Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ?

P
psajid यांनी
गुरुवार, 02/13/2014 - 07:27  ·  लेख
लेख
आज पाश्चात्यांच्या अनुकरणामध्ये आपण सर्व जगात मोठी असणारी आपली संस्कृती हरवत चाललो आहेत. या गोष्टीने मनास फार दुःख होतंय. आज सगळीकडे पाश्चात दिवसांचे स्तोम माजले आहे, जिकडे पाहावे तिकडे - हा डे - तो डे ह्या इंग्रजी डे ने आपल्या भिंतीवरील दिनदर्शिका अगदी भरून गेली आहे. आता त्या लोकांनी आपण आपल्या जन्मदात्या आईवर वर्षातल्या कोणत्या एका दिवशी ममता करायची, बापाला कोणत्या दिवशी आनंदात ठेवायचे हे ठरवायचे का काय ? त्या लोकांनी प्रेम करण्याचा सुध्दा एक दिवस ठरवून टाकला आहे म्हणे ! ज्याला आज सगळीकडे "व्हेलेण्टाईन डे " म्हणतात. जो उद्याच आहे. इंग्रजी डे साजरा करणाऱ्या या लोकांना आपल्या देशातील महापुरुषांच्या जन्मतिथी माहित नसेल, आपल्या घरातील आई - वडिलांची आपल्यासाठी आपल्या आजारपणामध्ये जागलेली कित्येक रात्री मधील एक रात्र माहित नसेल मात्र हा दिवस मात्र त्यांच्या आठवणीमध्ये असेल. आयुष्यातील किती मोठी शोकांतिका ! आपण आपल्यामध्ये असणारा माणुसकीचा झरा जो पीडितांसाठी, गरिबांसाठी, आपुलकीच्या माणसासाठी वाहतोय हेही विसरत चाललो आहे का ?. ज्याच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो तो "व्हेलेण्टाईन" हा तिसऱ्या शतकातील रोम मधील ख्रिश्चन संत होता, जो सैनिकांच्या लग्नावर बंदी असताना त्या देशातील सैनिकांचे चोरून लग्न लावून द्यायचा, आणि हे जेंव्हा त्या राजाला कळले तेव्हा त्याने त्याला बंदी बनवून १४ फेब्रुवारी २६९ ला मारून टाकले. पण त्या अगोदर त्याला राजाकडून धर्मांतर केलेस तर तुला मुक्त करतो असे सांगण्यात आले होते. मात्र त्याने धर्मांतरास नकार दिला. त्याने रोम च्या राजाची आंधळी मुलगी ला त्याच्या दैवी उपचारांनी ठीक केले होतं. मरण्यापूर्वी त्याने त्या मुलीला एक पत्र लिहले आणि त्याखाली त्याने "From your Valentine" असं लिहलं होतं. त्याने धर्मासाठी आपला जीव दिला. प्रेमासाठी त्याने जीव दिला असा साधा उल्लेखही नाही. आपल्या भारतीय संस्कृती मध्येही संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपले प्राण दिल्याचा उल्लेख आहे. मात्र आपल्या आठवणीमध्ये त्यांचा बलिदान दिवस नाही. हे खरं तर भारतीय इतिहासाचे दुर्दैव म्हणावं लागेल. १४ फेब्रुवारी लाच (१९२२ साली) असणारी गायनातील स्वर्गीय आनंद पं.भीमसेनजी जोशी यांची जन्मतिथी कुणाच्या आठवणीमध्ये आहे ? आणि याच दिवसी १९३१ ला आपल्या देशातील क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रजांनी फासी दिली. तुम्ही कोणता दिवस तुमचा आनंद म्हणून साजरा करायचा हे तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार नाही मात्र तो दिवस साजरा करताना आपल्या वागण्याचा, आपल्या कुटुंबावर, मित्रांवर, संस्कृतीवर आणि देशावरही परिणाम होत असतो हे लक्षात ठेवा. आणि ह्या सगळ्यांसाठी आपलीही काही जवाबदारी, काही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवा. २५ - ५० रुपये गुलाबाच्या फुलावर खर्च करण्यापेक्षा गरीब दुबळ्या अनाथ मुलांना कपडे किंवा अन्न वाटून किंवा दुष्काळात होरपळनाऱ्या, पाण्यासाठी दाहीदिशा टाहो फोडणाऱ्या लोकांसाठी, मुक्या जनावरासाठी पाणी देवून आपल्यामध्ये असणारे सामाजिक भान जपणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. ज्यांचा आपल्या देशाशी संबंध आहे, आपल्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांच बलिदान दिलं, जे आपल्या देशाच्या, आपल्या संस्कृती च्या उन्नती साठी अहोरात्र झटताहेत, लढतायेत, मरतायत किंवा त्या सीमेवर लढणाऱ्या शूर सैनिकांचे जे थंडी, बर्फवृष्टी, ऊन, पाऊस यांची तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावतात ज्यांच्यामुळे आज आपण सुरक्षितता अनुभवू शकतो, त्यांचे विस्मरण हे इंग्रजी डे साजरे करताना होता कामा नये. एवढंच हे इंग्रजी डे साजरं करताना माझं कळकळीचं आणि नम्र सांगणं आहे. - साजीद पठाण

प्रतिक्रिया द्या
