बेताल भाषणबाजी!
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/02/09/article259627.ece/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-#.UveTI2d3vcu
पवार घराण्यात जन्माला येणे ही एकमेव पात्रता असणार्या सुप्रियाताईसाहेब सुळे यांनी असा सल्ला दिला की आंदोलन करताना सामान्य लोकांच्या एस टीची जाळपोळ न करता नेत्यांच्या गाड्या जाळा! वा!
एस टी ची नासधूस करू नका हे म्हणणे ठीक आहे. पण हे नेत्यांच्या गाड्या जाळण्याबद्दलच्या काड्या कशाला सारताय?
एक जबाबदार वारसदार आपलं खासदार असले टाळ्याखेचक डायलाग मारते हे कितपत उचित आहे?
अर्थात पिताश्रींचे योग्य प्रशिक्षण असले तर उद्या बाईसाहेब सफाईदार कोलांटी उडी मारुन त्या जळणाच्या उपदेशाला वेगळेच वळण देतील हेही शक्य आहे.
नेत्यांच्या गाड्यांभोवती मोठी सुरक्षा असते. ती कशी भेदायची ह्यावर काही टिपा द्यायला हव्या होत्या. स्वतःची वा आपल्या "जाणत्या" तीर्थरुपांची गाडी आपणहून आंदोलकांना उपलब्ध करुन द्यायला हवी होती.
उद्या सत्ताभ्रष्ट झाल्यावर आपण काय प्रकारची आंदोलने करणार आहोत ह्याची चुणूक राष्ट्रवादींने दाखवली आहे की काय अशी शंका येते.
आंदोलक असे करण्यात यशस्वी ठरले तर ताईसाहेबांचे बंधू योग्य तो फवारा मारून अग्निशमन करतील काय? असो.
एकंदरीत असली भाषणबाजी करुन माकडाच्या हातात कोलित दिले असे व्हायला नको.
प्रतिक्रिया