नुसत्या कल्पनेने कसंतरी होतं.
अवांतरः
सामान्य सैनिकाला एव्हढा खर्च पेलवत नसेल. या सगळ्या ट्रीटमेण्टचा खर्च सरकार करतं काय? टॅक्स भरल्याचा अभिमान वाटावा अशा फार कमि गोष्टी आहेत अदरवाइज ;)
सैनिकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा पुर्ण वैद्यकीय इलाज मोफत होतो. ज्या गोष्टी लष्करी रुग्णालयात होऊ शकत नाहीत त्या गोष्टी जवळच्या सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातून सरकारी खर्चाने करून घेतल्या जातात.यात कर्करोगचा इलाज बायपास ची शल्यक्रिया किंवा मूत्रपींड आरोपण याचा सुद्धा समावेश आहे. अन्यथा एखाद्या सैनिकाचे आई वडील किंवा बायको जर आजारी असेल आणि त्यांचा इलाज नीट होत नसेल तर तो घरापासून दूर त्रयस्थ ठिकाणी आपले काम मन लावून करू शकणार नाही हा त्या मागचा विचार आहे.
:(
मी बर्याचदा विचार करतो, की जे डॉक्टर हार्ट सर्जरी किंवा अजुन कठीण सर्जरी करतात... ते रुग्णाला ऑपरेशनच्या आधी जिवंत पहातात,त्याच्याशी बोलतात...त्याला आधार देतात,अश्यां पैकी असे काही रुग्ण असे असु शकतात की जे ऑपरेशनला दाद न-देता हा इहलोक सोडुन जात असतील. अश्या वेळी डॉक्टर मंडळी त्यांच्या मनाला कसे आवरत असतील ? याचा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर ताण येत असेल का ?
साहेब,
काही वेळा अज्ञानात आनंद असतो. किती वेळा मी सोनोग्राफी किंवा CT स्कॅन करताना असे जाणवले आहे की या माणसाजवळ आता काही महिनेच शिल्लक आहेत.
एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मध्ये काम करीत असताना माझ्या सख्ख्या काकांची बायपास शल्यक्रिया झाली होती. तेंव्हा त्याना शल्यक्रिया गृहात घेऊन जाण्या अगोदर त्यांच्या हृदयाचे काम एकदम मंद झाले आणि त्याना तातडीने शल्यक्रिया गृहात न्यावे लागले मी स्वतः त्या शल्यक्रियेसाठी उपस्थित होतो. पण त्याना आत घेऊन जाताना मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितले की मी शल्यक्रियेला आत येतो आहे तुम्ही काळजी करू नका. पण त्याक्षणी मला असे जाणवले की कदाचित ते यातून उठतील की नाही? आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारता येतील की नाही? आणि मी हात धुवून गाउन घातला आणि आत गेलो. त्याना हार्ट लंग मशिनवर घेईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता कारण कोणत्याही क्षणी त्याना मोठा हृदय विकाराचा झटका येऊ शकला असता.खाली माझी काकू आणि चुलत भाउ आरामात गप्पा मारत बसलेले होते. कारण सुबोध थेट ओप्रेशन थिएटर मध्ये आहे तेंव्हा काळजी नाही. या गोष्टीला आज सात वर्षे पुर्ण झाली आणि देवदयेने त्यांची तब्येत उत्तम आहे. आजही ते चित्र माझ्या डोळ्यापुढे स्पष्ट पणे उभे राहते. ही गोष्ट मी माझ्या वडीलानासुद्धा तीन वर्षानी सांगितली.
डॉक्टर साहेब,
सर्व खरं खरं लिहू नका, ही विनंती.
उद्या आम्ही, रुग्ण म्हणून, ऑपरेशन थिएटरबाहेर असताना आपली ही अवस्था आठवली तर, कदाचित आमचे तकलादू हृदय, डॉक्टरांनी आम्हाला टेबलावर घेण्याअगोदरच बंद पडायचं.
रुग्णाचा डॉक्टरवर, त्याच्या कौशल्यावर अपरंपार विश्वास असतो. तो विश्वासच त्याला कठीण प्रसंगी बळ देत असतो. कांही कांही 'सत्य' ही लपवून ठेवण्यातच रुग्णाचं भलं असतं.
साहेब हेच मी एका लेखात लिहिले होते http://www.misalpav.com/node/24347. पण त्याबद्दल भरपूर लोकानी माझ्यावर राळ उडवली होती तेंव्हा सत्य लपवावे कि सांगावे हे कळेनासेच झाले आहे.
दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. रुग्णाशी खरे बोलावे किंवा नाही हे रुग्णाची मानसिक अवस्था आणि इच्छा पाहून योग्य ते तारतम्य बाळगून ठरवावे असे वाटते.
माझ्या वरील प्रतिसादात मी म्हंटले आहे ते आपल्या केसेसच्या तपशिलांबाबत आहे. इथे त्या केसेस चर्चा करताना तुमच्या दोलायमान अवस्थेचे तपशिल आले तर इथल्या वाचकवर्गावर कधी रुग्ण म्हणून ऑपरेशन थेटरात जाताना 'अरे, मागे डॉ. खरे असं असं म्हणाले होते. माझं काय होणार आहे? हे डॉक्टर माझ्याशी खरं बोलताहेत की खोटं बोलत आहेत?' असा विचार येऊन मानसिक खच्चीकरण होऊ शकेल असे वाटते. त्याचा/तिचा आत्मविश्वास डळमळीत होऊ शकेल.