13868 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

ऋ
ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 08:41 नवीन
म्हणजे कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
प
प्रसाद गोडबोले Tue, 02/18/2014 - 12:35 नवीन
ळॉळ ह्यावरुन एक जोक आठवला वडील आपल्या आठवीतल्या मुलाची सॅक चेक अकरत असतात , त्यात त्यांन्ना कंडोम चे पाकिट सापडते वडील ( प्रचंड रागाने ) : अरे कारट्या ह्या वयात हे हे तुझ्या सॅक मधे ? काही लाज नाही का वाटत ?? मुलगा ( शांतपणे) : ओ बाबा , उगाच इश्श्यु करु नका , ह्या वयात आजोबा झालात तर तुम्हालाच लाज वाटेल म्हणुन ठेवलय मी ते =)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
माहितगार Tue, 02/18/2014 - 09:01 नवीन
पहिल वर मी इंग्लंडमध्ये त्याच दिवशी सिंगल्स एकटे जीव सदाशिव अँटी व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करतात याच्या वृत्ताचा दुवा दिला आहे. सोबतच एका कॅथॉलीक चर्चच्या भूमीकेचाही दुवा दिला आहे. दुसरीकडे मिपावरच्याच याच विषया संबंधाने असलेल्या दुसर्‍या धाग्यावर फुलं आणि भेटीं या सोडून इतर बाबतीत डोक लढवणारी डोकी भारतीय असण्यावर बोट ठेवल. तेच मी आपल्या प्रतिसादास उत्तर देतानाही म्हणेन. भारतीय डोक्यांनी विवेक राखला नसेल तर दिवस इम्पोर्टेड असण्या बद्दल खापर फोड कितपत सयूक्तीक ठरते. आपण दिलेल्या संबंधीत वृत्त दुव्यातील ऑनलाईन खरेदी बाबत दिलेली आकडे साशंकीत करणारे वाटतात संबंधीत वेबसाईट स्वतःची या निमीत्ताने जाहीरात तर करून घेत नाहीएना अशी जराशी शंका वाटली. दिवस भारतीय परंपरेला अनुसरून राहील या बद्दल जागरूकता निर्माण करण्यास हरकत नाही आणि बहुतांष भारतीय आजही जपतातच. आकडेवारी खुपत असेल तर ब्लड डोनेशन सारखे अधिक सकारात्मक उपक्रम तरूणाईला देण्यास हरकत नाही. अर्थात आकडेवारीबद्दल निष्कर्ष सुद्धा जराशी सावधानता बाळगण्यास हरकत नाही. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी विवाहीत लोकही अधिक प्रेम करू शकत असतात आणि तस असून भारताची लोकसंख्या वाढू नये म्हणून खबरदारी घेत असतील तर ठिक असेल किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 02/18/2014 - 09:17 नवीन
आपण दिलेल्या संबंधीत वृत्त दुव्यातील ऑनलाईन खरेदी बाबत दिलेली आकडे साशंकीत करणारे वाटतात संबंधीत वेबसाईट स्वतःची या निमीत्ताने जाहीरात तर करून घेत नाहीएना अशी जराशी शंका वाटली. ह्म्म... ते वॄत्त एबीपी माझा या वॄत्तवाहिनीने त्यांच्या संकेतस्थळावर दिले आहे,एखादी वॄत्तवाहिनी विनाकारण आकड्यांचे गणित चुकीचे देइल असे वाटत नाही. आकडेवारी खुपत असेल तर ब्लड डोनेशन सारखे अधिक सकारात्मक उपक्रम तरूणाईला देण्यास हरकत नाही. आपण माझा प्रतिसाद नीट वाचला असेल तर मी त्यात :- दुसरीकडे भारताच्या दुसर्‍या टोकाला प्रेमीयुगूलांनी व्हेलेंटाईन डे रक्तदान करून साजरा केल्याचे वृत्त आहे. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम. असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. व्हॅलेंटाईनडेच्या दिवशी विवाहीत लोकही अधिक प्रेम करू शकत असतात आणि तस असून भारताची लोकसंख्या वाढू नये म्हणून खबरदारी घेत असतील तर ठिक असेल किंवा कसे. अच्छा,मग याच दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करतात, असा निष्कर्ष काढता येइल का ?की इतर दिवशी वेळ मिळत नसावा म्हणुन त्याची कसर या दिवशी भरुन काढली जाते ? असा विचार करायचा ? @ ऋषिकेश कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? अच्छा म्हणजे प्रेम दिवसाच्या नावावर हवे तसे संबंध ठेवा,व्यभिचार करा... पण एड्स होणार नाही अशी काळजी घ्या असं म्हणायच का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ऋ
ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 09:49 नवीन
@ ऋषिकेश कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? अच्छा म्हणजे प्रेम दिवसाच्या नावावर हवे तसे संबंध ठेवा,व्यभिचार करा... पण एड्स होणार नाही अशी काळजी घ्या असं म्हणायच का ?
