विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे
विवेकसिंधु हा कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ मराठी भाषेतील आद्य काव्यग्रंथ समजला जातो.विवेकसिंधु ग्रंथाबद्दलच्या मराठी विकिपीडियाव्रील लेख अद्ययावत करताना विवेकसिंधूचे लेखन अंबेजोगाई, आंभोरा, फलटण,पैकी नेमके कुठे झाले हि चर्चा सध्या पुढे आली आहे. मराठी विकिपीडियाचे एक जाणते सदस्य त्या बद्दल सध्या चर्चा:विवेकसिंधु येथे विवीध संदर्भ उधृत करत आहेत.
त्यातील एका संदर्भातील एक किस्सा रोचक वाटला म्हणून मिपा वाचकांसाठी त्याचा थोडा भाग.
*उद्धवसुताने लिहिलेला रामदास चरित्र हा ग्रंथ शके १६९६ (इ.स. १७७४)चा आहे. या ग्रंथाच्या ३९व्या अध्यायात मलयगंधर्वाची एक कथा आहे त्यातील उपकथेत एका राजा जैतपाळाचे वर्णन आले आहे ते थोडक्यात असे:
जैतपाळ राजाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाल्याने त्याने अनेक साधुसंतांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. साधुसंतांच्या उत्तराने जर त्याचे समाधान झाले नाही तर तो त्यांना तळे खोदण्याच्या कामाला लावीत असे.
राजाची चातुर्यकथा वाटते ? पण मूळकथा वेगळ्या दिशेने जाते. विवेकसिंधु वाचलेला नाही पण त्यातील 'विवेक" ही महत्वाची गोष्ट राजा जैतपाळाकडे असावी असे दिसते.विवेकसिंधु बद्दल या निमीत्ताने अधिक जाणून घ्यावयास आवडेल.
प्रतिक्रिया