जर तो/ती मनाने खंबीर असेल आणि त्याने/तिने डॉक्टरांशी चर्चाकरून सत्य जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली तर ती वेगळी गोष्ट आहे. पण डॉक्टरांशी बोलून सत्य परिस्थिती जाणून न घेता स्वतःच्या विचारांमध्येच गुरफटून नकारात्मक विचारांचा स्नो-बॉल झाला तर त्या रुग्णाने अर्धी लढाई आधीच हरलेली असेल.
खुपच छान लिहीलेय.
असाच "त्रास" आम्ही डॉक्टरांना दिला होता. त्याची आठवण झाली.
माझ्या बाबांशी रात्री बोलताना जाणवले की त्यांचे काही शब्द बोबडे येत आहेत. रात्रीचे ११ वाजले होते. आमच्या घराजवळचे क्लिनीक १० ला बंद होते. कधीकधी १०.३० पर्यंत देखील उघडे असते म्हणून रिक्शाने तिथे गेलो. दवाखाना बंद होता. आम्ही परत फिरुन घराकडे जाणार तेवढ्यात डॉक्टर येताना दिसले.
ते त्यांच्या मित्राबरोबर दवाखान्याजवळील नाक्यावर एका टपरीवर चहा घेत होते. त्यांचे मित्र त्यांना घेऊन टूरला जाणार होते. आम्हाला दवाखान्याकडे जाताना पाहून त्यांना वाटले नक्कीच काहीतरी भानगड आहे.
आम्हाला थांबवून त्यांनी दवाखान्याचे शटर उघडायला सुरुवात केली. त्यांचा एक मित्र म्हणाला "काहीतरी औषध देऊन पाठव त्यांना नाहीतर जवळच्या रुग्णालयात अॅडमिट व्हायला सांग." पण डॉ नी त्याला सांगितले की काहीतरी गंभीर आहे. मला नीट तपासायला हवे.
त्यांनी बाबांना तपासून पक्षाघाताची सुरुवात झाल्याचे सांगितले आणि तातडीने एका हॉस्पीटल मध्ये दाखल व्हायला सांगितले आणि त्या हॉस्पीटलच्या प्रमुखांना फोन करुन कल्पनादेखील दिली. एव्हाना आमची रिक्षा निघून गेली होती म्हणून त्यांच्या मित्राच्या कारमधुन त्यांनी हॉस्पीटलमध्ये सोडले. नीट उपचार सुरु झाल्याची खात्री झाल्यावरच ते तिथून निघाले.
लिखाणावर वेगळे काय बोलणार, नेहमीसारखेच एक कसला ना कसला अनुभव देऊन जाणारे, मात्र तुमच्यासारखे डॉक्टर त्रास घेण्यास सदैव तत्पर आहेत म्हणून एखाद्या आजारपणात हे हि दिवस जातील म्हणत स्वताला धीर देता येतो..
क्षमस्व, खूप दिवसांनी मिपावर आलोय. बर्याच काही कारणांमुळे मिपावर निवांत यायला मिळत नाही. मन उदास होते आणि मिपावर येणे ५-१० मिनीटांचे काम खचितच नाही. बघू, लवकरात लवकर नियमित येण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.
लेख अतिशय सुंदर आणि प्रभावी आहे. आवडला. विशेषतः पहिल्या प्रसंगाशी, त्यांच्या घालमेलीशी स्वानुभवामुळे रिलेट करु शकलो.
डॉक्टरसाहेब, तुम्ही खूप लोकांच्या दुआ घेत आहात; आणि त्या इतक्या सहजपणे घेणे हे सोपे काम नाही. तुमचे अभिनंदन!
मिपाने अशा देवमाणसांना एकत्र आणले त्याबद्दल मिपाचे शतशः आभार!
--समीर
मायेने मला म्हणाल्या "बाबा माझ्या, गोरागोमटा आहेस माझा न नात्याचा न गोत्याचा पण मुला सारखीच काळजी घेतलीस तुझ्या आई वडिलांना देव उदंड आयुष्य देवो. त्यांची आणि स्वतःची काळजी घे. माझे किती दिवस आहेत ते पांडुरंगाला ठाऊक. एकदा गावाला जाऊन पडले कि झाले. तुला परत त्रास द्यायला येणार नाही.
प्रतिक्रिया
फारच हृदयस्पर्शॉ अनुभव.
सहमत...
+१
सुन्न !!!
सुंदर
+१
हृदयस्पर्शी
+१
खुपच मनाला लागणार कधीकधी असे
अगदी अगदी
भयानक.
आज असलेले माणूस उद्या दिसणार नाही हा विचार भयानक असतो.
सैनिकांचा आणि त्यांच्या
निबद्ध करणारा अनुभव
वाईट.
मी बर्याचदा विचार करतो, की
साहेब,
डॉक्टर साहेब,
सत्य लपवावे कि सांगावे
प्रसंग वेगवेगळे आहेत.
निशब्द....
खुपच छान लिहीलेय.
.
भयाण!
सेम हियर
आज असलेले माणूस उद्या दिसणार नाही हा विचार भयानक असतो.
डॉक्टरसाहेब इन ओल्ड फॉर्म!
*****
आज असलेले माणूस उद्या दिसणार
अस्वस्थ करणारे अनुभव
तुमचे लिखाण नेहमीच आवडते. बर्
हम्म...
लिखाणावर वेगळे काय बोलणार,
सुन्न !
भयानक वास्तव पण खूप सुंदर लिहिले आहे.
बापरे! हे असं वाचून भीती
खूप छान!
उत्तम लेख.
खुपच हृदयस्पर्शी !
Hats off!