१. कंडोम फक्त व्याभिचारी व्यक्ती वापरतात असा (गैर)समज तुमचा का बरे झाला आहे? २. दोन व्यक्तीं स्वेच्छेने सुरक्षित संबंध ठेवत असल्यास त्यास व्याभिचार का/कसे म्हणावे? ३. दोन व्यक्ती स्वेच्छेने संबंध ठेवत असताना त्यांनी नुसता एड्सच नाही तर अनेक एस्टीडीज ची काळजी, किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले तर संस्कृतीरक्षकांच्या पोटात का दुखावे? बाकी माझे मतः आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे. अशा प्रेमीजीवांवर जळणार्‍या तथाकथित संस्कृतीरक्षकांना कशावर मारायचे हे ठाऊक असेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
श
शिद Tue, 02/18/2014 - 12:08 नवीन
ऋषिकेश साहेब, तुमच्या मताबद्दल आदर आहे पण खालील प्रश्न विचारावासा वाटतोय, कृपया राग मानू नये ही विनंती.
आपल्याला आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत त्या व्यक्तीच्या परवनगीने व कोणतीही फसवणूक न करता सुरक्षित संबंध फक्त प्रेमदिनाच्याच दिवशी नव्हेत तर हवे तेव्हा खुशाल ठेवावे.
तुमच्या घरातील किंवा नातेवाईकांमधील सज्ञान पोरा-पोरींनी लग्नाअगोदर त्यांच्या आवडत्या सज्ञान व्यक्तीसोबत सुरक्षित संबंध ठेवले तर तुम्हाला मान्य आहे का? (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/20/2014 - 07:12 नवीन
शेवटी ह घ्या म्हटलंय तरी प्रश्न शिरेस आहे असे समजून उत्तर देतो: पोर-पोरी सज्ञान झाल्यावर माझ्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? सज्ञान व्यक्तीने त्यांनी लग्नाआगोदर/नंतर काय करायचे ते त्यांनी त्याच्या संभाव्य कायदेशीर परिणामांना सामोरे जायची तयारी ठेऊन, विचार करून करावे. पालक म्हणजे शासक नव्हे. आणि थेट उत्तर द्यायचं तर होय, जोवर त्या दोघांचीही अनुमती आहे व त्यांची संभाव्य कायदेशीर गुंत्याला सामोरे जायची तयारी आहे तर मला अश्या संबंधात काहीही वावगे वाटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
श
शिद गुरुवार, 02/20/2014 - 10:58 नवीन
प्रश्न सिरीयसच होता आणि आपण त्यावर न रागवता उत्तर दिले म्हणुन धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
म
मराठी कथालेखक Fri, 02/21/2014 - 07:07 नवीन
आजकाल शिक्षण, उच्च शिक्षण, करियर ई मुळे लग्नाचे वय वाढले आहे (३०+ नंतर लग्न हे अनेकदा पहायला मिळेल). पण म्हणुन तोपर्यंत मुलांनी (म्हणजे मुलींनीहि) जीवनातील एका आनंदास मुकावे असे मला वाटत नाही. समजून, उमजून योग्य व्यक्तीसोबत शारिरिक संबंध वा थोडे पुढे जावून लिव-इन-रिलेशनशिप चा आनंद, अनुभव घेणे योग्य आहे असे मला वाटते. तसेच अशा अनुभवातुन प्रगल्भता, निर्णयक्षमता, माणूस ओळखण्याची क्षमता यांचा विकास होवू शकतो. पुर्वी अपत्यप्राप्तीच्या शक्यतेमुळे असे संबंध असू नये हा नियम होता, त्याचे नैतिक बंधन होते. पण आता गर्भनिरोधक साधनांमुळे मिळालेले स्वातंत्र्य उपभोगण्यास काहीच हरकत नसावी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ऋ
ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 09:53 नवीन
आणि अजून एक राहिलंचः नवरात्रीच्या नऊ दिवसांतही कंडोम/आयपील्सचा खप कित्येक पटिंत वाढतो. आता नवरात्र म्हणजेसुद्धा पाश्चात्यांकडून भारतीय संस्कृतीवर हल्ला आहे म्हणायचे असेल तर म्हणा बापडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 02/18/2014 - 10:16 नवीन
