागत. छोटेखानी असला तरी लेख विचारप्रवर्तक वाटला, विशेषतः चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर आताचे हे धावपळीचे वेगवान जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकू हे अनुभवाचे बोल नवं वर्ष सुरू होता होता विचारांना नवीन दिशा देऊ शकतील. आणखी विस्ताराने असं लिखाण वाचायला आवडेल.

बहुगुणी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आईंना मी मार्गदर्शन करत आहे. बहुधा त्या नेटाने शिकतील. कृपया सांभाळून घ्यावे.

नमस्कार. मिपावर तुमचे स्वागत आहे. अगदी आदर्श आणि संवेदनशील विचार बैठक आपल्या सकारात्मकतेचे फायदे आपल्याला मिळवून देतेच. जगण्यात एक निरंतर शांतता लाभते. 'संयम' हाही असाच एक गुण आहे. स्वतःच्या संतापाला आवर घालणे, शाब्दिक वार टाळणे, प्रसंगी तातडीने प्रतिक्रिया देण्याऐवजी विचार करण्यासाठी थोडा विचार घेऊन संयमित शब्दात आपला मुद्दा मांडणे हेही महत्त्वाचे. वादात जिंकण्यापेक्षा नाते सांभाळणे जास्त महत्त्वाचे. अर्थात हे सोपे नाहीच. असिधाराव्रतच म्हणाना. पण प्रयत्नसाध्य आहे.

अनेकदा बरोबर काय हे माहित असतं, पण मूळ स्वभाव तसं वागू देत नाही. विचार आवडले. मिपावर स्वागत आहे. लिहीत रहा.

इंद्रधनुष्य यांच स्वागत. पहिल्याच लेखात त्यांनी आपले अनुभवसिद्ध विचार सुसंगतपणे चांगले मांडले आहेत. 'मूळ स्वभाव तसं वागू देत नाही' हे पैसा यांचे निरीक्षण किंवा अनुभव हीच यातली ग्यानबाची मेख असते. द्वेष, मत्सर, तिटकारा वगैरे कोणी ठरवून करत नाही आणि तो करता येणारही नाही. या भावना नैसर्गिकपणे मनात उठतात. याच्या मागेसुद्धा निसर्गाची काही रचना असणार. हा माणसाच्या डिफेन्स मेकॅनिझमचा भाग असावा. मूळ स्वभाव तरी मुळात कुठून येतो? त्याला काही कारणे असतात. तेव्हा चोवीस तासातील काही क्षण आपण आत्मपरीक्षणाला देऊ शक्लो तर त्या मूळ स्वभावाला थोडी मुरड घालता येईल. आपले जीवन कही अंशी तरी सुखकर करण्याच्या प्रयत्नामुळे ते आज धावपळीचे वेगवान बनले आहे असे मला वाटते. त्याचा द्वेष, मत्सर, तिटकारा वगैरेशी काही सबंध नसावा.

मुळ स्वभावानुसार नैसर्गिक रित्या चान्गल्या अगर वाइट भावना मनात येतात .हे आपण म्हट्ल्याप्रमाणॅ स्वाभाविकच आहे पण ह्यात चान्गल्या भावना जोपासुनवाइइट भावनाना आपण मुरड घालावि या करीता हा उहापोह.