जर मोदी पंतप्रधान झाले तर....
जर मोदी पंतप्रधान झाले तर प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा त्यांच्याकडून असतीलच. हा धागा त्या अपेक्षांचा अंदाज घेण्यासाठी काढतो आहे.
मोदी असे करतील, तसे करतील वगैरे गप्पा आपण मारत असतो. तावातावाने त्यांच्या कार्याची स्तुती/निंदा चालु असते. पण हे सारे निवडणुकीपर्यंत. त्यानंतर काय? समजा बहुमताने मोदींना जनादेश दिला की त्यांचे सरकार स्थापन होईल. अशावेळी एक मतदार म्हणून त्यांनी काही गोष्टिंना प्राधान्यक्रम द्यावा असे तुम्हाला वाटत असेल.
मी काही गोष्टींची यादी पुढे देतोयः (कोणत्याही खास (चढत्या/उतरत्या) भाजणीत ही यादी नाही)
- भ्रष्टाचार निर्मुलन
- महिला सुरक्षा
- महागाईच्या दरावर नियंत्रण व घट
- काळा पैसा परत आणणे
- टॅक्स रिफॉर्म्स
- खाणींची लायसन्स वाटप करणे
- लोकपालाची अपाँटमेंट
- शस्त्रास्त्र खरेदी
- पाकिस्तानशी युद्ध
-- पाकिस्तानशी संबंध सुधारणे
- चीनशी युद्ध
-- चीनशी संबंध सुधारणे
- राम मंदीर निर्माण
- निर्मल गंगा अभियान
- पायाभुत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढवणे
- पोटा सारखा कायदा आणणे
- नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे
- निवडणुक प्रक्रियेत सुधारणा करणे
- बालकल्याण योजना राबवणे
- शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रित करणे
- आरोग्य धोरणावर लक्ष केंद्रीत करणे
- क्रिडा धोरणावर लक्ष केंद्रीत करणे
- पर्यावरणाकडे लक्ष देणे
- आर&डी कडे लक्ष देणे
- शेतकरी, कामगार, लघूद्योग, मासेमारी, पर्यटन आदी क्षेत्रांकडे लक्ष देणे
- वन विंडो क्लिअरन्स सारख्या योजनांनी उद्योगधंदे व त्यायोगे रोजगारीला चालना देणे
- इतर (स्पष्ट करा)
आता तुम्हाला यापैकी कोणती पाच कामे मोदींनी सर्वात प्राधान्याने हाती घ्यावीशी करावीशी वाटतात? ती कामे त्यांनी कशी करावी? असे तुम्हाला वाटते तेही लिहा आणि त्या पाच कामांनाही प्राधान्यक्रमाने लावा.
तुम्ही निवडलेल्या कामांव्यतिरिक्त इतर कामे महत्त्वाची नाहित असे नाही पण जेव्हा तुम्ही मोदी पंतप्रधान होतील असे म्हणता / समजता तेव्हा त्यांनी कशाला प्राधान्य द्यावे यावर विचार केला असेलच.
चला तर येऊ द्या तुमचे प्राधान्य क्रम. लक्षात ठेवा हा क्रम फक्त मोदी पंतप्रधान झाले तर तुमच्या अपेक्षांव्वर आधारित आहे इतर नेत्यांसाठी तो क्रम वेगळा असण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया
या मागण्या मोदी पंतप्रधान झाल्यावर आलेल्या नाहीत.इतर गोष्टी मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाल्या आहेत ना?