कंडोम न वापरता संबंध ठेवणे हे अधिक संस्कृतीरक्षक होईल असं म्हणायचंय का? १. कंडोम फक्त व्याभिचारी व्यक्ती वापरतात असा (गैर)समज तुमचा का बरे झाला आहे? २. दोन व्यक्तीं स्वेच्छेने सुरक्षित संबंध ठेवत असल्यास त्यास व्याभिचार का/कसे म्हणावे? ३. दोन व्यक्ती स्वेच्छेने संबंध ठेवत असताना त्यांनी नुसता एड्सच नाही तर अनेक एस्टीडीज ची काळजी, किंवा गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले तर संस्कृतीरक्षकांच्या पोटात का दुखावे? व्यभिचार करताना या गोष्टीचा वापर केला जात नाही का ? व्यभिचाराची व्याख्या माहित आहे का ? गर्भधारणा टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिक पिल्सचा सातत्याने वापर केल्यास स्त्री शरिरास याचे दुष्परिणाम भोगायला लागतात हे माहित आहे का ? कंडोम वापराने एसटीडी आणि एड्स होण्याचा धोका कमी करता येतो,पण तो पूर्णपणे टाळता येत नाही हे ठावुक आहे का ? कुठलाही सण असो त्याच्या दुष्परिणांमांकडे लक्ष न-देणे ही चूक कोणीही करु नये ! मग तो गणपती उत्सव असो,नवरात्र असो वा रंगपंचमी. जाता जाता :- ज्यांना वारंवार कशावरही मारलेले कळत नाही त्यांच्याकडे मी फक्त दुर्लक्ष करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
र
राजेश घासकडवी Tue, 02/18/2014 - 18:55 नवीन
कॉन्ट्रासेप्टिक पिल्सचा सातत्याने वापर
अहो, कॉंट्रासेप्टिक नाही हो, कॉंट्रासेप्टिव्ह. इथे सेप्टिकचा काही संबंध नाही. :) तुमचा प्रतिसाद पुरेसा विनोदी आहे, त्यात विनोदनिर्मितीसाठी आणखीन वेगळं करण्याची काही गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ऋ
ऋषिकेश गुरुवार, 02/20/2014 - 07:15 नवीन
कुठलाही सण असो त्याच्या दुष्परिणांमांकडे लक्ष न-देणे ही चूक कोणीही करु नये ! मग तो गणपती उत्सव असो,नवरात्र असो वा रंगपंचमी.
हे मान्यच आहे. पण इथे भारतीय संस्कृतीवर पाश्चात्यांच्या हल्ल्याचा/अनुकरणाचा संबंध कसा आला हे सांगायची कृपा कराल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
माहितगार Tue, 02/18/2014 - 11:08 नवीन
मी व्यक्तीशः प्रत्येक आणि सर्वच वृत्तसंस्थांची वृत्ते चिमुटभर मिठा सोबतच वाचतो (खासकरून पेडन्यूज हा प्रकार कसा काम करतो ह्याची कल्पना असल्यानुळे अधिकच) पन्नास हजाराच्यावर भारतीय लोक एका दिवसात एकाच वेबसाईटवर ऑनलाईन क्रेडीट कार्ड वापरून अशा गोष्टीच्या शॉपींग साठी भारतीय लोक खरेदी करत असतील हि जरा... अतिशयोक्ती आणि म्हणून जाहीरातबाजी अथवा स्पेक्यूलेशन वाटते. इतर प्रत्यक्ष दुकान दारांषी चर्चा करून दिलेल्या आकडेवारी बद्दल मोठा आक्षेप असण्याच कारण नाही. यांचे अभिनंदन करायला हवे ! सामाजिक जाणिव,भान ठेवुन अश्या प्रकारे दिवस साजरा केल्यास उत्तम.>> हे वाचल आणि सहमत आहे. क्रिटीसिझम आणि निगेटीव्ह मार्केटींग या बाबई भिन्न आहेत. निगेटीव्ह पब्लिसिटी अल्सो इज अ पब्लिसिटी आपल्याला एखादी गोष्ट गंभीरपणे नको असेल तर आपण त्याच निगेटीव्ह मार्केटींग करत नाही आहोत ना हे गंभीरपणे तपासावयास हव. म्हणूनच चार चांगले पर्याय सूचवण हे अधिक रचनात्मक ठरू शकत किंवा कस.
अच्छा,मग याच दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करतात, असा निष्कर्ष काढता येइल का ?की इतर दिवशी वेळ मिळत नसावा म्हणुन त्याची कसर या दिवशी भरुन काढली जाते ? असा विचार करायचा ?
मी व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाही पण बर्‍याच 'फॅमिलीज' आजकाल घरी केक बिक कापून व्यवस्थीत व्हॅलेंटाईन डे साजरा करतात त्यामुळे त्या दिवशी विवाहित लोक जास्तीचे प्रेम करू शकतात का? च उत्तर शक्य आहे पेक्षा तीच शक्यता जास्त वाटते. विवाहीत जोडप्याने इतर दिवशी प्रेम करून विशेष दिवशी अधिक प्रेम करणे यात मला तरी काही वावगे आढळत नाही. भारतीय तरूणाई पाश्चात्य गोष्टींची नक्कल करावयास लागली आहे यात तथ्य असल तरी या बाबतीत आजही बहुतांष कंझर्वेटीव्ह आहे असे वाटते. माध्यमांना श्रोते मिळतात तर काही एनजीओंना परदेशातन डोनेशन्सही हवी असतात त्यामूळेही वेगेळी चित्र रंगवण्याच काम सरसकट नाही पण अंशतः होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 02/18/2014 - 11:14 नवीन
माध्यमांना श्रोते मिळतात तर काही एनजीओंना परदेशातन डोनेशन्सही हवी असतात त्यामूळेही वेगेळी चित्र रंगवण्याच काम सरसकट नाही पण अंशतः होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओक्के... आपला मुद्दा / विचार समजला,पटला. माझही हेच मतं आहे की चांगल ते घ्याव, अयोग्य ते सोडुन द्याव आणि ते कोणत्याही गोष्टीला लागु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बाबा पाटील Tue, 02/18/2014 - 08:44 नवीन
मग १४ नोव्हेंबरला बालदिन नको का साजरा करायला....!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 02/18/2014 - 09:56 नवीन
पाश्च्यातांचे अनुकरण कितपत योग्य ? भारतियांनी सर्वप्रथम अशी सरसकटीकरणाची मानसिकता सोडली पाहिजे. त्याऐवजी, "कोणाचेही (पाश्च्यात्यांचे किंवा पौर्व्यात्यांचे किंवा अगदी भारतियांचेही) अंधानुकरण कितपत योग्य?" हा प्रश्न जास्त योग्य ठरेल. चांगले-वाईट-पणा हा पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर या दिशांवर अवलंबून नसतो. त्यामुळे जे काही चांगले, हितकारक आणि पुरोगामी आहे ते स्विकारावे, ते तसे नसले तर टाळावे... कुठल्या दिशेने ते येत आहे हे महत्वाचे नाही. आपण अनेकदा मोठ्या मोठ्या गोष्टींच्या गप्पा मारतो, जुन्या काळाचे मोठे दाखले देतो आणि स्वतः मात्र 'सिस्टीम'ला दोष देऊन बेलाशक त्याविरुद्ध वागतो असे खूपदा दिसते. त्याविरुद्ध पाश्च्यांत्यांच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या भारतियांनी उचलणे अत्यंत आवश्यक आहे... हे वरील "कल्पक" यांच्या प्रतिसादातील काही उदाहरणांवरून सहज ध्यानात येईल. पाश्च्यांत्यांची 'दुसर्‍यांच्या चांगल्या गोष्टी शास्त्रिय आणि सारासारविवेक बुद्धीवर तोलून त्या स्विकारण्याच्या' सवयीचे भारतियांनी अनुकरण करणे अत्यंत आवश्यक आहे तसेच भारतियांनी केवळ स्वार्थासाठी सत्य, विवेक आणि सामाजिक फायदा धाब्यावर बसवून दिशाभूल करणारे "राजकारणी" वागणे-बोलणे (जे सर्व विकसित देशांतील बहुसंख्य नागरीक त्याज्य समजतात आणि बर्‍याचदा ते कायद्याने दंडनीयही असते *) सोडणे अत्यंत आवश्यक आहे. * : हा एक देश / समाज विकसित असण्याचा मानदंड समजला जातो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा